रत्नागिरी :आज मुख्यमंत्री एकनाथ यांचा रत्नागिरी दौरा होता. ह्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती.
मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्ता करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश.
MMRDA प्रमाणेच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार
मत्स्य व्यवसायातून परकीय चलन उपलब्ध होण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेणार.
पर्यटन वाढीसाठी ‘बांधा आणि वापरा’ तत्वावर सेवा सुविधा पुरवल्या जातील.
कोकण विभागातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत निर्णय घेतले जातील.
Konkan Railway News : ख्रिसमस सण आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला भेट देणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, तसेच नाताळाच्या सुट्टीत हिवाळी पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 01445 / 01446 Pune Jn. – Karmali – Pune Jn. Special (Weekly)
ह्या गाड्या पुणे जंक्शन ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01445
ही गाडी दिनांक 16/12/2022 ते 13/01/2023 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी पुणे जंक्शन ह्या स्टेशनवरुन संध्याकाळी 17.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train No 01446
ही गाडी दिनांक 18/12/2022 ते 15/01/2023 पर्यंत प्रत्येक रविवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 23.35 वाजता पुणे जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्या पनवेल जंक्शन ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01448
ही गाडी दिनांक 17/12/2022 ते 14/01/2023 पर्यंत प्रत्येक शनिवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.15 वाजता पनवेल जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01447
ही गाडी दिनांक 17/12/2022 ते 14/01/2023 पर्यंत प्रत्येक शनिवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी पनवेल जंक्शन या स्थानकावरून रात्री 22.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 08.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी स्थानका दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01459
ही गाडी दिनांक 19/12/2022 ते 11/01/2023 पर्यंत प्रत्येक सोमवार आणि बुधवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या स्टेशनवरुन रात्री 20.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460
ही गाडी दिनांक 20/12/2022 ते 12/01/2023 पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि गुरुवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी ह्या स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर पोहोचेल.
01446, 01448 आणि 01460 ह्या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक १६/१२/२०२२ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी दौर्यावर येत असून, या दिवशी रत्नागिरी मतदार संघात तब्बल पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर बहुचर्चित तारांगणाचे उद्घाटनही मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 16 डिसेंबर 2022
सकाळी 10.00 – राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
सकाळी 11.00 – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मारुती मंदीर रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11.30 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण व अभिवादन.(स्थळ : मारुती मंदीर, रत्नागिरी)
सकाळी 11.40 – मोटारीने श्री देव भैरीबुवा मंदिर, रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11.45 – रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदीर येथे आगमन व दर्शन.
सकाळी 11.55 – मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 12.00 – रत्नागिरी जिल्हयातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी01.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 01.30 ते 02.45 – शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.45 ते 03.30 वाजता विविध संघटनांच्या शिष्टमंडळास भेट –
१) भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
२) रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (8 प्रतिनिधी)
३) एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटना (8 प्रतिनिधी )
४) शिक्षक संघटना ( 8प्रतिनिधी)
५) मच्छिमार संघटना (8 प्रतिनिधी)
६) आंबा बागायतदार संघटना ( 8 प्रतिनिधी)
७) जिल्हा परिषद (5 प्रतिनिधी) व महसूल (5 प्रतिनिधी) अधिकारी /कर्मचारी संघटना.
(स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).
दुपारी 03.30 – मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 03.45 ते 04.45 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी).
सांयकाळी 04.45 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी येथून माळनाका रत्नागिरी कडे प्रयाण.
सांयकाळी 05.00 ते 05.15 – श्रीमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : माळनाका, रत्नागिरी) सांयकाळी 05.15 वाजता माळनाका, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 05.20 ते 05.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
सांयकाळी 07.00 – रत्नागिरी येथून मोटारीने पाली, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
सांयकाळी 07.30 ते 08.30 – उदय सामंत, मंत्री उद्योग यांचे पाली येथील निवासस्थानी आगमन व राखीव.
रात्रौ 08.30 – वाजता पाली, जि. रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्रौ 10.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही लाभदायक ठरेल
मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल.
Follow us on
मुंबई : नांदेड -पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार केला जावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले आहे. जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेच्या एका शिष्टमंडळाकडून हे निवेदन दिले गेले आहे. मराठवाडा विभागातून थेट कोकणात येण्यासाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त ठरणार असल्याने याकडे रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
गाडीचे सध्याचे वेळापत्रक
17613/17614 ही गाडी पनवेल ते हुजूर साहिब नांदेड स्थानकांदरम्यान चालविण्यात येत आहे. ही गाडी पनवेल स्थानकावरून संध्याकाळी 4 वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हुजूर साहिब नांदेड स्थानकावर पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी हुजूर साहिब नांदेड ह्या स्थानकावरून संध्याकाळी 6 वाजुन 20 मिनिटांनी सुटते ती पनवेल स्थानकावर दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचते.
सकाळी पनवेल स्थानकावर 9 वाजता ही गाडी पोहोचल्यावर संध्याकाळी 4 वाजता नांदेड साठी निघते ह्या दरम्यानच्या वेळेमध्ये ही गाडी पुढे काही स्थानकांपर्यंत चालवता येवू शकते. पनवेल ते चिपळूण मधील अंतर साधारणपणे 3.30 तासाचे आहे. कोकण मार्गावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन ह्या गाडीच्या वेळापत्रकात किंचित बदल करून तर ही गाडी पुढे चिपळूण पर्यंत विस्तारित करता येणे शक्य आहे.
ह्या विस्ताराने हे लाभ मिळतील
ही गाडी मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तसेच ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही प्रवास करायला सोपा पर्याय उपलब्ध होईल. ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल आणि आपल्याला एक गाडी मिळेल जेणेकरून इतर गाड्यांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही मदत होईल.
Konkan Railway News:कोकण रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील काही गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या गाड्यांच्या प्रत्येकी २ जनरल डब्यांचे इकॉनॉमी थ्री टायर एसी डब्यांमध्ये रूपांतर केले आहे.
या गाड्या याआधी टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + स्लीपर – ०८ + जनरल – ०४ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डब्याच्या संरचनेनुसार चालविण्यात येत होत्या त्या आता खालील सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + इकॉनॉमी थ्री टायर एसी – ०२ + स्लीपर – ०८ + जनरल – ०२ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डबे. ह्या गाड्यांच्या सर्व डबे LBH स्वरूपाचे असणार आहेत.
सिंधुदुर्ग:ग्रामिण भागातील नागरीकांना आपल्या घराच्या जवळ चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उददेशाने श्री.मंगेशजी सांवत यांच्या प्रेरणेतून मंगळवार, 21 डिसेंबर 2022 रोजी साईलिला हॉस्पिटल नाटळ, प्रथमेश हॉटेल्स प्रा.ली. मुंबई आणि माता वैष्णोदवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर माता वैष्णोदेवी महाविद्यालय, ओसरगांव, मुंबई-गोवा हायवे, ओसरगांव तलाव शेजारी आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 अशी आहे. तरी कणकवली, ओसरगांव,कसाल, आंब्रड, हेवाळे, पोखरण, कुंदे, बोर्डवे या पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहीती व नावनोंदणी करीता साईलिला हॉस्पिटल नाटळ संपर्क क्रमांक 02367 246099 / 246100 / 8275137575 यावर संपर्क करावा.
मुंबई: कोकणातील काजूपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .संपूर्ण कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यातील क्षेत्रात ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1175 कोटींची तरतूद असणार आहे. कृषी, पणन व सहकार मिळून ही योजना राबवणार आहेत.
Follow us on
राज्यात रोपवाटिका सुविधा निर्माण करणे.काजू उत्पादकता वाढ, काजू बोन्डावरील प्रक्रिया उद्योगांना चालना, अर्थसहाय्य, प्रक्रिया, मार्केटिंग आणि रोजगारनिर्मितीसाठी हि योजना राबविण्यात येणार आहे.
Konkan Railway News 13/12/2022: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01430 एकेरी विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री २३.०० वाजता पोहोचेल.
GRAMPANCHAYAT ELECTION 2022 :भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धक्कादायक विधान केल्याचं समोर आलं आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाहीतर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकर्यांना दिली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवलीमधील (Kankavali) नांदगाव या ठिकाणी बोलत होते. राणे म्हणाले. आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल, नाहीतर मी निधी देणार नाही असं वादग्रस्त विधान आमदार राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात बोलतानाचा राणे यांचा व्हिडिओ समोर आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे या व्हिडिओतून समोर आले होते.
Mumbai -Goa Highway News: एकीकडे समृद्धी महामार्ग अवघ्या ५/६ वर्षात पूर्ण करून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी हा महामार्ग पूर्ण करून दाखवल्याच्या आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे “खड्ड्यात” गेलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले तर सोडा तर ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणे पण टाळत आहेत. त्यामुळे शांत असणारा कोकणी माणूस आता आपला राग विविध माध्यमातून व्यक्त करू लागला आहे. ह्यात आता मराठी कलाकार पण सामील झाल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने इन्स्ट्राग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
एका युझर च्या पोस्ट ला त्याने रिप्लाय देताना नक्की काय म्हणाला अभिजीत?
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची 12 वर्ष कोणत्या हिशोबाने मोजली ते कळेल का ? नाही म्हणजे तसा भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली , आपल्याला संताप व्यक्त करायला आपलं हक्काच स्थान मिळालय मग 12 वर्षच का ? आधीची 60-65 वर्ष काय कोकणात सोन्याचा धुर निघत होता का ? ह्यासाठी नुसत्या संतापी पोस्ट टाकून आणि वर्षातून एकदा सुट्टीला कोकणात जाऊन कस भागेल ? त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी जबाबदार आहेत ना ? त्यांना निवडून द्यायला पुण्या मुंबईची किंवा उर्वरित महाराष्ट्रातील लोक येत नाहीत. आधी कोकणकरांनी सुधारावे मग कोकण सुधारेल ! समृद्धी म्हणजे काय बँकेत ठेवलेली ठेव नाही की काढली आणि दिली कुणालाही ! मोठ्या महामार्गांवर अपेक्षित असलेली जड वाहतूक किती प्रमाणात आहे हो कोकणात ? त्यामुळे उगाच तुमच्या वैयक्तिक संतापाला सामाजिक करून इतरांचे सामाजिक जीवन आनंदमय करू नका.