… अन्यथा वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकाच्या पुढे जाऊ देणार नाही; चाकरमान्यांचा रेल्वेला इशारा

कोकण रेल्वेवरील प्रलंबीत मागण्यांसाठी एकवटले चाकरमनी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुंबईत नवीन कार्यकारणी जाहीर

मुंबई : गेली २५ वर्षे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या अनेक मागण्यांमध्ये प्रामूख्याने सावंतवाडीला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा.मधू दंडवते यांचे नाव देणे,कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करणे,वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,कोकण रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी दादर चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे,मुंबई रत्नागिरी इंटरसिटी एक्स.सुरू करणे, तर सर्व सुपर फास्ट एक्सप्रेस पुणे मिरज मार्गे मडगावल्या वळवाव्यात अन्यथा त्यांचे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे जास्तीचे थांबे दयावेत,आणि कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे थांबे वाढवावे ह्या मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही त्या मिळत नसल्याने मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,वसई विरार,डहाणू,ठाणे,कल्याण, डोबींवली,बदलापूर,सावंतवाडी,लांजा,चिपळूण येथील कोकण रेल्वेवर काम करणाऱ्या २२ प्रवासी संघटना / संस्था एकवटल्या असून त्यांनी परळ मुंबई येथे एल्गार सभेचे आयोजन करून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई ची स्थापना केली.

 

नवीन कार्यकारिणी :

नवीन कार्यकारणीत अध्यक्ष : श्री.शांताराम नाईक, प्रमूख कार्यवाहक :श्री.राजू कांबळे,उपाध्यक्ष : श्री. तानाजी परब, उपाध्यक्ष : श्री.दिपक चव्हाण,उपाध्यक्ष : श्री.अक्षय महापदी, सचिव : श्री.यशवंत जड्यार,सहसचिव : श्री.दर्शन कासले,कोषाध्यक्ष : श्री.मिहीर मठकर,उपकोषाध्यक्ष : श्री.राजाराम कुंडेकर,उपकोषाध्यक्ष : श्री.नितीन जाधव,अं. हि. त. : श्री.समीर भोंगे,अं. हि. त. : श्री.मनीष दाभोळकर,सल्लागार : श्री.सुनील उत्तेकर,सल्लागार : श्री.सुभाष लाड,सल्लागार : श्री.श्रीकांत सावंत,सल्लागार : श्री.सुरेद्र नेमळेकर,सल्लागार : श्री.परेश गुरव,कायदेविषयक सल्लागार : ॲड. श्री.संजय गांगनाईक,कायदेविषयक सल्लागार : अँड.श्री.नंदन वेंगुर्लेकर,कायदेविषयक सल्लागार : अँड.सौ.योगिता सावंत, संपर्क प्रमुख : श्री.सागर तळवडेकर,सहसंपर्क प्रमुख : श्री.अभिषेक शिंदे,कार्यकारणी सदस्य : श्री.मिलिंद रावराणे,कार्यकारणी सदस्य : श्री. रमेश सावंत,कार्यकारणी सदस्य : सौ.संगिता पालव यांची नियुक्ती करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात श्री.शांताराम नाईक यांनी आवाहन केले की वरील आमच्या प्रमूख मागण्यापैकी किमान ५ मागण्या २६ जाने.२०२४ पर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाने मान्य कराव्यात अन्यथा कोकण रेल्वेवर रेलरोको करून वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडीच्या पुढे जाऊ देणार नाही असे सांगितले.तर सभेचे सुत्रसंचलन श्री.राजू कांबळे व श्री.यशवंत जडयार यांनी केले.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search