शेवटी आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालायने शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेता. मुख्यमंत्री पदाबरोबर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा पण राजीनामा दिला आहे.
आपल्याला हे पद सोडताना कुठलेही दुःख होत नाही असे ते बोलले. ज्यांना शिवसेनेने सर्व काही दिले तेच वाईटावर आणि ज्यांना आम्ही काही नाही देऊ शकलो असे काही आज आमच्यासोबत हे आताचे चित्र आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यामंत्र्यांच्या खुर्चीवरून खाली पडले याचा आमच्याच लोकांना आता आनंद होईल.
औरंगाबादचे नामकरण
आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मीविआ च्या मंत्र्यांनी सर्वानुमते औरंगाबाद ह्या जिल्ह्याचे नामकरण औरंगाबाद केले असे त्यांनी जाहीर केले. ह्या बैठकीत ज्यांच्याकडून अशा गोष्टीची अपेक्षा होती तेच गैरहजर होते आणि ज्यांच्या विरोध आहे असे बोलले जात होते त्यांनीच ह्या प्रस्तावाला मान्यता दिली.
शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन
उद्या जेव्हा आमदारांचा गट जेव्हा मुंबईत विधानभवनात येईल तेव्हा त्यांना येऊ द्या, त्यांना अडवू नका असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
विठ्ठल रुक्मणीचीदेवीची पूजा करता आली नाही.
मुख्यमंत्री म्हणून मी या वर्षी विठ्ठल रुक्मणीची पूजा करावी अशी वारकऱ्यांची इच्छा होती ती आता पूर्ण होऊ शकत नाही ,कदाचित हे देवाची इच्छा असेल असे ते म्हणाले.
पुन्हा भरारी घेऊ.
झाले गेले विसरून आम्ही पुन्हा नव्याने उभे राहू. आमचा शिवसैनिक आमची ताकद आहे. मी आणि ते मिळून उद्याची नवी शिवसेना उभी करू.
Facebook Comments Box
Facebook Comments Box
Related posts:
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल होणार, पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठविलेला प्रस्ता...
महाराष्ट्र
मुंबई परिवहन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा; महाराष्ट्रात कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न राबविण्याची शक्यत...
महाराष्ट्र
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण; खात्यावर २००० रुपये आज जमा होणार?
महाराष्ट्र