Category Archives: मुंबई
BREAKING! 13 more AC local train services on WR Mumbai from tomorrow. These will be REPLACEMENTS to the existing non-AC ones. While the total number of services remain unchanged to 1,406, the number of AC services will now increase from 96 to 109 on weekdays and from 52 to 65 on… pic.twitter.com/lrkLDPgAie
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) November 26, 2024




Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये शुल्लक कारणाने झालेल्या भांडणांमुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घाटकोपर येथे घडली. 15 नोव्हेंबर रोजी घाटकोपर (Ghatkopar) स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एका मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, टिटवाळ्यातील या 16 वर्षीय मुलाने 35 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. खुनाच्या एक दिवस अगोदर मयत अंकुश भालेराव आणि त्याच्या साथीदारांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना या मुलासोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी हा मुलगा चाकू घेऊन गेला आणि त्याने कामावर जात असलेल्या भालेराव यांच्यावर हल्ला केला.
गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अखेर स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि खुनाच्या दोन दिवसांनंतर टिटवाळा येथून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला बैथा (25) याला गोवंडी येथून अटक केली. त्याने आपल्या भावाला चाकू लपवण्यात आणि पकडण्यापासून वाचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही टिटवाळा येथील रहिवासी आहेत. 14 नोव्हेंबरला ट्रेनमधील चौथ्या सीटवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बेनाली गावातील रहिवासी भालेराव आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी भांडणाच्या वेळी या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलाने भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टिटवाळ्याहून ट्रेनमध्ये चढला आणि घाटकोपर स्टेशनवर उतरला. तो भालेराव येण्याची वाट पाहू लागला.
सकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने पोलिसांना आरोपीने दिलेल्या धमकीबद्दल सांगितले. ट्रेनमध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा भालेराव यांनी आरोपीचा फोटो काढला होता.




मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक उत्सवात क्रिकेट, होम मिनिस्टर, वेश भूषा, चित्रकला, पाक कला स्पर्धा, कोजागिरी, रास गरबा – दांडिया तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आर.एस.सी. १५ मधील बाळ-गोपाळ, बंधू – भगिनी व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरा केला. उत्सवा दरम्यान रस्ता क्रमांक १५ विद्युत रोषणाईने झगमगला होता.
क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत साईकुंज संस्थेनेच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत विजेते पद पटकविले. या स्पर्धेचे अप्रतिम नियोजन केतन धाटावकर व गिरीश दहीबावकर यांनी केले होते.
महिलांचा आवडता कार्यक्रम “होम मिनिस्टर” म्हणजेच खेळ पैठणीचा पाऊस असूनही खूपच रंगतदार ठरला. आपल्या खास शैलीत निवेदक प्रशांत प्रिंदावनकर आणि सुधाकर वस्त यांनी एकामागून एक रंगतदार खेळांचे सादरीकरण करून खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील या खेळांची भुरळ पाडली. या स्पर्धेच्या विजेत्या रंगावली संस्थेतील श्वेता सतिश कदम यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आपला माणूस भूषण अनंत विचारे यांनी पैठणी, सोन्याची नथ, स्मार्ट घड्याळे आणि एअर पौडस्, तसेच सहभगी भगिनिंस पारितोषिके देवून मंडळास मोलाचे सहकार्य केले.
सत्यनारायण पूजा दिनी बाळ गोपलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात १३६ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली. तसेच महिलांसाठी आयोजलेल्या पाककला स्पर्धेत देखील अनेक भगिनींनी भाग घेवून एकापेक्षा एक सरस पदार्थांची मेजवानी सादर केली. साई कुंज संस्थेतील सुजाता नाईक यांच्या ‘कडबू’ या पारंपरिक पदार्थाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. डी.जे.जग्गु यांच्या तालावर रास – गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध वेशभूषा करून अबाल वृद्धांनी सहभाग घेवून आनंद व्यक्त केला.
उत्सव मंडळाच्या वतीने विभागात कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे असे राजेश सोरप अध्यक्ष व अमित पालांडे, चिटणीस यांनी सांगितले.
कार्यक्रमांची सांगता भूषण विचारे, निखिल गुढेकर, राजन निकम , दिनेश साळवी, सुधाकर कदम या व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे तसेच प्रशांत प्रिदांवनकर, हरीश सूर्यवंशी, राजेश सोनवणे प्रवीण सावंत, कुणाल विश्वकर्मा, विशाल पांड्या, राजू परब, चेतन चौलकर, डॉक्टर मकरंद गावडे, कमलाकर सक्रे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले. तसेच सर्व रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार सुधाकर वस्त यांनी व्यक्त केले.




Mumbai Local: पाश्चिम उपनगरीय मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक दिनांक 12 ऑक्टोबर पासून बदलण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ६ लोकल सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात अप दिशेने सहा आणि डाउन दिशेने सहा लोकल सेवांचा समावेश केला आहे.
अप दिशेने बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता चालविण्यात येत होती. ती लोकल आता भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटेल आणि चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहोचेल. विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही गाडी विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल. तर वसई रोड – चर्चगेट जलद लोकल विरारहून चालविण्यात येणार आहे. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोचणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १० जलद लोकलला १५ डब्यांत रूपांतरित केले आहे. अप मार्गावर १०.३९ वाजताची विरार – चर्चगेट, १०.४४ ची विरार – दादर लोकल, दुपारी १.१४ वाजता सुटणारी विरार – अंधेरी, दुपारी १.४२ वाजता सुटणारी विरार – चर्चगेट, दुपारी २.४८ वाजता सुटणारी विरार – बोरिवली या लोकल १५ डब्बा चालविण्यात येणार आहेत. तर डाउन दिशेने दुपारी १२.६ वाजता सुटणारी दादर – विरार लोकल, दुपारी १२.०९ वाजताची चर्चगेट – विरार, दुपारी २ वाजताची अंधेरी – विरार, दुपारी ३. १८ वाजता सुटणारी चर्चगेट – विरार, दुपारी ३. २३ वाजता सुटणारी बोरिवली – विरार जलद लोकल १५ डब्याची चालविण्यात येणार आहे.
नवीन १२ लोकल कोणत्या?
अप दिशेने सकाळी ५.३२ वाजता अंधेरी – चर्चगेट धीमी लोकल, सकाळी ७ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी १०.२५ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी ११.३५ ची जलद विरार – चर्चगेट लोकल, दुपारी २. २८ ची गोरेगाव – चर्चगेट धीमी लोकल आणि रात्री ९.५८ वाजता बोरिवली – चर्चगेट धीमी लोकल चालविण्यात येणार आहे. तर डाऊन दिशेने सकाळी ४.५० वाजता विरार – डहाणू रोड दरम्यान धीमी लोकल, सकाळी ९.०७ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, ९.३० वाजता विरार – डहाणू रोड धीमी लोकल, दुपारी २. २३ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, रात्री ९.२७ वाजता चर्चगेट – अंधेरी धीमी लोकल, रात्री १०. ५ वाजता चर्चगेट – नालासोपारा जलद लोकल चालविण्यात येणार आहे.
बदललेले वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक क्लिक करा.
अप लोकल
https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545484440-UP-AC-78-PTT-W.E.F.-12.10.2024.pdf
डाऊन लोकल
https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545420850-DN-AC-PTT-78-W.E.F.-12.10.2024.pdf




मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभेचा थेट मुकाबला महायुती व महाविकास आघाडीमध्येच होणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार ज्यांचा ज्या मतदारसंघात आमदार ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. येथून निलेश राणे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.








मुंबई: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे या महत्वाच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती – महाराष्ट्र तर्फे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे संबधित प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील स्थानकांचा संथगतीने होणारा विकास,
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, कोकण रेल्वेला थेट अर्थसंकल्पीय निधी मिळण्यात येणार्या अडचणी, कर्जात बुडत चाललेली कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वेचे विलिनीकरण किती महत्वाचे या विषयांसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब, ग्लास हाऊस, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१ येथे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान पार पाडण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सर्व कोकण प्रेमी प्रवासी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
रचना तपशील
- छोटे पूल : ४९
- प्रमुख पूल : २१
- रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) : ३
- वायडक्ट्स : ५१
- बोगदे : ४१
- वाहन ओव्हरपास (VOP) : ६८
- वाहन अंडरपास (VUP) : ४५
- इंटरचेंज : १४
- टोल प्लाझा : १५
- वेसाइड सुविधा : ८
