Category Archives: महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.

GRAMPANCHAYAT ELECTION 2022राज्यात ग्रामपंचायत निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ग्रामपंचायतींवर आप आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक जवळ आली कि मतदार राजा होतो. सर्व राजकीय नेते विविध आश्वासने देऊन मतदारांची मते जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त होतात. पण मतदारांनी चुकीचे मतदान करून चुकीचा उमेदवार निवडून दिल्यास त्याचे परिणाम गावाच्या विकासावर होतात. असे होऊ नये ह्याकरिता मतदाराने साक्षर आणि दक्ष असणे जरुरीचे आहे.
त्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य याने एक ग्रामपंचायत निवडूक संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी एक सखोल माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. ह्या पुस्तिकेत ग्रामपंचायत निवडणुकीचे नियम, प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चिती, आरक्षण, मतदार यादी आणि केंद्र, सदस्य आणि सरपंच पदाची पात्रता, चिन्हे वाटप, आचारसंहिता, मतमोजणी, निवडणुकीदरम्यान होणारे गुन्हे आणि शिक्षेची तरतूद इत्यादी सर्व माहिती ह्या पुस्तिकेतून तुम्हाला भेटेल. वाचा आणि  ही पोस्ट शेअर करा.
खालील पुस्तकावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

 

   Follow us on        

>Click Here to Download… 

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर

PUBLIC HOLIDAYS 2023 :सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे . यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रांने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर सुट्ट्यांची यादी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.02.12.2022 रोजी निर्गमित  प्राधिकृत प्रकाशन  केले आहे .

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39 /1/68 जेयुडीएल / तीन दिनांक 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्यात शासन अधिसुचनेद्वारे सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत . सन 2023 या ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे एकुण 24 दिवस साार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून बँकांसाठी एक दिवस अधिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे –

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी केल्या जाणार्‍या खर्चावर मर्यादा

Grampanchayat Election 2022– येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चमर्यादा निश्चित केली आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य संख्येच्या आधारावर प्रचारासाठी खर्चाची मर्यादा २५ हजार ते पावणेदोन लाख रुपयापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा :ग्रामपंचायत निवडणुक – रत्नागिरी जिल्हय़ात तीन दिवस मद्यविक्री बंद

सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी प्रचाराची खर्चमर्यादा २५ हजार ते ५० हजारांच्या मर्यादित आहे. तर सरपंच पदाच्या उमेदवारास ही खर्चमर्यादा ५० हजार ते १.७५ लाख एवढी आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र बॅंकखाते उघडणे अनिवार्य आहे. खर्चाच्या हिशेबात स्पष्टता असणे गरजेचे आहे. निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च उमेदवारांना सादर करावा लागणार आहे.

राज्यात तलाठी भरती होणार.. जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या …

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचा एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.  

 

   Follow us on        

Mumbai :राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.

श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.

संपूर्ण जिल्हावार भरली जाणारी पदसंख्या पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करून शासननिर्णय पहावा.

तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).Pdf







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मृत्यूशी झुंज अपुरी… ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे निधन

 

 

पुणे- गेल्या २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्‍या मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.

आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्यांना दिला जाणार पुरस्कार

दिल्ली: केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या गोल्डनअवर मध्ये अपघातग्रस्तांना हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचािासाठी घेऊन जाणाऱ्या ‘गुड समेरिटनला’ अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल त्या व्यक्तीस पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे.

रस्त्यावरील होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना
आपत्त्कालीन परिस्स्थतीत मदत किण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रवृत्त / प्रेरित करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरू करण्यात येणार आहे.सदर पुरस्काराची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय देखरेख समिती बनविण्यात येणार आहे. हि समिती या योजनेच्या प्रभावी व कार्यक्षम अंबलबजावणीचा आढावावेळोवेळी त्रैमासिक बैठकीद्वारे घेईल आणि नामांकने रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवून अंतिम पुरस्कार जाहीर करण्यात येईल.

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही, तिसरी ते आठवी सर्वच पास..महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती

मुंबई :पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत, ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे, त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले, अनेक इनिशिएटिव्ह केरळने शिक्षणात घेतले आहेत. काही मॉडेल जे यशस्वी झालेत ते पुढे न्यावे लागतात. केरळ आणि महाराष्ट्राची तशी तुलना करता येणार नाही. पण केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दप्तराचे ओझे कमी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता यापुढे पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी खोटी.

पुणे : बुधवारी संध्याकाळपासून विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यावर आता त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याचंही त्यांनी सांगितलं. “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे”, असं वृषाली गोखले यांनी सांगितलं. विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे.

 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या नोकरभरतीमध्ये अधिवास प्रमाणपत्राची अट नाही – रोहित पवार यांचा आक्षेप

 

MAHAGENCO RECRUITMENT NEWS : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही. परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा.

त्यामुळं शासनाने या परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत महाजेनकोस निर्देश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे केली आहे. 

 

येत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीत आपले नाव आणि मतदान केंद्र कसे चेक कराल?

Grampanchayat Election News :  राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. ह्या निवडणुकीसाठी आपण जर नवीन नाव नोंदणी केली असेल तर ते चेक करण्यासाठी तसेच मतदान केंद्रात बदल झाला आहे कि नाही हे चेक करता येण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तर्फे ऑनलाईन सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी https://electoralsearch.in/ ह्या  लिंक वर क्लिक करा आणि खालील स्टेप फॉलो करा.
इथे तुम्हाला दोन पर्याय भेटतील. एक पर्याय म्हणजे पहचान-पत्र क्र. द्वारा खोज, ह्या पर्यायात आपल्याकडे मतदार ओळखपत्र नंबर असेल तर तुम्हाला इथे शोधता येईल. जर तुमच्याकडे हा नंबर नसेल तर आपले नाव , वय आणि इतर माहितीद्वारे आपली माहिती शोधू शकता. जेवढी जास्त माहिती तुम्ही इथे भराल तेवढे तुम्हाला तुमची माहिती शोधणे सोपे जाईल.
आपल्या नावाच्या समोरील VIEW DETAILS बटण वर क्लिक करून आपली डिटेल्स पहा
   

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search