Category Archives: कोकण

जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा ‘पाणी’ मुद्दा निर्णायक

   Follow us on        

सावंतवाडी : रेल्वे प्रकल्प हा जरी केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला, तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही पूर्णतः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळेच हा विषय केवळ प्रशासकीय न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी थेट जोडला गेला आहे.

तिलारी धरणातून रेल्वे टर्मिनससाठी पाणीपुरवठा करण्याची योजना सावंतवाडी पंचायत समितीने तयार केली असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ती मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे. या योजनेची अंमलबजावणी, पाठपुरावा, निधी मिळवणे आणि काम वेळेत पूर्ण करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किती सक्षमपणे हा विषय हाताळतात, यावरच टर्मिनस प्रत्यक्षात सुरू होणार की नाही, हे ठरणार आहे.

याच कारणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिक आता केवळ आश्वासनांवर समाधानी न राहता, या पाणीपुरवठा योजनेला निधी मिळवून देण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी ठोस पाठपुरावा करतो, याकडे लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ सावंतवाडी रेल्वे टर्मिनसपुरता मर्यादित नसून मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट या गावांतील नागरिकांनाही शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विकास, सुविधा आणि लोकजीवनाशी थेट निगडित असल्याने तो स्थानिक निवडणुकांतील प्रमुख मुद्दा ठरला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी समितीचे पदाधिकारी सागर तळवडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारित असला तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्यामुळे या योजनेचा पाठपुरावा करणे, निधी मिळवून देणे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आहे.

तळवडेकर पुढे म्हणाले की, याच कारणामुळे हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांशी थेट जोडला गेला असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी या विषयावर ठोस भूमिका घेणाऱ्या उमेदवारांकडे लक्ष द्यावे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्याशिवाय टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होणे शक्य नसून, हा प्रश्न केवळ रेल्वेपुरता न राहता संपूर्ण परिसराच्या विकासाशी संबंधित आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’! २०२७ मध्ये कामाला होणार सुरुवात

   Follow us on        

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेला जोडण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्षी म्हणजेच २०२७ साली प्रारंभ होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेच्या ३० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ३,४११ कोटी रुपये या महत्त्वाकांक्षी मार्गासाठी केंद्राचा हिस्सा म्हणून दिले जाणार आहेत. राज्य शासन देखील आपला वाटा तातडीने देणार असून लवकरच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडावे ही मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होती. २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देऊन निधीची तरतूद केली होती. त्यानंतरच्या १० वर्षांत सर्वेक्षण, डीपीआर (DPR) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अशा विविध तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. आता केंद्राने रेल्वेसाठी एकूण २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची मोठी तरतूद केल्याने या मार्गाचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रकल्प हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन समृद्ध क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून या मार्गाची मागणी प्रलंबित होती, कारण तांत्रिक आणि भौगोलिक आव्हानांमुळे हा प्रकल्प रखडला होता. या मार्गामुळे कोल्हापूर आणि वैभववाडी दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, यामुळे या दोन्ही विभागांतील प्रवास सुखकर आणि जलद होईल.

या कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा फायदा व्यापार आणि पर्यटनाला मिळणार आहे. कोल्हापूरची बाजारपेठ आणि कोकणातील बंदरं यांच्यातील दळणवळण सोपे झाल्यामुळे औद्योगिक मालाची ने-आण वाढेल, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होईल. त्याचबरोबर, पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातील भाविकांना कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल, ज्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

Konkan  Railway: सीएसएमटी स्थानकावर ८५ दिवसांचा ‘ब्लॉक’; विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जाणार्‍या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई, दि. (प्रतिनिधी) — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासकामांमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ हे १ फेब्रुवारीपासून पुढील ८५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे.

या कालावधीत कोकणवासियांची पसंती असलेली मडगाव–सीएसएमटी ‘तेजस एक्सप्रेस’ ही सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरच टर्मिनेट होईल. तसेच मंगळुरु–सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आता ठाणे स्थानकावरच संपणार आहे.

सीएसएमटी स्थानकाचा सुमारे २,४५० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येत असून, या कामाची जबाबदारी अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेडकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पात नवीन इमारतींचे बांधकाम, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा, पार्सल सेवा तसेच हेरिटेज इमारतीचे जतन यांचा समावेश आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी विभागली जाऊन प्रवास अधिक सुकर होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातून येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि टर्मिनसमध्ये बदल करण्यात आले आहेत. अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस, बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा मेल, भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेस या गाड्या आता सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावतील.

खालील गाड्या त्यांच्या निर्धारित स्थानकापर्यंत (CSMT) न जाता दादर स्थानकावरच थांबतील:

​१२११२ अमरावती-CSMT एक्सप्रेस

​११००२ बल्लारशाह-CSMT नंदीग्राम एक्सप्रेस

​१२८१० हावडा-CSMT एक्सप्रेस

​११०२० भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्सप्रेस

​२२१४४ बिदर-CSMT एक्सप्रेस / २२१०८ लातूर-CSMT एक्सप्रेस

​२२१२० मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस

​ठाणे स्थानकावर थांबणारी गाडी (Short Terminated at Thane)

​१२१३४ मंगळुरू-CSMT एक्सप्रेस ही गाडी आता फक्त ठाणे स्थानकापर्यंतच धावेल.

कसबा पंचायत समिती गणात संदेश जिमन यांच्या प्रचाराचा झंझावात; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम / सायले: कसबा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, अपक्ष उमेदवार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रचाराने संपूर्ण गणात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असताना, काही उमेदवारांना पक्षीय दिग्गजांचा पाठिंबा आहे, तर काही उमेदवार आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर राजकीय प्रवास घडवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत संदेश सुरेश जिमन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचारात संदेश जिमन यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे नेतृत्व जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधत, त्यांनी आजवर केलेली जनसेवा आणि पुढील काळात समाजकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची आपली निर्भीड भूमिका स्पष्ट केली आहे. कमी वयात समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्यांना जनसामान्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा करत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवरायांच्या चरित्र ग्रंथांचे तसेच गोष्टींच्या पुस्तकांच्या संचांचे वितरण, ही त्यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच गरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

विकास आणि रोजगारनिर्मिती, पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना, या गणातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी गरजेनुसार एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, तसेच कसबा हे ऐतिहासिक क्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संदेश जिमन यांनी दिले आहे.

कसबा पंचायत समिती गणातील या चुरशीच्या लढतीत संदेश सुरेश जिमन यांची सरशी होताना दिसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ही वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार की काय, याची उत्सुकता आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रवाशांना दिलासा! लोकमान्य टिळक टर्मिनसवरील ‘ब्लॉक’ संपला; गाड्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर

मुंबई: मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे १ जानेवारी २०२६ पासून घेतलेला पायाभूत सुविधांच्या कामाचा ‘ब्लॉक’ आता नियोजित वेळेनुसार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी हा ब्लॉक संपल्यामुळे, या काळात विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, खालील गाड्या आता त्यांच्या मूळ वेळापत्रकानुसार आणि मूळ स्थानकापर्यंत धावतील:

१. आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील: (३१ जानेवारी २०२६ पासून):

आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील

गाडी क्र. १६३४६: तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस)

गाडी क्र. १२६२०: मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस)

२. एल.टी.टी. वरून सुटणाऱ्या गाड्या:

३१ जानेवारी २०२६ पासून: गाडी क्र. १२६१९ (लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस) आता मूळ वेळापत्रकानुसार एल.टी.टी. वरून सुटेल.

१ फेब्रुवारी २०२६ पासून: गाडी क्र. १६३४५ (लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस) आपल्या नियमित वेळेनुसार एल.टी.टी. वरून मार्गस्थ होईल.

महिनाभर चाललेल्या या ब्लॉकचा फटका केवळ मुंबईकरांनाच नाही, तर कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला होता.

जिल्हापरिषद निवडणूका आणि आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांची मागणी

   Follow us on        

मुंबई | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आंगणेवाडी जत्रा पार पडणार आहे. यामुळे ६ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई/पुणे ते कोकण व कोकण ते मुंबई/पुणे मार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

या काळात मतदार, मतदान व शासकीय कर्मचारी, सुरक्षा दल तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी जाणारे व परतीच्या प्रवासातील लाखो भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतील. मागील अनुभव लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील सध्याच्या नियमित गाड्या ही अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी अपुऱ्या ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रचंड गर्दी, प्रतीक्षा यादी (वेटिंग), तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर, ६, ७, ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी ठाम मागणी कोकण विकास समिती (शहरी व ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रस्तावित विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असावे अशी विनंती कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांमुळे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यमान सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल, तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तातडीने निर्णयाची अपेक्षा

मागणी निश्चित असून नियोजनासाठी वेळ मर्यादित असल्याने, या विशेष गाड्यांना लवकर मंजुरी देऊन तातडीने अधिसूचना जारी करावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे. वेळेत सकारात्मक निर्णय झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि स्थानिक प्रशासनालाही नियोजनात मदत होईल.

ही मागणी जयवंत शंकर दरेकर व अक्षय मधुकर महापदी (कोकण विकास समिती – शहरी व ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या धावणार ‘वीकेंड स्पेशल’ एक्सप्रेस

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग :आठवड्याच्या शेवटी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दोन्ही दिशांनी प्रत्येकी एक फेरी पूर्ण करेल.

​गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​१. मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१००४):

ही गाडी शनिवारी, ३१ जानेवारी २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (रविवारी) पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष (०१००३):

ही गाडी रविवारी, १ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे:

या विशेष ट्रेनच्या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

​गाडीची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २० डबे असतील. यामध्ये:

​१८ स्लीपर क्लास डबे.

​०२ एसएलआर (SLR) डबे.

Konkan Railway: आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी खुशखबर! ‘या’ विशेष गाडीला मुदतवाढ

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने सुरत-मंगळुरू-सुरत विशेष गाडीला (०९०५७/०९०५८) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी खास ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026रोजी होणार आहे या गाडीच्या मुदतवाढी मुळे या जत्रेसाठी कोकणात जाणार्‍या भाविकांची सोय होणार आहे.

गाड्यांचे वेळापत्रक आणि दिवस:

गाडी क्र. ०९०५७ (सुरत ते मंगळुरू): ही गाडी १ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दर बुधवारी आणि रविवारी धावेल.

गाडी क्र. ०९०५८ (मंगळुरू ते सुरत): ही गाडी २ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि सोमवारी धावेल.

आरक्षण तपशील:

गाडी क्र. ०९०५७ साठीचे आरक्षण ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

गाडीचे थांबे:

ही गाडी प्रवासादरम्यान महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे, ज्यात प्रामुख्याने यांचा समावेश आहे: उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, मुरूडेश्वर, उडुपी आणि सुरतकल.

गाडीची रचना (Coaches):

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत खालीलप्रमाणे डबे असतील:

६ शयनयान (Sleeper)

१० वातानुकूलित तृतीय श्रेणी (3AC)

१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2AC)

२ सामान्य द्वितीय श्रेणी (General)

२ एसएलआर (SLR)

उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरूडेश्वर, भटकळ, मूकाम्बिका रोड बैन्दूर, कुंदापूर, उडुपी, मुळकी आणि सुरतकल.

Konkan Railway: ४७ प्रवाशांचा हरवलेला मुद्देमाल परत, ४२ मुलांची सुटका: RPF ची उल्लेखनीय कामगिरी.

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षितता, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) सातत्याने सतर्क, कार्यक्षम आणि संवेदनशील भूमिका बजावत आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध विशेष मोहिमा, तत्काळ कारवाई आणि लोकाभिमुख उपक्रमांमुळे RPF ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ऑपरेशन अमानत अंतर्गत RPF ने रेल्वे परिसरात प्रवाशांकडून चुकून राहिलेल्या वस्तू शोधून काढून तब्बल 47 प्रवाशांना ₹27.93 लाख किमतीचे मौल्यवान साहित्य सुरक्षितपणे परत केले. या कार्यामुळे रेल्वे सुरक्षेवरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

बालसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत RPF ने 42 अल्पवयीन मुलांची सुटका केली. या मुलांना पुढील काळजी, संरक्षण व पुनर्वसनासाठी चाइल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले असून, संभाव्य शोषणापासून त्यांचे संरक्षण करण्यात आले आहे.

रेल्वे परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सतर्क मोहिमेत RPF ने ₹5.31 लाख किमतीच्या 3,146 बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यासोबतच 38 दारू तस्करांना अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रेल्वे परिसरातील अवैध व्यापाराला मोठा आळा बसला आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी RPF ने ACP प्रकारातील 142 प्रकरणे उघडकीस आणून, संबंधित गुन्हेगारांवर रेल्वे कायदा कलम 141 अंतर्गत अटक व खटले दाखल केले. तसेच, जीवन रक्षा उपक्रम अंतर्गत RPF कर्मचाऱ्यांनी तीन प्रवाशांचे प्राण वाचवून आपली कर्तव्यनिष्ठा अधोरेखित केली.

प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई करत RPF ने नऊ गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून ₹67.88 लाख किमतीचे चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

ही सर्व कामगिरी RPF च्या सतर्कता, समर्पण आणि प्रवासीहितैषी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. कोकण रेल्वेवर सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासीस्नेही प्रवास अनुभव देण्यासाठी RPF चे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे.

Konkan Railway: योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम दरम्यान धावणार ‘स्पेशल एक्सप्रेस’

   Follow us on        

एर्नाकुलम: उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने योग नगरी ऋषिकेश – एर्नाकुलम जंक्शन – योग नगरी ऋषिकेश दरम्यान  स्पेशल एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ या राज्यांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग

​१. ट्रेन क्र. ०४३६० (योग नगरी ऋषिकेश ते एर्नाकुलम जंक्शन): ही गाडी शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजता योग नगरी ऋषिकेश येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २३:३० वाजता एर्नाकुलम जंक्शनला पोहोचेल.

​२. ट्रेन क्र. ०४३५९ (एर्नाकुलम जंक्शन ते योग नगरी ऋषिकेश): परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी, ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २३:०० वाजता एर्नाकुलम येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी १६:१५ वाजता योग नगरी ऋषिकेशला पोहोचेल.

योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस एकूण ३३ स्थानकांवर थांबणार असून, तिचा मार्ग हरिद्वार, मेरठ सिटी, हजरत निजामुद्दीन, मथुरा, कोटा, नागदा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरुर, कुट्टिपुरम, शोरानूर, थ्रिसूर आणि अलुआ असा आहे.

​कोचची रचना (Coach Composition) या गाडीत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणींचे एकूण १८ डबे असतील:

​१ डबा: प्रथम श्रेणी सह एसी टू टायर (1st Class Cum AC 2 Tier)

​१ डबा: एसी टू टायर (AC 2 Tier)

​३ डबे: एसी थ्री टायर (AC 3 Tier)

​७ डबे: स्लीपर क्लास (Sleeper Class)

​४ डबे: जनरल सेकंड क्लास (General Second Class)

​२ डबे: लगेज कम ब्रेक व्हॅन

​आरक्षणाबाबत माहिती या विशेष गाड्यांचे आगाऊ आरक्षण (Advance Reservation) २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून दक्षिण रेल्वेच्या (Southern Railway) केंद्रांवरून आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

​प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search