आंबोली,दि. ६ जून : आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटेच्या सुमारास भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला. ही घटना पूर्वीचा वस परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली आहे. दरम्यान हा प्रकार घडला तरी वाहतूक सुरळीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या घटनेमुळे येथून वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे, असे पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.दरम्यान ऐन वर्षा पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे त्याचा फटका आंबोली पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी राजगुरू यांनी केली आहे.
आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाट वारंवार कोसळण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पर्याय काय? हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान घाट धोकादायक होत असल्यामुळे अशा प्रकारचे दगड कोसळल्याची घटना वारंवार घडत असते.
Facebook Comments Box