मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-बदलापुर ते CSMT जाणार्‍या गाड्यांचा जीवघेणा ‘गॅप’.

अंबरनाथ : मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-बदलापुर स्टेशन वरुन CSMT च्या दिशेने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दोन लोकल्समधील अर्ध्या तासाचा ‘गॅप’ जीवघेणा ठरत आहे.

कर्जत वरुन सुटणारी आणि अंबरनाथ स्टेशन येथे सकाळी 9:06 ला येणाऱ्या CSMT जलद लोकल नंतर सुमारे अर्ध्या तासाने 9:37 वाजता CSMT ला जाणारी दुसरी लोकल आहे. पुढे अर्धा तास लोकल नसल्याने साहजिक 9:06 च्या लोकलला जीवघेणी गर्दी असते. अंबरनाथ वरुन पकडणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः दरवाज्यावर लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढते.

सकाळच्या 10/10.30 ड्युटी टाइम असलेल्या प्रवाशांसाठी हा गॅप खूपच गैरसोयीचा आहे. ह्या दोन लोकल्सच्या मध्ये एक जलद लोकल चालविण्यात यावी अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search