Author Archives: Kokanai Digital

Kudal: कुडाळ आगारात टेलिफोन आणि एस टी फेऱ्यांचा सावळा गोंधळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आगाराला जो सावळा गोंधळ चालू आहे तो त्वरीत थांबवावा आणि कायम स्वरुपी नवीन चालू दूरध्वनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. प्रासीद्धिस दिलेल्या पत्रकात बापर्डेकर म्हणाले की कुडाळ डेपोचा कोरोना काळापासून दूरध्वनी नव्हता तो आजमितीस सुस्थितीत नाही. अधून मधुन तिघांचे मोबाईल नंबर बाहेर पेपर फलकावर लावलेले परंतु तो ज्या आधीकारि वर्ग अगर विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रकजवळ असतो ते कधीच फोन उचलत नाही . रिंग वाजून जाते . मुंबई हून कुडाळ रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी अगर स्टेशनला आल्यावर अगर मालवाहून कुडाळला जायचं असेल मग स्वतःचा फोन असुदे की इतरांच्या फोन वरून केव्हाही मालवण एस टी बस संबंधी विचारपूस करिता फोन केला तर त्याठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्याजवळ आहे ते रिंग वाजली तरी फोन उचलत नाही अशावेळी दमून भागून आलेल्या प्रवाशांनी करावं तरी काय .खाजगी वाहन की रिक्षेला भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा की कमी पैशात एस टी महामंडळाने प्रवास करण्यास ताटकळत रेल्वे स्टेशनला किंवा मालवण राहावे? असा प्रश्न या पत्रकात विचारला आहे.

मालवण आगार व्यवस्थापनाला मानाव लागतं ते मालवण आगाराच्या सर्व अधिकारी ,कर्मचारी यांना कारण त्यांचा कोरोना काळापासून दूरध्वनी आणि वाहतूक काही अपवाद वगळता आजपर्यंत बंद नाही.वाहतूकही कुडाळ ची बंद नाही.कुडाळला विचारले तर त्याचं एकच उत्तर मालवणवाल्याच आम्हाला काही विचारू नका ती आली तर सोडू परंतु कित्येकवेळा रेल्वे स्टेशनला न जाता कुडाळ आगारातूंनच बस वळविली जाते.याला जबाबदार कोण? याचे मूळ कारण कुडाळ आगाराला वाली नाही त्याचे बाप हे वर्क शॉप ठिकाणी बसतात तक्रार घेऊन दूरवर त्यांच्या पर्यंत जाणे कोणत्याही प्रवाशांना शक्य नाही.कुडाळ मालवण कुडाळ एस टी फेऱ्याना प्रवाशांन बरोबर शाळा ,कॉलेज विद्यार्थी तर कित्येक वेळा सरकारी कर्मचारी असतात मग अचानक एखादी गाडी रद्द करणे कारण नसताना उशिरा एस टी सोडणे प्रवाशांसोबत पर्यटक इतरांना कितपत परवडणार याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी .प्रवाशांनी लेखी तक्रार पुस्तकात तक्रार केली तर त्याच निरसन होत नाही.याला जबाबदार कोण आहेत. तरी येत्या पंधरा दिवसांत आगार व्यवस्थापक आणि आगार प्रमुख तसेच दूरध्वनी यांची व्यवस्था कायमस्वरूपी डेपोला ज्याठिकांनाहून जिल्ह्यातील बस सोडल्या जातात त्याठिकाणी करावी.अन्यथा आंदोलन करावे लागेल याची सूचना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सुरेश बापर्डेकर यांनी दिली आहे

   

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीच्या स्लीपर डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ह. निजामुद्दीन (दिल्ली) ते एर्नाकुलम (केरळ) दरम्यान चालणाऱ्या ‘दुरंतो एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३) मध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

लांब पल्ल्याची ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावत कोकण रेल्वे मार्गे जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणी लक्षात घेता, डब्यांची रचना पुढीलप्रमाणे बदलण्यात येत आहे:

 

   

सध्याची कोच रचना (एकूण १९ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०३
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

सुधारित कोच रचना (एकूण २२ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०६ (पूर्वीपेक्षा ३ डब्यांनी वाढ)
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

यामुळे प्रवाशांना विशेषतः स्लीपर प्रवर्गात अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

सुधारित कोच रचना लागू होण्याच्या तारखा:
गाडी क्र. १२२८४ (ह. निजामुद्दीन – एर्नाकुलम) : दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ पासून
गाडी क्र. १२२८३ (एर्नाकुलम – ह. निजामुद्दीन) : दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून

गाडीच्या मार्गातील थांबे, वेळापत्रक आणि इतर तपशीलांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES (National Train Enquiry System) मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी याबदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

२७ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 22:44:25 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 16:24:17 पर्यंत
  • करण-तैतिल – 10:39:08 पर्यंत, गर – 22:44:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 27:13:32 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:16
  • सूर्यास्त- 19:14
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 08:24:59
  • चंद्रास्त- 21:15:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • CRPF स्थापना दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1663 : ब्रिटीश संसदेने एक कायदा संमत केला ज्याने अमेरिकेसाठी बंधनकारक असलेल्या सर्व वस्तू इंग्रजी जहाजांमधून इंग्रजी बंदरांमधून पाठवणे बंधनकारक केले.
  • 1761 : माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे झाले.
  • 1866 : व्हॅलेन्सिया बेट, आयर्लंड ते ट्रिनिटी बे, कॅनडापर्यंत समुद्राखालील केबल पूर्ण झाली. युरोप आणि अमेरिका यांच्यात टेलिग्राफिक संदेश पाठवणे शक्य झाले.
  • 1890 : डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांनी स्वतःवर गोळी झाडली. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
  • 1921 : टोरंटो विद्यापीठाचे सर फ्रेडरिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांना शुद्ध स्वरूपात इन्सुलिन वेगळे करण्यात यश आले.
  • 1939 : CRPF अस्तित्वात आले.
  • 1940 : अ वाइल्ड हेअर या ॲनिमेटेड शॉर्ट फिल्ममध्ये बग्स बनी हे पात्र दिसले.
  • 1949 : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • 1955 : मित्र राष्ट्रांनी ऑस्ट्रियामधून आपले सैन्य मागे घेतले.
  • 1976 : जपानचे माजी पंतप्रधान काकुई तनाका यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
  • 1990 : बेलारूसने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1997 : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 1999 : द्रपेट्रोलियम मंत्रालयाने लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
  • 2001 : सार्वजनिक ठिकाणी, सरकारी इमारतींमध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
  • 2012 : लंडनमध्ये 30व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1667 : ‘योहान बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1748)
  • 1899 : ‘पर्सी हॉर्नी ब्रूक’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1911 : ‘डॉ. पां. वा. सुखात्मे’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1997)
  • 1915 : ‘जॅक आयव्हरसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1940: ‘भारती मुखर्जी’ – भारतीय- अमेरिकन लेखिका यांचा जन्म.
  • 1954 : ‘जी.एस. बाली’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1955 : ‘अ‍ॅलन बॉर्डर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ – महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1963 : ‘नवेद अंजुम’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1967 : ‘राहुल बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1983 : ‘सॉकर वेल्हो’ – भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1844 : ‘जॉन डाल्टन’ – इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 सप्टेंबर 1766)
  • 1895 : ‘उस्ताद बंदे अली खाँ बीनकार’ – किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादक यांचे निधन.
  • 1975 : ‘मामासाहेब देवगिरीकर’ – गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले यांचे निधन.
  • 1980 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1919)
  • 1992 : ‘अमजद खान’ – हिन्दी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1940 – गझनी, अफगाणिस्तान)
  • 1997 : ‘बळवंत लक्ष्मण वष्ट’ – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 2002 : ‘कृष्णकांत’ – भारताचे 10वे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1927)
  • 2007 : ‘वामन दत्तात्रय पटवर्धन’ – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1917)
  • 2015 : ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम’ – भारताचे 11 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1931)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२६ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 22:44:26 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 15:53:21 पर्यंत
  • करण-बालव – 11:00:02 पर्यंत, कौलव – 22:44:26 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्यतापता – 28:06:11 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:12:56
  • सूर्यास्त- 19:16:43
  • चन्द्र-राशि-कर्क – 15:53:21 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:29:00
  • चंद्रास्त- 20:38:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • कारगिल विजय दिवस
  • राष्ट्रीय काकू आणि काका दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1509 : सम्राट कृष्णदेवरायाने विजयनगर साम्राज्याचे पुनरुज्जीवन सुरू केले.
  • 1788 : न्यूयॉर्क हे अमेरिकेचे 11 वे राज्य बनले.
  • 1745 : गिल्डफोर्ड येथे इंग्लंडमधील पहिला महिला क्रिकेट सामना खेळला गेला.
  • 1847 : लायबेरिया स्वतंत्र झाला.
  • 1891 : फ्रान्सने ताहिती बेटे काबीज केली.
  • 1892 : दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.
  • 1953 : फिडेल कॅस्ट्रोच्या मोनकाडा बॅरेक्सवरील अयशस्वी हल्ल्याने क्यूबन क्रांती सुरू झाली, ही चळवळ 26 जुलै क्रांती म्हणून ओळखली जाते.
  • 1956 : जागतिक बँकेने अस्वान धरणाच्या बांधकामासाठी वित्तपुरवठा करण्यास नकार दिल्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
  • 1963 : सिन्कोमा, पहिला भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित झाला.
  • 1965 : युनायटेड किंगडमपासून मालदीवचे स्वातंत्र्य.
  • 1971 : अपोलो 15 चे प्रक्षेपण करण्यात आले.
  • 1994 : सनईवादक उस्ताद बिस्मिला खान यांना राजीव गांधी सदिच्छा पुरस्कार जाहीर.
  • 1998 : विश्वनाथन आनंदला बुद्धिबळातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठित बुद्धिबळ ऑस्करने सन्मानित करण्यात आले.
  • 1999 : भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
  • 2005 : मुंबई परिसरात 24 तासात सुमारे 995 मिमी पाऊस, ज्यामुळे पूर आला आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
  • 2008 : अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 56 ठार आणि 200 जखमी.
  • 2016 : सोलार इम्पल्स 2 – पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
  • 2024 : 33 व्या उन्हाळी ऑलिंपिक आवृत्तीचे फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये सुरुवात.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1856 : ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 2 नोव्हेंबर 1950)
  • 1865 : ‘रजनीकांत सेन’ – भारतीय कवी आणि संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1910)
  • 1875 : ‘कार्ल युंग’ – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 1961)
  • 1893 : ‘पं. कृष्णराव शंकर पंडित’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1989)
  • 1894 : ‘वासुदेव गोविंद मायदेव’ – कवी समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1969)
  • 1894 : ‘अल्डस हक्सले’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1963)
  • 1094 : ‘एडविन अल्बर्ट लिंक’ – फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 7 सप्टेंबर 1981)
  • 1927 : ‘जी. एस. रामचंद’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1928 : ‘इब्न-ए-सफ़ी’ – भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 1980)
  • 1939 : ‘जॉन हॉवर्ड’ – ऑस्ट्रेलियाचे 25वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1942 : ‘व्लादिमिर मेसियर’ – स्लोव्हेकियाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1949 : ‘थाकसिन शिनावात्रा’ – थायलंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1954 : ‘व्हिटास गेरुलायटिस’ – अमेरिकन लॉन टेनिसपटू यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 1994)
  • 1955 : ‘असिफ अली झरदारी’ – पाकिस्तानचे 11वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1971 : ‘खलिद महमूद’ – बांगलादेशी क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1986 : ‘मुग्धा गोडसे’ – अभिनेत्री मॉडेल यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 811 : 811ई.पुर्व : ‘निसेफोरस’ – बायझेन्टाईन सम्राट यांचे निधन.
  • 1380 : ‘कोम्यो’ – जपानी सम्राट यांचे निधन.
  • 1843 : ‘सॅम ह्युस्टन’ – टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1867 : ‘ओट्टो’ – ग्रीसचा राजा यांचे निधन.
  • 1952 : ‘एव्हा पेरोन’ – अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी यांचे निधन.
  • 1891 : ‘राजेन्द्रलाल मित्रा’ – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 फेब्रुवारी 1824)
  • 2009 : ‘भास्कर चंदावरकर’ – मराठी नाट्य चित्रपट संगीतकार यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1936)
  • 2010 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 20 डिसेंबर 1945)
  • 2015 : ‘बिजॉय कृष्णा हांडिक’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1934)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Weather Updates: पुढील २४ तास महत्त्वाचे! मुंबईसह कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

   Follow us on        

Weather Update: पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.

किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध किनारपट्टी जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ते २६ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत समुद्रात लाटांची उंची सुमारे ३.८ मीटर ते ४.७ मीटर पर्यंत असू शकते.

हा इशारा विशेषतः ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील किनारपट्टी भागांसाठी लागू आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या उंच लाटा आणि संभाव्य वादळवाऱ्यांमुळे समुद्र परिस्थिती अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे, लहान होड्यांचे मालक, मासेमारी करणारे आणि किनारपट्टीवरील रहिवासी यांना खबरदारीचे उपाय घेण्याचे आणि या कालावधीत समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडूनही स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, समुद्र किनारी जाणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

 

२४ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 24:43:10 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 16:44:50 पर्यंत
  • करण-चतुष्पाद – 13:33:50 पर्यंत, नागा – 24:43:10 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-हर्शण – 09:50:45 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-मिथुन – 11:00:11 पर्यंत
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 19:11:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस
  • नॅशनल कजिन(चुलत भाऊ) दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1567 : स्कॉट्सच्या मेरी क्वीनचा त्याग झाला आणि 1 वर्षीय जेम्स (VI) स्कॉटलंडच्या सिंहासनावर आरूढ झाला.
  • 1704 : ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
  • 1823 : चिलीमध्ये गुलामगिरी संपली.
  • 1911 : हिराम बिंघम – 3रा याने पेरूमधील माचू पिचू या प्राचीन इंका शहराचा शोध लावला.
  • 1931 : पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया येथील एका नर्सिंग होमला लागलेल्या आगीत 48 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1943 : दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – मित्र राष्ट्रांनी हॅम्बर्ग, जर्मनीवर बॉम्बहल्ला सुरू केला.
  • 1969 : अपोलो-11 पॅसिफिक महासागरात यशस्वीरित्या उतरले.
  • 1974 : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बेकायदेशीरपणे स्वत :च्या विरोधात पुरावे रोखून धरले.
  • 1990 : इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्य जमा करण्यास सुरुवात केली.
  • 1997 : बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1997 : माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 1998 : परकीय चलन नियमन कायदा (FERA) च्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) लागू करण्यात आला.
  • 2000 : चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रहण्यम ही विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली.
  • 2001 : शिखा टंडनने टोकियो येथील जागतिक जलतरण स्पर्धेत 100 मीटर फ्रीस्टाइल जिंकली. हे अंतर 59.96 सेकंदात पार केले.
  • 2005 : लान्स आर्मस्ट्राँगने सलग सातव्यांदा टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
  • 2019 : बोरिस जॉन्सन – युनायटेड किंगडमचे 77 वे पंतप्रधान बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1786 : ‘जोसेफ निकोलेट’ – फ्रेंच गणितज्ञ संशोधक यांचा जन्म.
  • 1851 : ‘फ्रेडरिक शॉटकी’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1911 : ‘गोविंदभाई श्रॉफ’ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म.
  • 1911 : ‘पन्नालाल घोष’ बासरीवादक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1960)
  • 1928 : ‘केशुभाई पटेल’ – भारतीय राजकारणी, गुजरातचे दहावे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1937 : ‘मनोज कुमार’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1945 : ‘अझीम प्रेमजी’ – विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन यांचा जन्म.
  • 1969 : ‘जेनिफर लोपेझ’ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1129 : ‘शिराकावा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1053)
  • 1970 : ‘पीटर दि नरोन्हा’ – भारतीय उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 19 एप्रिल 1897)
  • 1974 : ‘सर जेम्स चॅडविक’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1891)
  • 1980 : ‘उत्तम कुमार’ – बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1927)
  • 1980 : ‘पीटर सेलर्स’ – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक यांचे निधन. (जन्म : 8 सप्टेंबर 1925)
  • 2012 : ‘रॉबर्ट लिडले’ – सीटी स्कॅन चे शोधक यांचे निधन. (जन्म : 28 जुन 1926)
  • 2017 : ‘हर्षिदा रावल’ – भारतीय गुजराती पार्श्वगायिका
  • 2020 : ‘अमला शंकर’ – भारतीय नृत्यांगना


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवा सध्या नकोच

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोलाड (महाराष्ट्र) – वर्ना (गोवा) दरम्यान जाहीर करण्यात आलेली Ro-Ro (Roll-on/Roll-off) कार-फेरी रेल्वे सेवा ही संकल्पना नाविन्यपूर्ण असली तरीही, सध्या ही सेवा सुरू करणे अत्यंत गैरसोयीचे आहे. म्हणून, ही सेवा तत्काळ रद्द करण्यात याव, त्याऐवजी, हीच वेळ, ट्रॅक स्लॉट, मनुष्यबळ आणि संसाधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आली आहे.

Ro-Ro सेवेसंदर्भातील मुख्य आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत:

१. वेळ आणि खर्चात फारसा फरक नाही:

रस्त्याने कोलाड ते वेर्णा प्रवासास सध्या १० ते १२ तास लागतात, तर Ro-Ro सेवेमुळे रेल्वेने १२ तासांचा प्रवास आहे. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ₹७,८७५ प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

२. एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य:

गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७ सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची गरज भासते, आणि एकत्र प्रवासाचा हेतूचसाध्य होत नाही.

३. मर्यादित साधनसंपत्तीचा अपव्यय:

Ro-Ro गाडी चालवण्यासाठी लोको पायलट, सहायक, ट्रेन मॅनेजर आदींचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्यबळ आणि मार्ग वापरून एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवता आली असती, जी अधिक उपयोगी ठरली असती.

४. आधीच व्यापलेल्या मार्गावर आणखी भार:

कोकण रेल्वे मार्ग गणपती काळात अत्यंत गजबजलेला आणि तणावाखाली असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करू शकते.

५. मधल्या स्थानकांवर चढ-उतार सुविधा नाही:

रो-रो सेवेसाठी कोलाड ते वेर्णा हा मार्ग थेट आहे. मार्गामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील स्थानकांवर गाड्या लोड किंवा अनलोड करता येणार नाहीत, ज्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना याचा लाभच होणार नाही.

वरील गोष्टी लक्षात घेता, आपणास विनम्र विनंती आहे की:कोलाड–वेर्णा Ro-Ro सेवा रद्द करण्यात यावी, आणित्याऐवजी तिथे लागणारे स्लॉट, कर्मचारी आणि साधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल.

आपण यावर गांभीर्याने विचार करून जनहितासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

२३ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 26:31:11 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 17:55:25 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:34:14 पर्यंत, शकुन – 26:31:11 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्याघात – 12:34:03 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 19:16
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 29:25:00
  • चंद्रास्त- 18:17:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक स्जोग्रेन्स दिन
  • राष्ट्रीय व्हॅनिला आइस्क्रीम दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1840 : कॅनडाचे प्रांत एकीकरणाच्या कायद्याद्वारे तयार केले गेले.
  • 1903 : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली.
  • 1904 : चार्ल्स I. मेन्सियस यांनी आइस्क्रीम कोनचा शोध लावला.
  • 1927 : बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले.
  • 1929 : इटलीतील फॅसिस्ट सरकारने विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली.
  • 1942 : ज्यू एकाग्रता – ट्रेब्लिंका एकाग्रता शिबिर उघडले.
  • 1982 : आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने 1985-86 पासून व्यावसायिक व्हेलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
  • 1983 : एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या 13 सैनिकांची हत्या केली.
  • 1986 : हिपॅटायटीस बी लसीची सुरुवात.
  • 1995 : हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
  • 1999 : केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1856 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1920)
  • 1885 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1822)
  • 1886 : ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1976)
  • 1899 : ‘गुस्ताफ हाइनिमान’ – पश्चिम जर्मनीचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1906 : ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1931)
  • 1917 : ‘लक्ष्मीबाई यशवंत भिडे’ – नाट्य-चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1925 : ‘ताजुद्दीन अहमद’ – बांगलादेश चे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 3 नोव्हेंबर 1975)
  • 1936 : ‘शिव कुमार बटालवी’ – पंजाबी भाषेतील भारतीय कवी, लेखक आणि नाटककार यांचा जन्म.
  • 1927 : ‘धोंडुताई कुलकर्णी’ – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका यांचा जन्म.
  • 1947 : ‘डॉ. मोहन आगाशे’ – अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1953 : ‘ग्रॅहम गूच’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1961: ‘विक्रम चंद्र’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
  • 1961 : ‘मिलिंद गुणाजी’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1973 : ‘हिमेश रेशमिया’ – भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1975 : ‘सूर्य शिवकुमार’ – तमिळ अभिनेता यांचा जन्म.
  • 1976 : ‘ज्यूडीथ पोल्गार’ – हंगेरीची बुद्धीबळपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1885 : ‘युलिसिस ग्रांट’ – अमेरिकेचे 18वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1822)
  • 1997 : ‘वसुंधरा पंडित’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन.
  • 1999 : ‘दादासाहेब रूपवते’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1925)
  • 2004 : ‘महेमूद’ – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
  • 2012 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील कॅप्टन यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या नियोजनात अनेक त्रुटी; रेल्वे प्रवासी समितीने वेधले लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांची यादी प्रसिद्ध झाली. ही प्रवाशांना दिलासा देणारी बाब असली तरी या नियोजनात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी, आपण याकडे लक्ष देऊन आणखी गणपती विशेष गाड्या सोडताना काही गोष्टींचा विचार करावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे एका निवेदनातून करण्यात आली आहे. 

या निवेदनात समिती लिहिते….  

१. पुण्यातून सावंतवाडीसाठी एकही गाडी नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला कोंकणाचे वावडे?

यंदा मध्य रेल्वे तर्फे २५० गणपती विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मध्ये पुणे विभागातून केवळ १२ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ह्या १२ फेऱ्याही केवळ रत्नागिरीपर्यंतच असल्याने रत्नागिरी पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्यापही पुण्याहून आपल्या गावी जायला थेट रेल्वेगाडीची सोय नाही.

मात्र ह्याच पुणे विभागाने एप्रिल,मे,जून ह्या दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या म्हणून दानापूर, गोरखपूर, बनारस,गाझीपूर,जयपूर येथे तब्बल १९२ फेऱ्या चालवल्या होत्या. ह्यात अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फेऱ्या ह्या महाराष्ट्रात नसून इतर राज्यात जाणाऱ्या आहेत. जर ह्या फेऱ्या ३ महिन्यांपूर्वी चालवल्या जात होत्या तर मग आताच पुणे विभागाकडे विशेष गाड्या चालवण्याची क्षमता नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

२. ⁠चिपळूणसाठी फक्त ८ डब्यांची मेमू. संपूर्ण अनारक्षित गाडीचा फायदा केवळ गाडी सुटण्याच्या स्थानकातील प्रवाशांनाच होतो; त्यापुढील स्थानकांत गाडीत चढताच येत नाही.

येत्या गणेशोत्सवात सोडलेली ०११५५/०११५६ दिवा चिपळूण दिवा मेमू म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता विशेष गाडी सोडण्याची आवश्यकत

चिपळूण गाडी दादर आणि ठाण्याला थांबलीच पाहिजे. अन्यथा एवढ्या कमी अंतराच्या प्रवासासाठी गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, वरळी, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, कांदिवली, भाईंदर, विरार, वसई, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील प्रवासी दिवा किंवा पनवेलला गाडी बदलण्यास उत्सुक नसतात. अति गर्दीचे दिवस वगळता लोक या दिवा किंवा पनवेल गाडीने जाणे टाळतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरहून सुटल्यास चिपळूण गाडी वर्षभर गर्दीने भरून धावेल.

 संपूर्ण अनारक्षित गाडीत असल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना रेल्वेने आगाऊ आरक्षण करण्याचा पर्यायच दिलेला नाही. संपूर्ण अनारक्षित गाडी सुरुवातीच्या स्थानकातच पूर्णपणे भरत असल्यामुळे त्यापुढील स्थानकांतील प्रवाशांना या गाडीत जागा मिळत नाही. इतर स्थानकांवर केवळ गाड्यांची संख्या वाढलेली दिसते. त्याचा प्रवाशांना प्रत्यक्ष फायदा होत नाही. याउलट किमान काही आरक्षित डबे उपलब्ध असल्यास प्रवाशांना आपल्या जागेबाबत हमी मिळू शकते.

तसेच, ही दिलेली गाडीही केवळ आठ डब्यांची मेमू आहे. मुंबई ते कल्याण या ५५ किमीच्या मार्गावरही १२ डब्यांच्या गाड्या कमी पडत असून १५ किंवा १८ डब्यांची मागणी होत असताना दिवा चिपळूण या २३३ किमीसाठी भर गणेशोत्सवाच्या गर्दीच्या दिवसांत ८ डब्यांची गाडी देण्याची कल्पनाच चुकीची आहे. तसेच, खालील सीटच्या वरील भागात बसण्याची सोय नसणे तसेच, प्रत्येकी चार डब्यांमध्ये एक मोटार कोच असल्यामुळे मेमूची प्रवासी वहन क्षमता सामान्य गाडीपेक्षा ५०% कमी असते.

तरी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार तसेच सामान्य अनारक्षित डबे असलेली विशेष गाडी सोडावी. तसेच, ८ किंवा १२ डब्यांच्या मेमू न चालवता २२ डब्यांच्या गाड्याच चालवाव्यात.

३. ⁠गुजरातहून सावंतवाडीकरिता एकही गाडी नाही.

पश्चिम रेल्वेने गुजरातहून सोडलेल्या गाड्यांपैकी एकही गाडी सावंतवाडीपर्यंत जात नसल्यामुळे सध्या गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर विभागात राहणाऱ्या कोकणवासीयांना रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी एकही गणपती विशेष गाडी उपलब्ध नाही. तरी, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद येथून सावंतवाडी किंवा पेडणेपर्यंत एखादी विशेष गाडी सोडण्याची आवश्यकता आहे.

४. मध्य रेल्वेतर्फे द्वितीय श्रेणी आरक्षित आणि एसी चेअर कार प्रकारातील एकही गाडी नाही

सर्व विशेष गाड्या विशेष दरांवर चालवल्या जात असल्यामुळे स्लीपर प्रकारातील डब्यांसाठी किमान ५०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड अशा मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडे द्यावे लागते. उदा. ठाणे ते खेड प्रवासासाठी स्लीपर डब्याला सामान्य गाडीला प्रति प्रवासी १८५ रुपये आणि एसी थ्री टायरसाठी ५१५ रुपये भाडे असते तर विशेष गाडीला हेच भाडे स्लीपरला ३९० तर एसी थ्री टायरला १०६० रुपये द्यावे लागतात. हे नियमित गाडीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे.

म्हणूनच, दिवसा धावणाऱ्या सर्व गाडयांना सीटिंग आणि एसी चेअर कार डबे असावेत किंवा स्लीपर डबे सीटिंग म्हणून आणि एसी थ्री टायर डबे एसी चेअर कार म्हणून वापरावेत.

५. मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या वारंवारतेत मागील वर्षीपेक्षा कपात 

मागील वर्षी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल सावंतवाडी विशेष गाडी आठवड्यातून सहा दिवस सोडली होती. यावर्षी त्यात कपात करून ही गाडी आठवड्यातून केवळ चार दिवस सोडलेली आहे. परराज्यात भरभरून गाड्या सोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला महाराष्ट्रात गाड्या सोडण्यासाठी साधनसंपत्ती (डबे, इंजिन, पिटलाईन,ई.) उपलब्ध नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. तरी, पश्चिम रेल्वे मुंबई विभागाने आणखी काही गाड्यांची व्यवस्था करावी. 

६. मागील वर्षी खेड येथून सोडलेल्या गाड्या केवळ पनवेल पर्यंतच होत्या. त्या ऐवजी या गाड्या मध्य रेल्वेवर दादर किंवा पश्चिम रेल्वेवर वसई रोड पर्यंत चालवाव्यात.

वरील निवेदन समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी संबधित रेल्वे कार्यालये आणि अधिकार्‍यांना पाठवले आहे. 

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ पुन्हा धावणार

   Follow us on        

मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ ही देखील पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’ या मिनी टॉय ट्रेन’ मधून उद्यानाची सफर करत मजा लुटत होते. मात्र, 2021 मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली. तसेच अनेक रस्ते देखील उखडले गेले. तेव्हा ‘वनराणी’च्या एका वळणावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ही ट्रॉय ट्रेन बंद झाली होती.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search