RATNAGIRI: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी १५ दिवस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
हेही वाचा - Pandharpur Special Train: आषाढी एकादशी निमित्त गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार
Facebook Comments Box