Author Archives: Kokanai Digital

०५ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 13:14:33 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 11:23:53 पर्यंत
  • करण-विष्टि – 13:14:33 पर्यंत, भाव – 25:47:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-इंद्रा – 07:24:26 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 11:23:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:08:59
  • चंद्रास्त- 27:06:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.
  • 1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
  • 1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.
  • 1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • 1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
  • 1994 : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
  • 1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.
  • 1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2024 : बांगलादेश प्रधानमंत्री शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)
  • 1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)
  • 1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)
  • 1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.
  • 1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
  • 1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1987 : ‘जेनेलिया डिसोझा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 882 : 882ई.पुर्व : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
  • 1962 : ‘मेरिलीन मन्‍रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)
  • 1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)
  • 1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)
  • 1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)
  • 1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘ज्योत्स्‍ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)
  • 2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०४ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 11:43:52 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 09:13:31 पर्यंत
  • करण-गर – 11:43:52 पर्यंत, वणिज – 24:33:17 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 07:04:59 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:11
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 15:13:59
  • चंद्रास्त- 26:11:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन
  • आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1854 : हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली.
  • 1924 : सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1956 : अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.
  • 1983 : थॉमस संकरा हे अपर व्होल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1984 : अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले.
  • 1993 : पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडा वर चार सहकाऱ्यांसह समुद्रसपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंग ला खिंड पार केली. त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
  • 1998 : फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2001 : मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली.
  • 2007 : नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1730 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1761)
  • 1821 : ‘लुई व्हिटोन’ – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1892)
  • 1834 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1923)
  • 1845 : ‘सर फिरोजशहा मेहता’ – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 1915)
  • 1863 : ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर’ – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म.
  • 1894 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑक्टोबर 1978)
  • 1929 : ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडूमधील मृदंगम कलाकार यांचा जन्म.
  • 1929 : ‘किशोर कुमार’ – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1987)
  • 1931 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2002)
  • 1950 : ‘एन. रंगास्वामी’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1961 : ‘बराक ओबामा’ – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1978 : ‘संदीप नाईक’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
  • 1060 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
  • 1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
  • 1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
  • 1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
  • 1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
  • 2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

कोकण रेल्वेच्या समस्या आणि उपाययोजना: सागर तळवडेकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वे संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेली जनजागृती वाखाणण्याजोगी असून, युवकांच्या सहभागातून कोकण रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे संपर्क प्रमुख श्री. सागर तळवडेकर यांनी “कोकण रेल्वे समस्या आणि निवारण – माझ्या नजरेतून” या शीर्षकाखाली तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

“कोकण रेल्वे समस्या आणि निवारण.
माझ्या नजरेतून..

नमस्कार मंडळी, काही वर्षापासून कोकण रेल्वे संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना तळकोकणात जी जनजागृती झालीत ती खरच वाखण्याजोगे आहे. याआपल्या माहिती साठी सांगतो की 2017 ते 2020 पर्यंत सावंतवाडीचे कै. डी के सावंत यांनी जी रेल्वे संदर्भात मुहूर्त बांधली ती आता कुठे रंगू लागली आहे. कोरोना काळात कोणालाही न कळता सावंतवाडी आणि कणकवली स्थानकावरून गाड्या कमी करण्यात आल्या, परंतु तेव्हा याचा विरोध कोणी केला नव्हता, त्यात सावंतवाडी येथील प्रस्तावित टर्मिनसचे काम देखील ठप्प पडले होते.
‎दरम्यानच्या काळात सावंतवाडीतील काही तरुणांनी बॅनर लावून केलेली रेल्वे प्रशासनाची थट्टा पूर्ण जिल्हाभर गाजली होती.आणि येथूनच या सिंधुदुर्गात कोकण रेल्वे महामंडळाविरोधात कोकणवासीयांची नकारात्मकता दिसून यायला लागली.
‎वर्षं 2022, जेव्हा कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली आणि सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेले थांबे कर्नाटक राज्यातील स्थानकांना देण्यात आले तेव्हा सावंतवाडीतील काही युवकांच्या मनात पाल चुकचुकली. आणि इथूनच काल पर्यंत झालेले आंदोलन हे त्याचेच फळ. आणि हो कोकणातील अजून स्थानकांवर पुढेही आंदोलने होतील..!! 

समस्या क्र. १.- कोकण रेल्वे नेमकी कोणाची..??

‎बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या महनीय व्यक्तींमुळे रेल्वे कोकणात आली खरी, परंतु फायदा कोकणाला काही झालाच नाही. मुळात कोकण रेल्वे हे एक महामंडळ असल्याकारणाने याला अर्थसंकल्पीय तरतूदच नाही. त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक, आदी उत्पन्नावर या महामंडळाला आपला कारभार हाकावा लागतो.
‎उपाय- या महामंडळाचे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करणे.आणि कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करणे. यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांनी आपली संमती देणे आवश्यक आहे.
‎महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केलीय. त्यासाठी आम्ही युवकांनी मेल मोहीम करून हा मुद्दा खासदार धैर्यशील मोहिते, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, रविंद्र वाईकर आदींकडून लोकसभेत आणि राज्यसभेत उपस्थित केला.(त्यांनी मांडलेला मजकूर आणि आम्ही केलेली मेल मोहिमेतील मजकूर यात १०० टक्के साधर्म्य होते) १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेऊन या विषयाला महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोचवले होते.

समस्या क्र. २.- कोकणी माणसांना तिकिटे, नवीन गाड्या कधी मिळणार..?? खरंच टर्मिनसची आवश्यकता असते का??

‎कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या ह्या बारामाही फुल धावतात, त्यामुळे आपला कोकणी माणूस हा वेटींग वरच राहतो.याला मूळ कारण काय असावे बरे..?? काही लोक म्हणतील एजंट..!!परंतु मी म्हणतो याला एजंट कारणीभूत नाही, एजंट हे तांत्रिक कारण असूच शकत नाही. मूळ कारण हे टर्मिनस सुविधा आहे.
‎कोकणात टर्मिनस नसल्याकारणाने येथून गाड्या सोडण्यावर निर्बंध येतात.त्यामुळे कोकणसाठी नवीन गाडी सोडायची म्हटल्यावर ती गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत सोडली जाते,आणि इथेच सगळा खेळ होऊन जातो. कारण गोव्यात बाराही महिने पर्यटकांचा भरणा चालू असतो, गोव्यातील मडगाव आणि थिवी हे स्थानक प्रवासी संख्या आणि उत्पन्नात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून गाडी जर गोव्यापर्यंत गेली तर सर्वात जास्त तिकीट कोटा ही तेथील स्थानकांना अधिक मिळतो आणि आपली कोकणी जनता वेटींग वर मूग गिळून गप्प राहते आणि आपला रोष एजंट वर काढते.
‎उपाय – कोकणाला जर कोकणमर्यादित गाड्या हव्या असतील, पुरेसा तिकीट कोटा हवा असेल तर कोकणात स्वतंत्र टर्मिनसची नितांत आवश्यकता आहे.
त्यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे टर्मिनस मंजूर केले खरे परंतु कोकणवासीयांचा निद्रस्त भूमिकेमुळे हे टर्मिनस गेले १० वर्ष रखडले.
सावंतवाडीत जर टर्मिनस आणि कोचिंग डेपो झाला तर त्याचा फायदा फक्त सावंतवाडीला होणार नसून तर संपूर्ण कोकणला त्याचा फायदा होईल. ज्या प्रमाणे तुतारी एक्सप्रेस मध्ये फक्त कोकणी मनुष्य मुंबई पर्यंतचा प्रवास करतो तसाच प्रवास अजून काही गाड्या सावंतवाडी वरून सुरू झाल्यास होईल. त्यासाठी परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपोची आवश्यकता आहे.

समस्या क्र. ३.- कोकण रेल्वे महामार्गाचे दुहेरीकरण कधी..??वाढीव थांबे कधी मिळणार..??सिंधुदुर्गात १५ गाड्या का थांबत नाहीत??येथील प्रवासी सुविधांचे काय..??

‎कोकण रेल्वे हे केंद्राचा रेल्वे मंत्रालय संलग्न महामंडळ आहे,ज्या मध्ये ४ राज्यांची हिस्सेदारी आहे. आणि सदर महामंडळ सध्या कर्जाच्या खाईत आहे, आजमितीस या महामंडळावर हजारो कोटीच्या घरात कर्ज आहे.
‎उपाय – आजचा घडीला कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण दुहेरीकरण करण्यासाठी किमान ४० हजार कोटींची गरज आहे.जे एका महामंडळाला झेपण्यासारखे नाही. याचकारणाने सध्या या मार्गाचे दुहेरीकरण होणे शक्य नाही.या महामंडळाने टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव प्रत्येक राज्यसरकारला पाठवला होता परंतु त्याचे घोडे पुढे धावलेच नाहीत.
‎थांब्यासंदर्भात बोलायचे झाले तर त्याला मोठा जन लढा उभारावा लागतो कारण जो पर्यंत मागणी करत नाही तो पर्यंत त्याचा वर कारवाई होत नाही. मी एक रेल्वेचा अभ्यासक म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्याचे एक कारण म्हणजे आपली उदासीनता.त्यामुळेच कदाचित सिंधुदुर्गात एकूण १५ गाड्या थांबत नाहीत, त्यात सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेली राजधानी एक्सप्रेस व गरीब रथ एक्सप्रेस आणि कणकवली स्थानकातून काढलेली हिसार कोइंबतूर एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

‎येथील प्रवासी सुविधासंदर्भात बोलायचे झाले तर आम्ही सिंधुदुर्गातील तरुण युवक गेले दोन वर्षे याचा पाठपुरावा करत आहोत याचे फलित म्हणजे वैभववाडी येथे पादचारी पूलचे काम सुरू आहे ( ओंकार लाड व टीम चे प्रयत्न), कणकवली येथे प्लॅटफॉर्म २ वर २५० मीटरचा COP ( कव्हर ऑन प्लॅटफॉर्म) म्हणजेच निवारा शेड, व खाली जाणारा सरकता जिना.(सुनीत चव्हाण आणि टीम). सिंधुदुर्ग येथे PRS सुविधा, वांद्रे मडगाव एक्स्प्रेसचा थांबा (शुभम परब आणि टीम).
सावंतवाडी येथे अप्रोच रोडचे काम ९० टक्के पूर्ण, PRS सुविधा पूर्णवेळ सुरू, वांद्रे – मडगाव व नागपूर मडगाव एक्स्प्रेसचे थांबे मिळाले, प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटरचा COP आणि लिफ्ट प्रस्तावित/ मंजूर. (सागर, मिहिर, भूषण आणि टीम) आदी.
मंडळी, या काही महत्त्वाचा समस्या जे मला वाटतात. याव्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील आणि माझ्याकडून काही चुकल्या असतील.तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता. मी आणि माझी संपूर्ण टीम त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू.‎‎आपल्या सूचनांचे नक्कीच स्वागत करून मी थांबतो.”


‎- ‎सागर तळवडेकर
‎उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.
‎संपर्क प्रमुख, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

सावंतवाडी: दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी, ता.०३ –

चराठा-नमसवाडी रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे आहे. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम पोखरे हे म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होते. रविवारी सुट्टीमुळे ते काही कामानिमित्त गावी आले होते. चराठा येथे चिकन घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, ओटवणे रस्त्यावर ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी बाजूच्या दगडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीसह रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

०3 ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 09:44:13 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 06:35:57 पर्यंत
  • करण-कौलव – 09:44:13 पर्यंत, तैतुल – 22:47:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 06:24:22 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 19:11
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 14:20:00
  • चंद्रास्त- 25:23:59
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.
  • 1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.
  • 1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
  • 1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.
  • 1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
  • 1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
  • 1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.
  • 1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
  • 2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)
  • 1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)
  • 1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)
  • 1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)
  • 1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)
  • 1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘सुनील ग्रोव्हर’ – भारतीय अभिनेता आणि कॉमेडियन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)
  • 1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)
  • 1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)
  • 1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)
  • 2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०२ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

  • आजचे पंचांग
  • तिथि-अष्टमी – 07:25:25 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-भाव – 07:25:25 पर्यंत, बालव – 20:36:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 19:12
  • चन्द्र-राशि-तुळ – 23:53:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:26:00
  • चंद्रास्त- 24:40:00
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1677 : शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनाला भेट दिली. तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली.
  • 1790 : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली.
  • 1870 : टॉवर सबवे, जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे, लंडनमध्ये उघडली.
  • 1923 : केल्विन कूलिज हे अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.
  • 1979 : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1990 : इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली.
  • 1996 : अटलांटा ऑलिम्पिकमध्ये, अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ऍथलीट बनला ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • 2001 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1820 : ‘जॉन टिंडाल’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 डिसेंबर 1893)
  • 1834 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1904)
  • 1835 : ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1901)
  • 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
  • 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
  • 1877 : ‘रविशंकर शुक्ला’ – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1965)
  • 1892 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1978)
  • 1910 : ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1978)
  • 1918 : ‘जे. पी. वासवानी’ – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म.
  • 1929 : ‘विद्याचरणा शुक्ला’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुन 2013)
  • 1932 : ‘लमेर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2016)
  • 1941 : ‘ज्यूल्स हॉफमन’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘बंकर रॉय’ – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा जन्म.
  • 1958 : ‘अर्शद अयुब’ – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1589 : ‘हेन्‍री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1551)
  • 1781 : ‘सखारामबापू बोकील’ – पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली मंत्री यांचे निधन.
  • 1922 : ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल’ – टेलिफोन चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1847)
  • 1934 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1847)
  • 1978 : ‘अॅन्टोनी नोगेस’ – मोनॅको ग्रांप्री चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1890)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

वैभववाडी: देव तरी त्याला कोण मारी! करूळ घाटातील अपघातात दोघेजण थोडक्यात वाचले

   Follow us on        

वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.

अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली.  टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.

   

सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले.  चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

 

३१ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 29:00:25 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 24:42:33 पर्यंत
  • करण-गर – 15:50:07 पर्यंत, वणिज – 29:00:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 28:32:00 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या – 11:16:07 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:46:00
  • चंद्रास्त- 23:26:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक रेंजर दिन
  • हॅरी पॉटर वाढदिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1498 : ख्रिस्तोफर कोलंबस हा पश्चिम गोलार्धातील तिसऱ्या प्रवासादरम्यान त्रिनिदाद बेटांचा शोध घेणारा पहिला युटोपियन बनला.
  • 1657 : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
  • 1658 : औरंगजेब मुघल सम्राट झाला.
  • 1856 : न्यूझीलंडची राजधानी क्राइस्ट चर्चची स्थापना.
  • 1937 : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
  • 1948 : न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडले.
  • 1951 : जपान एरलाइन्सची स्थापना झाली.
  • 1954 : के-2 (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर इटालियन गिर्यारोहकांनी प्रथमच सर केले.
  • 1956 : जिम लेकर कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
  • 1964 : रेंजर 7 अंतराळयानाने चंद्राची पहिली स्पष्ट छायाचित्रे घेतली.
  • 1992 : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • 1992 : सातारचे वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2000 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्र डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2001 : डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार संचालक प्रदान.
  • 2012 : मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1704 : ‘गॅब्रिअल क्रॅमर’ – स्विस गणिती यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1752)
  • 1800 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1882)
  • 1872 : ‘लक्ष्मणरामचंद्र पांगारकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1941)
  • 1880 : ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1936)
  • 1886 : ‘फ्रेड क्विम्बे’ – अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 16 सप्टेंबर 1965)
  • 1902 : ‘के. शंकर पिल्ले’  व्यंगचित्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1989)
  • 1907 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 1966)
  • 1912 : ‘मिल्टन फ्रिडमन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 2006)
  • 1918 : ‘डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर’ – संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 2000)
  • 1919 : ‘हेमू अधिकारी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
  • 1941 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2004)
  • 1947 : ‘मुमताज’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘मनिवंनान’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2013)
  • 1965 : ‘जे. के. रोलिंग’ – हॅरी पॉटर च्या लेखिका यांचा जन्म.
  • 1992 : ‘श्रेया आढाव’ – आहारतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1992 : ‘कियारा अडवाणी’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1750 : ‘जॉन (पाचवा)’ – पोर्तुगालचा राजा यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1689)
  • 1805 : ‘धीरान चिन्नमलाई’ – तामिळ सरदार यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1765)
  • 1865 : ‘जगन्नाथ शंकर शेटे’ – आधुनिक मुंबईचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1803)
  • 1875 : ‘अँड्रयू जॉन्सन’ – अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1808)
  • 1940 : ‘उधम सिंग’ – भारतीय कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1899)
  • 1968 : ‘पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1867)
  • 1980 : ‘मोहंमद रफी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1924 – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
  • 2014 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 23 जून 1948)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on        

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search