Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: दिवा–चिपळूण मेमू सेवा कायमस्वरूपी झाल्याची बातमी खोटी; रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

   Follow us on        

दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित किंवा कायमस्वरूपी मान्यता मिळाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांमध्ये पसरवल्या जात आहेत. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वेच्या अधिकृत माहितीपत्रकात  म्हटले आहे की, “सध्या दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवीन कायमस्वरूपी किंवा नियमित गाड्यांबाबत कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमांतून देण्यात येईल.”

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, प्रेस नोट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी.

दरम्यान, कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेमू सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असून, अनेक प्रवाशांनी तिला नियमित करण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वेने या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात भरती; जाहिरात प्रसिद्ध

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली २०२४–२०२५ या वर्षाकरिता खालीलप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई – ७६ पदे

चालक पोलीस शिपाई – ९ पदे

उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ अशी आहे.

भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती आणि अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी:

http://policerecruitment2025.mahait.org

http://www.sindhudurgpolice.co.in

http://www.mahapolice.gov.in

ही माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.

 

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुण्याचा तरुण बुडाला

   Follow us on        

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढला गेल्याने पुण्यातील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल शिवाजी वाघमारे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. पोहत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेशुद्ध झाला.

त्याच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

स्थानिकांनी तातडीने त्याला वादळ-खांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता “छत्रपती संभाजीनगर”

   Follow us on        

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे बदलून “छत्रपती संभाजीनगर” असे करण्यात आले आहे. या बदलास केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून स्थानकाचा नवीन कोड CPSN असा असणार आहे.

आता पुढे “औरंगाबाद” ऐवजी सर्व रेल्वे फलक, आरक्षण तिकीट प्रणाली आणि घोषणांमध्ये “छत्रपती संभाजीनगर” हे नाव वापरले जाईल. रेल्वे प्रवाशांना आणि नागरिकांना याबाबत दक्षिण मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे ऐतिहासिक शहराच्या नावात बदल करत “छत्रपती संभाजीनगर” हे नाव अधिकृतपणे भारतीय रेल्वेच्या नोंदीत समाविष्ट झाले आहे.

Railway Accident : रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

No block ID is set

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील सुरत-भुसावळ मार्गावर पाळधी येथील स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर धोकादायक पद्धतीने ‘रील’ (Reel) बनवण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन समवयस्क तरुणांचा धावत्या रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र ननवरे (१८) (दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव) अशी आहेत.

रविवारी सुट्टी असल्याने हे दोघे पाळधी स्थानकापासून जवळच असलेल्या पथराड गावाकडील गेटजवळ सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे मार्गावर उभे राहून रील बनवत होते. त्याच वेळी धरणगावच्या दिशेकडून जळगावकडे जाणारी ‘अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस’ आली.

प्रशांत आणि हर्षवर्धन यांनी कानावर हेडफोन लावलेले असल्याने, रेल्वे रुळांजवळ आलेल्या या वेगातल्या गाडीकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. यामुळे रेल्वे अगदी जवळ आल्यानंतर त्यांना जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धोकादायक ठिकाणी रील बनवण्याच्या फॅडमुळे तरुणांचे जीव जात असल्याच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

 

 

‘ओंकार’ ने रोखला मुंबई गोवा महामार्ग; दीड तास वाहतूक ठप्प

   Follow us on         बांदा: मागील काही दिवसांपासून बांदा, माडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हैदोस माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवडेव व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.

शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.

वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुलि गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात धैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीची सावट पसरले आहे.

 

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरच दिसणार ‘डिजिटल कोच इंडिकेटर’

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील उघड्या जागेत तसेच शेड परिसरात दुहेरी दिशेच्या मार्गदर्शक प्रदर्शन फलक (सीजेमबीडी) पुरवठा, स्थापित करणे, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

या कामासाठी निविदा क्रमांक KR-RN-S&T-07-2025-26 असून एकूण अनुमानित खर्च 19.84 लाख रुपये (जीएसटीसह) निश्चित करण्यात आला आहे. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025, दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.

निविदेसाठी ईएमडी रक्कम 39,700 ठेवण्यात आली असून इच्छुक आणि पात्र ठेकेदारांनी अधिक माहितीसाठी www.ireps.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश 

२६ जानेवारी २०२५ च्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील ऑफिसमधे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सावंतवाडी येथे ही डिजिटल कोच इंडिकेटर करिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणती गाडी प्लॅटफॉर्म ला उभी आहे आणि त्या गाडीतील कोच प्लॅटफॉर्मवर कोणत्या स्थानी लागला आहे हे कळणे आता सुलभ होईल.

हे सर्व कोकणवासीयांचा एकजुटीमुळे शक्य झाले आहे. सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी प्रथम लिफ्ट आणि आता कोच इंडिकेटर सारखी कामे सावंतवाडी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर १७० मीटरची निवारा शेड देखील होईल हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली आहे.

Railway Updates: एसी कोचमधील ब्लँकेटसाठी ‘न्यू सांगानेरी कव्हर’; प्रवाशांना मिळणार स्वच्छतेचा आणि आरामाचा नवा अनुभव

   Follow us on        

Railway Updates: रेल्वेने एसी कोचमधील प्रवास आणखी स्वच्छ आणि आरामदायी करण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. जयपूर-असरवा (अहमदाबाद) ट्रेनमध्ये आता ब्लँकेटसाठी जयपूरची प्रसिद्ध सांगानेरी प्रिंट असलेली कव्हर्स वापरण्यात येणार आहेत. ही कव्हर्स दिसायला आकर्षक असून साफसफाईलाही सोपी आहेत.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नवीन कव्हरमुळे प्रवाशांच्या ब्लँकेटबाबतच्या तक्रारी कमी होतील आणि प्रवासाचा दर्जाही उंचावेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “या ब्लँकेट कव्हर सुविधेमुळे प्रवाशी स्वच्छतेबाबत निश्चिंत राहू शकतील.”

सांगानेरी प्रिंटची खासियत म्हणजे ती टिकाऊ, आकर्षक आणि रंग न फिके होणारी असते. अनेक वेळा धुतल्यानंतरही या प्रिंटची सुंदरता टिकून राहते. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी ब्लँकेटचा अनुभव मिळणार आहे.

सध्या ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून ती यशस्वी ठरल्यास देशातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

 

M2M Princess: मुंबईतून समुद्रमार्गे थेट कोकणात जाणारी पहिली रो-रो सेवा

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते थेट कोकणापर्यंत सागरी वाहतूक सुरू होणार असल्याने कोकणकरांमध्ये या सेवेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई ते कोकण या रो-रो सेवेचा पहिला टप्पा सध्या मुंबई ते मांडवा या मार्गावर सुरू झाला आहे. भाऊचा धक्का येथून या फेरीचं सुटणं होतं. पूर्वीप्रमाणेच जिथं जुन्या रो-रो फेरीचं तिकीट कक्ष होतं, तिथेच या नव्या सेवेसाठीसुद्धा तिकीट मिळत आहे.

‘M2M प्रिन्सेस’ असं या नव्या रो-रो फेरीचं नाव असून, या जहाजात सुमारे 50 कार आणि 30 दुचाकी पार्क करण्याची सोय आहे. ही एक ‘हाय स्पीड क्राफ्ट’ असून तिचा अधिकाधिक वेग 25 ते 30 नॉट्स इतका आहे.

मुंबई ते मांडवा हे सुमारे 10 नॉटिकल मैलांवरचं अंतर ही फेरी साधारण 35 मिनिटांत पार करते. प्रवाशांसाठी फेरीमध्ये विविध श्रेणीतील आसनव्यवस्था असून रिक्लायनर सीट आणि स्कोडा स्लाविया लाऊंजमधील बॅक आणि फूट रिकलायनर सीट्ससारखे आरामदायी पर्यायही उपलब्ध आहेत.

सध्या प्राथमिक स्तरावर मुंबई ते मांडवा या प्रवासाचं तिकीट ५५० प्रति व्यक्ती आहे, तर कोकणापर्यंतच्या प्रवासासाठीचं अपेक्षित तिकीटदर ७००० प्रति व्यक्ती इतका असेल. त्यामुळे मांडवापर्यंतचा प्रवास तुलनेनं अधिक किफायतशीर ठरतो.

दरम्यान, कोकणापर्यंतचा रो-रो प्रवास अद्याप सुरू झालेला नसून, तो पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागतील. मात्र, या प्रवासादरम्यान समुद्राच्या विशाल लाटांमधून कोकणात पोहोचण्याचा अनुभव प्रवाशांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.

मध्य रेल्वेच्या ताप्यात लवकरच नवीन एसी लोकल, १५ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारगार

   Follow us on        

मुंबई : मध्य रेल्वेच्या ताप्यात एक नवीन एसी लोकल लवकरच धावणार असून, या लोकलच्या फेऱ्या १५ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहेत. सध्या ‘मुंबईच्या प्रवास’ गरमागरम होणार आहे. नवीन एसी रेल्वेची आवक झाल्यामुळे आरामदायी थंडगार प्रवासाचा आनंद लोकांना मिळणार आहे.

चेंन्नईहून मुंबईसाठी रवाना होईल. त्याची टेस्टिंग करून काही आठवड्यांमध्ये तो वापरात आणला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या मध्य रेल्वेकडे सात एसी लोकल आहेत, त्यापैकी सहा लोकलच्या माध्यमातून दिवसाला ८० फेऱ्या चालवल्या जातात. एक डेकेड एसी लोकल राखीव ठेवला जातो. नवीन एसी लोकलमुळे मध्य रेल्वेकडे एकूण आठ एसी लोकल होणार असून, या वापरात आणल्याने एसी लोकलच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

एका एसी लोकलच्या माध्यमातून १५ फेऱ्या वाढवल्या जातील. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूक दररोज ९५ एसी लोकलच्या फेऱ्या चालविल्या जातील. दरम्यान, या एसी लोकलची चाचणी चेंन्नईहून रवाना करण्यात आली असून, ती लवकरच मध्य रेल्वेच्या शर्यतीत दाखल होईल, अशी माहिती देण्यात आली.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search