खारघर घटनेतील बळींना प्रत्येकी २० लाखांची मदत जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रातून मागणी…

मुंबई – खारघर येथील घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असून त्यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अशा मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

पत्रात ते असे म्हणतात की खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या घटनेची चौकशी केली गेली पाहिजे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केलेली मदत अगदी तुटपुंजी असून किमान प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे असे ते या पत्रात म्हणाले आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search