Author Archives: Kokanai Digital

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुका २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाने आपली कंबर कसली असून, प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली असून, यात दिग्गज नेत्यांपासून ते युवा चेहऱ्यांपर्यंत सर्वांना स्थान देण्यात आले आहे.

​प्रचाराची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर

​या यादीत पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांच्यासोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ हे देखील प्रचाराचे मुख्य आकर्षण असतील.

​शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

यादीतील प्रमुख नावे:

​शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:

​कॅबिनेट मंत्री: गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दीपक केसरकर.

​खासदार: डॉ. श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, मिलिंद देवरा, आणि नरेश म्हस्के.

​महिला नेतृत्व: डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि शयना एन.सी.

​इतर महत्त्वाचे चेहरे: संजय निरुपम, नीलेश राणे आणि प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार गोविंदा आहुजा.

शिवसेना स्टार प्रचारक संपूर्ण यादी (२०२५-२६)

​१. मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री)

२. श्री. रामदास कदम (नेते)

३. श्री. गजानन कीर्तीकर (नेते)

४. श्री. आनंदराव अडसूळ (नेते)

५. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते)

६. श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय मंत्री)

७. डॉ. नीलमताई गोऱ्हे (नेत्या)

८. सौ. मिनाताई कांबळी (नेत्या)

९. श्री. गुलाबराव पाटील (नेते व मंत्री)

१०. श्री. दादाजी भुसे (उपनेते व मंत्री)

११. श्री. उदय सामंत (उपनेते व मंत्री)

१२. श्री. शंभूराज देसाई (उपनेते व मंत्री)

१३. श्री. संजय राठोड (मंत्री)

१४. श्री. संजय शिरसाट (प्रवक्ते व मंत्री)

१५. श्री. भरतशेट गोगावले (उपनेते व मंत्री)

१६. श्री. प्रकाश आबिटकर (मंत्री)

१७. श्री. प्रताप सरनाईक (मंत्री)

१८. श्री. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)

१९. श्री. योगेश कदम (राज्यमंत्री)

२०. श्री. दिपक केसरकर (प्रवक्ते व आमदार)

२१. श्री. श्रीरंग बारणे (उपनेते व खासदार)

२२. श्री. धैर्यशील माने (खासदार)

२३. श्री. संदीपान भुमरे (खासदार)

२४. श्री. नरेश म्हस्के (खासदार)

२५. श्री. रवींद्र वायकर (खासदार)

२६. श्री. मिलिंद देवरा (खासदार)

२७. डॉ. दीपक सावंत (उपनेते व माजी मंत्री)

२८. श्री. शहाजी बापू पाटील (उपनेते व माजी आमदार)

२९. श्री. राहुल शेवाळे (उपनेते व माजी खासदार)

३०. डॉ. मनिषा कायंदे (सचिव व आमदार)

३१. श्री. निलेश राणे (आमदार)

३२. श्री. संजय निरुपम (प्रवक्ते)

३३. श्री. राजू वाघमारे (प्रवक्ते)

३४. डॉ. ज्योती वाघमारे (प्रवक्ते)

३५. श्री. पूर्वेश सरनाईक (युवासेना कार्याध्यक्ष)

३६. श्री. राहुल लोंढे (युवसेना सचिव)

३७. श्री. अक्षयमहाराज भोसले (शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना)

३८. श्री. समिर काझी (कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग)

३९. श्रीमती शयना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या)

४०. श्री. गोविंदा आहुजा (माजी खासदार)

संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जामनगर’ आणि ‘पोरबंदर’ एक्सप्रेसचे होणार जंगी स्वागत

   Follow us on        

संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या दोन गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या अडीच वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला मोठे यश आले आहे. कोकण रेल्वेच्या पोरबंदर एक्स्प्रेस आणि जामनगर एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना आता संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शुक्रवारी आणि शनिवारी या गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​गुजरातकडे जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. आता थेट प्रवासाची सोय झाल्याने वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.

​जंगी स्वागताची तयारी

​या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिकांनी जय्यत तयारी केली आहे. पोरबंदर एक्सप्रेसचे शुक्रवारी तर जामनगर एक्स्प्रेसचे शनिवारी स्वागत करण्यात येणार आहे. ​या दोन्ही दिवशी रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजरात आणि फुलांच्या हारांनी गाड्यांचे स्वागत केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​फेसबुक ग्रुपचे जाहीर आवाहन

​’निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता सर्व नागरिकांनी संगमेश्वर रोड स्थानकावर उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या स्थानकांवर आता २४x७ ‘डिजी लॉकर’ सुविधा उपलब्ध

   Follow us on        

मुंबई: ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती देत आणि प्रवाशांच्या सोयीत भर घालत मध्य रेल्वेने आता रत्नागिरी (महाराष्ट्र), थिविम (गोवा) आणि उडुपी (कर्नाटक) स्थानकांवर २४ तास ‘डिजी लॉकर’ (डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम) सुविधा सुरू केली आहे. सुरक्षित आणि स्वयंचलित असलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना आपले सामान रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

​काय आहे ही ‘डिजी लॉकर’ सुविधा?

​मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता तिचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण ५६० डिजी लॉकर आहेत (CSMT-३००, दादर-१६०, LTT-१००).

​सामान ठेवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:

१. स्क्रीनवर ‘Start-Store’ वर क्लिक करा.

२. आपले नाव, PNR क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.

३. लॉकरचा आकार आणि बॅगांची संख्या निवडा.

४. प्रति बॅग ३० रुपये याप्रमाणे मशीनमध्ये पैसे जमा करा.

५. लॉकर उघडेल, त्यात सामान ठेवून दरवाजा बंद करा.

​सामान परत मिळवण्यासाठी:

१. स्क्रीनवर ‘Start-Retrieve’ वर क्लिक करा.

२. पावतीवरील बारकोड स्कॅनरला दाखवा.

३. लॉकर उघडेल, आपले सामान घेऊन दरवाजा पुन्हा बंद करा.

​प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

​ही सुविधा प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ च्या माहितीनुसार या काळात डिजी लॉकर्सच्या माध्यमातून रेल्वेला ३१.६ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.

पर्यटकांची सोय 

आता ही सुविधा कोकणात सुरू केल्याने येथे पर्यटनास येणार्‍या प्रवाशांची खूप चांगली सोय होईल. जास्त सामान घेऊन फिरणे गैरसोयीचे असल्याने ते डिजी लॉकर मध्ये ठेवता येणार आहे. अशी सुविधा कोकण रेल्वे मार्गावरील ईतर स्थानकावर सुरू करणे गरजचे आहे.

 

रेल्वे रुळांवरील प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी AI चा आधार; ‘गजराज’ अधिक मजबूत होणार

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वे रुळांवर होणारे हत्ती आणि इतर वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी ‘गजराज’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा विस्तार केला जात आहे.

​काय आहे ही नवीन प्रणाली?

​भारतीय रेल्वेने विकसित केलेली ही AI-आधारित यंत्रणा प्रामुख्याने ‘इंट्र्यूजन डिटेक्शन सिस्टम’ (IDS) वर आधारित आहे. ही प्रणाली खालीलप्रमाणे काम करते:

​सेन्सर्सचा वापर: रेल्वे रुळांच्या कडेला बसवलेले ऑप्टिकल फायबर सेन्सर्स वन्यजीवांच्या हालचालींमुळे होणारी कंपने (Vibrations) ओळखतात.

​त्वरित इशारा: जर एखादा हत्ती किंवा मोठा प्राणी रुळांच्या जवळ आला, तर ही प्रणाली तात्काळ लोको पायलट (रेल्वे चालक) आणि स्टेशन मास्टरला अलर्ट पाठवते.

​वेग मर्यादा: इशारा मिळताच चालक ट्रेनचा वेग कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो, ज्यामुळे अपघात टळतात.

ही यंत्रणा हवामानातील बदल आणि काही अपवाद वगळता  प्राण्यांच्या हालचालींची अचूक ओळख पटवते. सुरुवातीला आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत यशस्वी चाचणी झाल्यानंतर, आता ही यंत्रणा झारखंड, ओडिसा आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांतील ७०० किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे मार्गांवर लागू केली जाणार आहे. यामुळे जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गांवर वन्यजीवांचा जीव वाचवण्यास मोठी मदत होणार आहे.

​भारतीय रेल्वेचे हे पाऊल आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग संवर्धन यांचा उत्तम मेळ घालणारे आहे. यामुळे ‘रेल्वे-हत्ती संघर्ष’ कमी होऊन वन्यजीवांचे प्राण वाचण्यास मदत होईल.

Konkan Tourism: तळकोकणात पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलचा मार्ग मोकळा

सिंधुदुर्ग | बुधवार, २४ डिसेंबर २०२५

​कोकणातील पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर (तालुका वेंगुर्ला) येथे प्रस्तावित असलेल्या ‘ताज’ (IHCL) या पंचतारांकित लक्झरी हॉटेल प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात रखडलेला जमिनीच्या मोबदल्याचा पेच अखेर सुटला असून, यामुळे आता या भव्य प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.

​नेमका विषय काय होता?

​शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या जमिनीवर टाटा समूहाचे ‘ताज’ हॉटेल उभारण्याचे नियोजित होते. मात्र, येथील जमिनीच्या मालकी हक्कावरून आणि शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या (Compensation) रकमेवरून स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष होता. योग्य मोबदला मिळेपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती.

​प्रशासकीय मध्यस्थीला यश

​नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आणि प्रशासकीय वाटाघाटींनंतर, ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचा वाढीव मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन हा तिढा सोडवला आहे. यामुळे प्रकल्पाच्या विरोधात असलेले अडथळे आता दूर झाले आहेत.

​प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

​आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन: टाटा समूहाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ‘लक्झरी डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जाईल.

​रोजगार निर्मिती: या हॉटेलमुळे स्थानिक तरुणांना आदरातिथ्य (Hospitality) क्षेत्रात थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

​स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ: पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे आजूबाजूच्या होमस्टे, टॅक्सी व्यावसायिक, मच्छिमार आणि हस्तकला उद्योगाला मोठी चालना मिळेल.

​शाश्वत विकास: ताज समूहाकडून हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने राबवला जाणार असून, समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यावर भर दिला जाईल.

Aadhaar OTP Requirement for Tatkal Bookings on 100 Major Trains

   Follow us on        

New Delhi: Starting December 23, 2025, Indian Railways has implemented a mandatory Aadhaar-based OTP (One-Time Password) verification process for Tatkal and Premium Tatkal bookings on 100 specific train routes. This security measure aims to streamline the booking process and ensure authentic passenger verification for high-demand services.

​The updated list includes several major long-distance express and superfast trains across the country. Passengers planning to book last-minute tickets on these routes should ensure their Aadhaar is linked to their current mobile number to receive the necessary OTP.

Train List for Aadhaar OTP-Based Tatkal Booking

​The following trains require Aadhaar-based OTP verification for Tatkal and Premium Tatkal bookings as of December 23, 2025:

  1. ​19037 – AVADH EXP
  2. ​22538 – KUSHINAGAR EX
  3. ​12150 – SOU PUNE EXP
  4. ​18045 – EAST COAST EXP
  5. ​12142 – PPTA LTT EXP
  6. ​12864 – SMVB HOWRAH E
  7. ​19484 – SHC ADI EXP
  8. ​20103 – LTT AMH SF EXP
  9. ​12628 – KARNATAKA EXP
  10. ​12841 – COROMANDAL EX
  11. ​15065 – GKP PNVL EXP
  12. ​22177 – MAHANAGARI EX
  13. ​15017 – LTT GKP EXPRES
  14. ​12566 – BIHAR S KRANTI
  15. ​12860 – GITANJALI EXP
  16. ​12488 – SEEMANCHAL EX
  17. ​12534 – PUSHPAK EXPRE
  18. ​15484 – MAHANANDA EXF
  19. ​14707 – RANAKPUR EXP
  20. ​19490 – GKP ADI EXPRES
  21. ​19046 – TAPTI GANGA EXI
  22. ​11072 – KAMAYANI EXP
  23. ​12506 – NORTH EAST EXP
  24. ​12779 – GOA EXPRESS
  25. ​15657 – BRAHMPUTRA MA
  26. ​12479 – SURYA NAGARI E
  27. ​12562 – SWTANTRTA S EX
  28. ​12780 – GOA EXPRESS
  29. ​15018 – GKP LTT EXP
  30. ​19483 – ADI SHC EXP
  31. ​12245 – SMVB DURONTO
  32. ​15708 – ASR KIR EXPRES
  33. ​12656 – NAVAJIVAN SF EX
  34. ​20495 – JU HDP SF EXP
  35. ​22178 – MAHANAGARI EX
  36. ​22956 – KUTCH EXPRESS
  37. ​12168 – BNRS LTT SF EXP
  38. ​12704 – FALAKNUMA SF E
  39. ​15066 – PNVL GKP EXPRE
  40. ​12246 – DURONTO EXPRE
  41. ​12791 – SC DNR SF EXP
  42. ​12956 – JP MMCT SF EXP
  43. ​12988 – AII SDAH SF EXP
  44. ​11071 – KAMAYANI EXPRE
  45. ​12149 – PUNE SOU EXP
  46. ​12167 – LTT BANARAS EX
  47. ​12618 – MNGLA LKSDP EX
  48. ​12809 – HOWRAH MAIL
  49. ​12558 – SAPT KRANTI EXE
  50. ​12445 – UTTAR S KRANTI
  51. ​13202 – LTT RAJGIR EXP
  52. ​15910 – AVADH ASSAM EX
  53. ​19020 – HW BDTS EXP
  54. ​12322 – KOLKATA MAIL
  55. ​12554 – VAISHALI EXP
  56. ​13006 – ASR HWH MAIL
  57. ​18463 – PRASHANTHI EXA
  58. ​12368 – VIKRAMSHILA EXI
  59. ​14701 – ARAVALI EXPRES
  60. ​14702 – ARAVALI EXP
  61. ​22158 – MS CSMT SF EXP
  62. ​12926 – PASCHIM EXPRES
  63. ​20629 – SABARI SF EXPRE
  64. ​15048 – PURVANCHAL EX
  65. ​12112 – AMI CSMT SF EXP
  66. ​12555 – GORAKHDHAM EX
  67. ​12724 – TELANGANA EXP
  68. ​18046 – EAST COAST EXP
  69. ​12225 – KAIFIYAT EXP
  70. ​12237 – BEGUMPURA EXF
  71. ​12650 – YPR SAMPARK KA
  72. ​13352 – ALLP DHN EXPRE
  73. ​14006 – LICHCHIVI EXP
  74. ​12295 – SANGHAMITRA EX
  75. ​17058 – DEVAGIRI EXP
  76. ​12312 – NETAJI EXPRESS
  77. ​12141 – PATLIPUTRA EXP
  78. ​11003 – TUTARI EXPRESS
  79. ​12238 – BEGUMPURA EXA
  80. ​12565 – BIHAR S KRANTI
  81. ​12626 – KERALA EXPRESS
  82. ​12627 – KARNATAKA EXP
  83. ​12737 – GOUTAMI SF EXP
  84. ​22160 – MAS CSMT SF EX
  85. ​12859 – GITANJALI EXP
  86. ​19032 – YOGA EXPRESS
  87. ​20111 – ΚΟΝΚΑΝ ΚANYA E
  88. ​22419 – SUHAILDEV SFAS
  89. ​12226 – KAIFIYAT EXP
  90. ​12916 – ASHRAM EXPRES
  91. ​12716 – SACHKHAND EXP
  92. ​14205 – AYODHYA EXPRE
  93. ​11078 – JHELUM EXPRES
  94. ​12367 – VIKRAMSHILA EX
  95. ​12556 – GORAKHDHAM EX
  96. ​12559 – SHIV GANGA EXP
  97. ​12842 – COROMANDEL EX
  98. ​13106 – BUI SDAH EXP
  99. ​13351 – DHN ALAPPUZHA
  100. ​14217 – UNCHAHAR EXP

Konkan Railway: कोकणकन्या, तुतारी गाड्यांच्या आरक्षणासाठी आता आधार OTP अनिवार्य

   Follow us on        

मुंबई:

रेल्वे प्रशासनाने तिकीट प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबर २०२५ पासून निवडक १०० गाड्यांच्या तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठी आधार OTP (Aadhaar OTP) पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

​पत्रात दिलेल्या माहितीनुसार, कोकण मार्गावरील खालील गाड्यांसाठी हा नियम लागू झाला आहे:

​कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११): मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी ही अत्यंत लोकप्रिय गाडी आता आधार OTP प्रणालीच्या कक्षेत आली आहे.

​तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या या गाडीसाठीही प्रवाशांना आता ओटीपी पडताळणी करावी लागेल.

​मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (१२६१८): हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम या लांब पल्ल्याच्या आणि कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाडीचाही या यादीत समावेश आहे.

​प्रवाशांना आवाहन:

ज्या प्रवाशांना या गाड्यांचे तत्काळ तिकीट काढायचे आहे, त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी. यामुळे तिकीट आरक्षणाच्या वेळी होणारी गैरसोय टाळता येईल.

Mumbai Goa Highway: महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा; राजू भाटलेकर यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट

   Follow us on        

रत्नागिरी:

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणारे विपरीत परिणाम आणि वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, भाजपा रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. राजू भाटलेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.

​सध्या मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाच्या दयनीय स्थितीमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.​रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटक नाराज असून याचा थेट परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होत आहे.​अनेक स्थानिक पर्यटन व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे या निवेदनात नमूद केले आहे.

​मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

​महामार्गाचे काम तातडीने पूर्ण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी मिळेल, अशी स्पष्ट भूमिका श्री. भाटलेकर यांनी मांडली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

परराज्यातील गाड्या मुंबईपर्यंत; महाराष्ट्रातील गाड्यांना ‘मार्गच’ नाही- मध्यरेल्वेचा दुजाभाव

   Follow us on        

मुंबई: जिथे परराज्यात जाणार्‍या गाड्यांना मध्य रेल्वे मुंबई भागात हिरवा कंदील देत आहे तिथे कोरोना काळापासून बंद झालेली आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने दिवा स्टेशनवर मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नात आक्रमकपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

​रेल्वेचा दुटप्पी कारभार: परराज्यातील गाड्यांना रेड कार्पेट, महाराष्ट्राच्या गाड्यांना बाहेरचा रस्ता!

​समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी पत्रात रेल्वेच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. मध्य रेल्वेने ‘मार्गाची क्षमता नाही’ (Line Capacity) असे तांत्रिक कारण देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यातून चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच मार्गावरून दादर-गोरखपूर आणि दादर-बालिया यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर अलीकडेच नव्याने घोषणा करण्यात आलेली एलटीटी बंगळुरू एक्सप्रेस एलटीटी वरून सुटणार आहे. मग महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्यांसाठीच रेल्वेकडे मार्ग उपलब्ध का नाही? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी विचारला आहे.

​दिव्यापर्यंत गाडी मर्यादित केल्याने प्रवाशांचे हाल:

​वेळेचा अपव्यय: दादरला गाडीत पाणी भरण्याची सोय होती. आता दिव्यात सोय नसल्याने पनवेलला गाडी थांबवून पाणी भरावे लागते, ज्यात ३० ते ४० मिनिटे वाया जात आहेत.

​क्षमता असूनही प्रवासी वंचित: दिवा स्थानकातील फलाट आखूड असल्याने या गाड्यांना १७ पेक्षा जास्त डबे लावता येत नाहीत. हीच गाडी दादर किंवा CSMT वरून सुटल्यास २२-२४ डबे लावता येतील, ज्यामुळे दररोज ३ ते ४ हजार अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येईल.

​कनेक्टिव्हिटी तुटली: दक्षिण मुंबई, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर हे सर्वात सोयीचे स्थानक होते, जे आता हिरावले गेले आहे.

यापूर्वी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गोपाळ शेट्टी यांसारख्या अनेक नेत्यांनी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने याला केराची टोपली दाखवली आहे. संसदेत आणि विधिमंडळात विषय मांडूनही तो निकाली निघत नसल्याने आता या प्रश्नावर राजकीय लढा उभारण्याची गरज पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण

​”कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राचा २२% आर्थिक सहभाग आहे. तरीही मराठी प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या गाडीसाठी झगडावे लागत आहे,” असा आरोप समितीने केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर, मुंबईतील मोठा मतदार असलेल्या कोकणवासीयांचा हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केंद्र सरकारकडे लावून धरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ ५०१०४/५०१०३ रत्नागिरी दादर पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत दादर स्थानकावरूनच सुरू करावी आणि डब्यांची संख्या वाढवून कोकणवासीयांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.

सावंतवाडी टर्मिनस रेल्वे प्रकल्प MITRA च्या नियंत्रणाखाली आणा – रेल्वे प्रवासी समिती

   Follow us on        

सावंतवाडी:

गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या कामाबाबत कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ Maharashtra Institution for Transformation (MITRA) संस्थेच्या नियंत्रणाखाली घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

​रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि ‘वे-साइड’ स्टेशनचा वाद

​पत्रात नमूद केल्यानुसार, कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अलीकडेच “सावंतवाडी हे केवळ एक वे-साइड (Way Side) स्टेशन आहे आणि टर्मिनसचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही” असे विधान केल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून, रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे.

​प्रवासी आणि चाकरमान्यांचे हाल

​टर्मिनसअभावी कोकणात नवीन गाड्या सुरू करता येत नाहीत. परिणामी, होळी, गणेशोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चाकरमान्यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रवाशांचे होणारे हे हाल थांबवण्यासाठी हक्काचे टर्मिनस होणे ही काळाची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.

​पत्रातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे:

​प्रकल्प हस्तांतरण: कोकण रेल्वेची अनास्था पाहता, हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे किंवा तत्सम सक्षम राज्य अभिकरणाकडे वर्ग करावा.

​टर्मिनस बिल्डिंग व सुविधा: सिंधुरत्न समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध असतानाही टर्मिनसच्या इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, ते तातडीने सुरू करावे.

​पाणी पुरवठा: तिलारी धरणातून टर्मिनससाठी पाणी योजनेचा प्रस्ताव राज्य स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहे, त्याला गती द्यावी.

​गाड्यांचे थांबे: कोरोना काळात रद्द केलेले महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे सावंतवाडी स्टेशनवर पुन्हा पूर्ववत करावेत.

​मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची विनंती

​सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते, याची आठवण करून देत संघटनेने या विषयावर तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाला योग्य समज देऊन या प्रकल्पातील अडथळे दूर करावेत, अशी विनंती ॲड. संदीप निंबाळकर आणि संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search