आरेमध्ये मेट्रो-३चे कारशेड हा मुंबईकरांच्या हिताचा निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस.

मेट्रो-३ चे कारशेडचे रखडलेले काम सुरु करणे हा मुंबईच्या जनतेसाठी हिताचे आहे. त्या जागी आतापर्यंत २५% काम झालेले आहे आणि उरलेले ७५% काम त्वरित पूर्ण करता येईल आणि लवकरात लवकर मेट्रो-३ चालू करता येईल आणि त्याचा फायदा मुंबईकरांना होईल असे आज त्यांनी आपल्या एका मुलाखती मध्ये म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे यांचा विरोध चुकीचा आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालायने ह्या कारशेडला परवानगी दिली आहे. आणि जर प्रश्न वृक्षतोडीचा असेल तर आजूबाजूच्या बिल्डर्स ना हि परवानगी कशी काय देण्यात आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
ह्या कारशेड साठी झाडे तोडली जातील पण मेट्रो मूळे प्रदूषण वाचून पर्यावरण वाचेल असे ते म्हणाले. आधीच हे काम ४ वर्ष रखडले आहे आता
यात राजकारण आणून मुंबईकरांवर अन्याय करू नका असे ते म्हणाले.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search