Author Archives: Kokanai Digital

बारसू रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात? प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीचा ईतर देशातील प्रकल्पांकडे फोकस..

मुंबई –कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारणाऱ्या सौदी अर्माको ही कंपनी आता आपले लक्ष ईतर देशातील प्रकल्पामध्ये वळवताना दिसत आहे. या कंपनीने चीनमध्ये मोठा रिफायनरी प्रकल्प उभा करण्यासाठी नुकताच करार केला असून, चीनमधीलच आणखी एका प्रकल्पाचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे.त्यामुळे कोकणातील वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोकणात रिफायनरी प्रकल्प उभा करण्याची घोषणा २०१६ साली झाली होती. आधी हा प्रकल्प नाणार इथे होणार होता. स्थानिकांचा विरोध झाल्याने नंतर बारसू इथे हा प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बारसू इथेही विरोध होत आहे. त्यात अजून या प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागा संपादित व्हायची आहे. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे सौदी आर्माको या कंपनीने आपले लक्ष आपल्या इतर देशातील प्रकल्पाकडे वळविल्याचे दिसत आहे.

मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गोष्टीचा परिणाम बारसू येथील रिफायनरीवर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिफायनरीला होणारा विरोध कमी झाला असून प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे ते म्हणाले.

नागरिकांना दिलासा; पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची मुदत वाढविण्यात आली

Navi Delhi:केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिकिंग करणे अनिवार्य केले आहे त्यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख दिली होती. या तारखेनंतर ज्या नागरिकांचे  पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसतील त्यांची पॅनकार्ड रद्द होतील. त्याचा काहीच उपयोग करता येणार नाही. त्यामुळे असे नागरिक बँकिंग, म्युच्युअल फंड, शेअर बाजाराशी संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. बीएसई, एनएसई व्यवहार  करता येणार नाहीत. एकूण अशा नागरिकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांना थेट निर्बंध येतील असे जाहीर करण्यात आले होते. 
पण आज आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन ही मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नसेल त्यांना तसे करण्यास अवधी भेटला आहे. या तारखेनंतर ज्या नागरिकांचे  पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसतील त्यांची पॅनकार्ड रद्द होतील. पण असे नागरिक ३० दिवसांच्या अवधीत कार्ड लिंक करू शकतील पण त्यासाठी विशेष दंड वसूल करण्यात येणार आहे. 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मुंबई ते गोवा रेल्वेने प्रवास करताय? कोकण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त रेल्वेचा ‘हा’ पर्याय सुद्धा जाणून घ्या…

संग्रहित फोटो
Goa To Gujrat Railway: गोव्यातून मुंबई,पुण्यात तसेच गुजराथ राज्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. वास्को ते ओखा साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ऐन सुट्टीच्या हंगामात 28 मार्चपासून धावणार आहे. त्यामुळे गोव्यातून थेट मुंबई आणि गुजरात राज्यात  जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गे न धावता मडगाव, बेळगाव मार्गे पुणे येथून कल्याण ते वसई या मार्गाने धावणार आहे. 
वास्को-ओखा विशेष एक्स्प्रेस ओखा येथून 28 मार्च रोजी रात्री 9 वाजता निघेल व 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता वास्को येथे पोहोचेल. वास्को-ओखा एक्स्प्रेस 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल.
ही गाडी ओखा ते वास्को 28 मार्च, 04, 11, 18, 25 एप्रिल, मे महिन्यातील 02, 09, 16, 23, 30 आणि जूनमधील 06, 13, 20, 27 या तारखांना धावेल. ही गाडी एकूण 14 फेऱ्या करणार आहे.
वास्को ते ओखा 30 मार्च, त्यांतर 06, 13, 20, 27 एप्रिल, त्यानंतर मे मधील 04, 11, 18, 25 आणि जूनमधील 01, 08, 15, 22, 29 या तारखांना धावेल, एकूण 14 फेऱ्या करेल.
ही एक्स्प्रेस मडगाव, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, कामन रोड, वसई रोड, वापी, सुरत, भरुच, बडोदा, नादीद, अहमदाबाद, राजकोट, द्वारका या स्थानकावर थांबेल.
ओखा-वास्को एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक बुधवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी येईल व वास्को-ओखा एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक गुरुवारी रात्री 10 वाजता येईल.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाची धास्ती….

सिंधुदुर्ग – गोवा ही देशाची पर्यटन राजधानी मानली जाते. परंतु गोव्याच्या पर्यटनाला आता एका नवीन चिंतेने ग्रासले आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टीने पाहता गोवा राज्याची ही चिंता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनास नवा हुरूप देणारी ठरणार आहे. 

गोव्यातील समुद्रकिनारे आणि किनाऱ्यांवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. तथापि, गोव्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर महाराष्ट्रातील मालवणचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, अशी चिंता पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली. गोवा विधानसभा अधिवेशनात ते बोलत होते.

मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्यताील वॉटरस्पोर्ट्समध्ये दलालच बहुतांश वाटा घेऊन जातात आणि खुद्द वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर्सना मात्र कमी पैसे मिळत आहेत. जर यावर नियमन असणारी यंत्रणा लवकरात लवकर आणली नाही तर हा प्रश्च चिघळेल. पर्यटन क्षेत्रासमोर गंभीर समस्या उभी राहिल. शेजारीच महाराष्ट्रातील मालवण येथे वॉटरस्पोर्ट्स आहेत. ते राज्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर मोठे आव्हान आहे, असे खंवटे म्हणाले.

हेही वाचा – मुंबई ते गोवा रेल्वेने प्रवास करताय? कोकण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त रेल्वेचा ‘हा’ पर्याय सुद्धा जाणून घ्या…

पर्यटन मंत्री यांची चिंता रास्त आहे. गोवा राज्यात पर्यटन क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्र वेगळे आहे आणि समुद्र किनाऱ्यावर गर्दी कमी असते, तसेच गोव्यात जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यातील जवळ जवळ सर्व प्रकार ईथे अनुभवता येत आहेत. त्यामुळे एक स्वस्त पर्याय म्हणुन पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनार्‍यांना प्राधान्य देताना दिसत आहे.

<h3>Related posts:</h3>

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन विकसित होत आहे कि नाही या प्रश्नाचे उत्तर काहीही असो, गोवा राज्याच्या पर्यटन उद्योगाने येथील पर्यटनाच्या विकासाची धास्ती घेतली हे नक्की. 

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चेनाब रेल्वे पूलची यशस्वी चाचणी; पुलाच्या उभारणीत कोकण रेल्वेचे महत्वपूर्ण योगदान

Indian Railway News :पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असणारे चेनाब रेल्वे पूल पूर्ण झाले असून काल दिनांक 26 मार्च रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत उधमपुर – श्रीनगर – बारामुल्ला या रेल्वे मार्गावर एक चाचणी पण घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून लवकरच हा पूलाचे लोकार्पण करण्याची आशा आहे. 

 जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रिज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.

1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. चेनाब ब्रिजमध्ये, 93 डेक सेगमेंट (deck segment), ज्याचे प्रत्येकी वजन सुमारे 85 टन आहे, एकाच वेळी दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले आहेत.

कोकण रेल्वेच्या मदतीनं पुलाची उभारणी

उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली आहे. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या जीवन कार्यावर प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मुंबई – नटवर्य प्रभाकर पणशीकर जयंती निमित्त गुरूवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ,मिनी थिएटर, ३ रा मजला, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात मंदार व्यास (गायक),, श्रेयस व्यास (गायक) आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांच्या कडून झाले.

हेही वाचा- नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी अनोखे ‘पत्र लिहा’ आंदोलन

कार्यक्रमाचे अध्यक्ष व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे प्रकल्प संचालक श्री.संतोष रोकडे साहेब,नटवर्य प्रभाकर पणशीकरांची ज्येष्ठ कन्या सौ. जान्हवी पणशीकर सिंह, लेखक दिग्दर्शक महेंद्र पाटील, आय. बी. एन. लोकमत चे वैभव राणे आदी मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यात आले.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन पु. ल. देशपांडे कला अकादमी चे प्रकल्प संचालक श्री. संतोष रोकडे साहेब यांनी स्वागत केले. सौ जान्हवी पणशीकर सिंह यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. संतोष रोकडे साहेबांनी मार्गदर्शनपर भाषण केले. या कार्यक्रमात मंदार व्यास (गायक),, श्रेयस व्यास (गायक) यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नाटकातील नाट्यसंगीत व शास्त्रीय गायन सादर केले.गौरी कुलकर्णी राणे (तानपुरा), निनाद कुणकवळेकर (तबला), अथर्व चांदोरकर (हार्मोनियम ) यांनी त्यांना साथसंगत केली.तसेच प्रशांत तांबे, लेखक , दिग्दर्शक ज्ञानेश्वर शिंदे, आकाश उबाळे,कवियीत्री दया चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यांना पुषपगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले. अमेय रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले

‘दारू पिऊ नकोस’ असा सल्ला मित्राला देत असाल तर सावधान; असा सल्ला देण्यापूर्वी ही बातमी वाचा

रत्नागिरी :  वारंवार दारू पिणे चांगले नाही असा सल्ला जर तुम्ही कोणा मित्राला देत असाल तर सावधान. कारण असा असा सल्ला देणाऱ्याच्या जीवावर बेतल्याची एक घटना राजापूर येथे घडली आहे. 

वारंवार दारु पिऊ नकोस, कामधंदा कर असे सांगितल्याचा राग धरुन एकाला बांबूने डोक्यात मारहाण करुन जखमी केल्याची घटना येथे घडली आहे . याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ विश्राम परवडी (धोपेश्वर, तिठवली राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विश्राम धोंडू परवडी (धोपेश्वर, तिठवली राजापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ परवडी याला दारुचे व्यसन आहे. त्याची दारु सुटावी यासाठी विश्राम परवडी यांनी दारु सोडण्यास सांगितले. याचा राग विश्वनाथ याच्या मनात होता. 24 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान विश्राम परवडी हे काजूच्या बिया जमा करत असताना विश्वनाथ परवडी तिथे आला त्याने रागात हातातील बांबूच्या काठीने विश्राम यांच्या डोक्यात दोन फटके मारुन दुखापत केली. तसेच पाठीतही एक फटका मारुन मुका मार लागला. मी दारु पिऊन येईन व काहीही करेन मला काही सांगायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत विश्राम परवडी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विश्वनाथ याच्यावर भादविकलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी अनोखे ‘पत्र लिहा’ आंदोलन

मुंबई – एकीकडे नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाडयांना दक्षणेकडील राज्यात थांबे देण्याचा सपाटा लावला असताना अनेक वेळा आंदोलने करूनही रेल्वे प्रशासनाने या गाडयांना संगमेश्वर रोड या स्थानकावर प्रायोगिक तत्वावरसुद्धा थांबा दिला नसल्याने संगमेश्वरवासीय प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपली नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना ‘पत्र लिहा’ हे अनोखे आंदोलन संमेश्वरवासियांनी सुरु केले आहे.
नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड थांब्या संदर्भात संयुक्त बैठक घेण्याबाबत प्रवाशांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जन शिकायत कार्यालय, पहिला मजला, चर्चगेट रेल्वे स्टेशन, मुंबई-400020 येथे पाठवावे असे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या घरामधील जेवढे सदस्य आणि मित्र परिवार मंडळी असतील त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फ्रॉम भरून एकत्र पोस्टाने पाठवावे. आणि त्याची पावती 9819200887 ह्या नंबर वर पाठवणे असेही आवाहन केले गेले आहे. 
जास्तीत जास्त नागरिकांनी या पत्राची प्रिंट काढून आपला नाव, पत्ता व संपर्क भरून रेल्वे राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पाठवल्यास संगमेश्वर रोड थांब्यासंदर्भातील संयुक्त बैठक घेण्याबाबत विचार होईल आणि आपल्या मागणी संदर्भात विचार करण्यास भाग पडेल असा या आंदोलनाच्या मागे हेतू आहे.
दिवा शहरात जोरदार प्रतिसाद
आज दिवा शहरातील कोकणवासीय प्रवाशांनी या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद देत याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या  संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे  यांना पत्रे लिहुन मागणी केली आहे. आज दिवा शहरातील कोंकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अवघ्या दोन तासात सुमारे 1743 मागणीपत्रे तयार करून देऊन उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. अजुनही हजारो  प्रवाशी अशी मागणीपत्र देणार असुन ती लवकरच रेल्वे राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात येतील असे पत्रकार श्री संदेश जिमन यांनी यावेळी सांगितले.

Continue reading

काजूच्या दरात घसरण; काजू बागायतदार हैराण..

रत्नागिरी | रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा (Raw Cashew nuts) दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. दोन्ही जिल्ह्यात काजूचा दर किलोला ११० ते ११५  रुपये प्रति किलोवर आला आहे. सुरवातीला १३५ रुपये प्रति किलो असेलेला दर असा पडत असल्यामुळे त्यामुळे काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे.
कोरोनापूर्वी हा दर प्रतिकिलो १५० वर होता; परंतु कोरोना काळात तो ९० रुपयांवर आला. त्यानंतरच्या काळात हा दर १३०/१३५ रुपयापर्यंत आला. यंदाही हा दर १३५ रुपयापर्यंत गेला होता; परंतु आता तो १२० रुपये प्रति किलोपेक्षाही खाली गेला आहे. या मध्ये लक्ष न घातल्यास त्यापेक्षाही हा दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावठी काजू कोणी व्यापारी घेत नाही, घेतल्यास बाजारात चाललेल्या बाजारभावापेक्षा कमी भावात घेतल्या जातात. त्यामुळे कलमी काजू आणि गावठी काजुंसाठी दोन वेगवेगळे दर काही बाजारात चालू आहेत. 
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी काजूला हमीभाव द्यावा तसेच केंद्राने काजूवरील कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावेअशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना आणि जिल्हा बागायतदार संघटनेने संयुक्तपणे केली आहे. 

Block "aadhar-pan" not found

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

परशुराम घाट आठवडाभरासाठी वाहतुकीस बंद राहणार

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे या मार्गावरील परशुराम गटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, या कामासाठी परशुराम घाट बंद राहणार असल्याचे कळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक वर्ष सुरू आहे. मार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाट हा २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परशुराम घाट बंद ठेवण्याबाबतचे नियोजन येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही घोषणा झालेली नाही.  घाट नेमका कोणत्या दिवशी व किती वेळ कसा बंद करायचा याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून येत्या २-३ दिवसांत याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच हा निर्णय घेतला जाणार आहे.

सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या में.कशेडी परशुराम हायवे प्रा.ली.यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतूकीसाठी दि. २७ मार्च २०२३ ते दिनांक ०३ एप्रिल २३ या कालावधीत ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यासाठी व संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी परशुराम घाट दि. २७ मार्च २०२२ ते दिनांक ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत दु. १२.०० संध्याकाळी ६.०० वाहतुकीसाठी बंद ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे.

Block "aadhar-pan" not found

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search