शिंदे गटातील आमदारांचे संरक्षण काढण्याचे आदेश?

शिंदे गटातील आमदारांचे संरक्षण काढण्याचे आदेश सरकारने दिले आहेत अशी Tweet प्रसारित होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटर च्या माध्यमातून ह्या वर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खालील शब्दात एक एक ट्विट प्रकाशित केली आहे.

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.

ह्या ट्विट वर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना निलंबनाची कारवाई चालू असलेल्या १६ आमदारांनी सही केलेले आपली सुरक्षा काढू नये अशा विनंतीचे पत्र पब्लिश केले आहे. ह्या पत्रात ते म्हणतात

” आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे”,

दरम्यान ह्या सर्व घडामोडींवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणतात की असा कोणताही आदेश अजून पर्यंत कोणाकडून दिला गेला नाही आहे. या संदर्भात ट्विटर वर केले जाणारे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search