Category Archives: कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘वीकेंड स्पेशल’ ट्रेन

   Follow us on        

Konkan Railway : स्वातंत्र्यदिन आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे .

०१५०२ / ०१५०१ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी

गाडी क्र. ०१५०२ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडी मडगाव जं. येथून १७ ऑगस्ट (रविवार) रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०१५०१ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून १८ ऑगस्ट २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ०८:३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.

थांबे: कारमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली , रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड़, माणगाव, रोहा, पेन, पनवेल व ठाणे.

रचना: एकूण २० एलएचबी डबे = एसी २ टियर – ०१ डबा, एसी ३ टियर – ०३ डबे, एसी ३ टियर इकॉनॉमी – ०२ डबे, स्लीपर – ०८ डबे, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

गाडी क्र. ०१५०२ आणि ०१५०१ साठी आरक्षण १२ ऑगस्ट २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर, इंटरनेट व आयआरसीटीसी वेबसाईटवर खुले होईल.

 

Sangameshwar: फक्त चर्चा… कृती शून्य! संगमेश्वरची पुन्हा थट्टा!

गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने वेगवान हालचाली घडोत, हीच जनसामान्यांची कामना!

   Follow us on        

गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर वासी जनतेला आनंदाचं भरतं आलं होतं! कारणही तसंच खास, आपल्या मतदार क्षेत्राचे नामदार खासदार नारायण राणे आपल्या तीन एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा या मागणीचे पत्रक घेऊन रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना दिल्ली येथे भेटले. या वेळी कोकण रेल्वेकडून दिलेल्या सकारात्मक प्रस्तावाची प्रत जोडली होती.

योगायोग म्हणजे त्याच दिवशी खासदार सुनील तटकरे हे सुद्धा अंजनी, कोलाड या स्थानकांवर काही एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीसाठी रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला गेले होते. तसा तो दिवस कोकणातील जनतेसाठी आनंदाचा. ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त रेल्वे गाड्या, आणि सोबत एक्स्प्रेसना थांबा मिळणार म्हणून सगळेच आनंदात!

पण काही दिवसांनी अंजनी,कोलाड स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाल्याचे पत्र मिळाले. पण संगमेश्वरच्या जनतेला प्रतिक्षेत ठेवले होते. आता खूप दिवस झाले. जवळपास एक महिना लोटला तरी मागण्यांचा विचार रेल्वे बोर्ड किंवा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला नाही.

दोन्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वे बोर्ड कोकण रेल्वे बोर्डाने अधिकृत आदेश दिले असल्याचे कळविले. खातरजमा करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अशा आशयाचे रेल्वे बोर्डाचे पत्र प्राप्त न झाल्याचे सांगितले जात आहे. चेंडूची टोलवाटोलव केली जाते आहे.

नेमकी रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे यांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या मतदार क्षेत्रातील खासदार आपापल्या क्षेत्रातील समस्या घेऊन येतात. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यातील एका खासदारांच्या मागणीला त्वरित हिरवा झेंडा दाखवला गेला. मग मागील दोन अडीच वर्षांपासून कायम पाठपुरावा करीत असलेल्या मागणीला प्रतिक्षा यादीत ढकलून वजनाचा फेरफार रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे प्रशासनाने आमच्या निदर्शनास आणून दिला आहे काय? अशी आगपाखड जनसामान्यांनी केली आहे.

कोंबड्या बकऱ्यांसारखा खचखच गर्दीने भरलेल्या रेल्वेचा प्रवास कोकणी माणूस करतो. कधी जास्तीची अपेक्षा न करणारा कोकणी माणूस कायम अन्याय सहन करतो आहे. संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज, अनेक धार्मिक स्थळे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे यांमुळे आता पर्यटन वाढले. पण या कंटाळवाण्या रेल्वे प्रवासामुळे पर्यटक नाखुश आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसांत अतिरिक्त सोडण्यात येत असलेल्या रेल्वे गाड्या, त्यात मागणी जवळजवळ मान्य झाल्याचा विश्वास यामुळे सगळे चाकरमानी आणि संगमेश्वरची जनता खुशीत होती. पण खासदार नारायण राणे यांच्या भेटीनंतरही उपेक्षित रहावे लागत असेल तर हा मोठ्या प्रतिष्ठेचा विषय आहे. संगमेश्वरच्या या मागण्यांसाठी आमदार, खासदार रेल्वे मंत्र्यांशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. पण तरीही मागण्यांचा विचार होत नाही. प्रतिक्षा यादीत कुठवर संगमेश्वर वासी यांच्या मागण्या घुटमळत ठेवणार? या गणेशोत्सवात थांबे मिळाले तरच बाप्पा पावले म्हणू!

नाहीतर जनसामान्यांचा असंतोष उफाळून येणार,हे मात्र नक्की!

-रुपेश मनोहर कदम/सायले

Railway Updates: ५२ गाड्यांसाठी नवीन थांबे जाहीर; कोकण रेल्वे मार्गावर ४ गाड्यांचा समावेश.. यादी इथे वाचा

   Follow us on        

Railway Updates:प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवरील गाड्यांना काही ठिकाणी नवीन थांबे मंजूर केले आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एकूण ५२ गाड्यांना इगतपुरी, देवळाली, भडली, मोहोळ, भिवंडी रोड, वालिवडे, विलाड, वांबोरी, सारोळा, राहुरी, रंजनगाव रोड, पाधेगाव, कासठी, चितळी, बेलवंडी, अकोलनेर, रोहा, पेन, जांबारा, हिरडगड, मार्तूर, कुलाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, साईनगर शिर्डी, अमरावती, गोंदिया, गोरखपूर, हावडा, कोल्हापूर, निजामाबाद, पुणे, सावंतवाडी रोड, दादर, दिवा, बेंगळुरू, जोधपूर, इंदूर, हैदराबाद, विजयपूर अशा विविध मार्गांवरील एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील ११००३/११००४ दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि १०१०५/ ५०१०५ दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस यांनाही अनुक्रमे रोहा व पेन येथे थांबे मंजूर झाले आहेत.

क्रमांक गाडी क्रमांक / नाव स्थानक
१२१८८ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – जबलपूर एक्सप्रेस इगतपुरी
१२१८७ जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१३२ साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस इगतपुरी
१२१३१ दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस इगतपुरी
१२११२ अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१११ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – अमरावती एक्सप्रेस इगतपुरी
१२१०६ गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१०५ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – गोंदिया एक्सप्रेस इगतपुरी
२२५३७ गोरखपूर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस देवळाली
१० १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस देवळाली
११ १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – हावडा एक्सप्रेस देवळाली
१२ २२५३८ लोकमान्य टिळक (टी) – गोरखपूर एक्सप्रेस देवळाली
१३ ५९०७६ भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर भडली
१४ ५९०७५ नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर भडली
१५ १२११६ सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस मोहोळ
१६ १२११५ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – सोलापूर एक्सप्रेस मोहोळ
१७ १६५०८ बेंगळुरू – जोधपूर एक्सप्रेस भिवंडी रोड
१८ १६५०७ जोधपूर – बेंगळुरू एक्सप्रेस भिवंडी रोड
१९ ११०३० कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस वालिवडे
२० ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – कोल्हापूर एक्सप्रेस वालिवडे
२१ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस विलाड
२२ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस विलाड
२३ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस वांबोरी
२४ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस सारोळा
२५ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस सारोळा
२६ ११०४२ साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस राहुरी
२७ ११०४१ दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस राहुरी
२८ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस रंजनगाव रोड
२९ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस रंजनगाव रोड
३० ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस पाधेगाव
३१ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस पाधेगाव
३२ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस कासठी
३३ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस कासठी
३४ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस चितळी
३५ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस चितळी
३६ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस बेलवंडी
३७ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस बेलवंडी
३८ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस अकोलनेर
३९ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस अकोलनेर
४० ११००४ सावंतवाडी रोड – दादर एक्सप्रेस रोहा
४१ ११००३ दादर – सावंतवाडी रोड एक्सप्रेस रोहा
४२ ५०१०५ सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस पेन
४३ १०१०५ दिवा – सावंतवाडी रोड एक्सप्रेस पेन
४४ १९३४४ नैनपूर – इंदूर एक्सप्रेस जांबारा
४५ १९३४३ इंदूर – नैनपूर एक्सप्रेस जांबारा
४६ १९३४४ नैनपूर – इंदूर एक्सप्रेस हिरडगड
४७ १९३४३ इंदूर – नैनपूर एक्सप्रेस हिरडगड
४८ १७०३० हैदराबाद – विजयापूरा एक्सप्रेस मार्तूर
४९ १७०२९ विजयापूरा – हैदराबाद एक्सप्रेस मार्तूर
५० १७०३० हैदराबाद – विजयापूरा एक्सप्रेस कुलाळी
५१ १७०२९ विजयापूरा – हैदराबाद एक्सप्रेस कुलाळी
५२ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस वांबोरी

सावंतवाडी: नाकर्त्या प्रशासनाचा अजून एक बळी

   Follow us on        

सावंतवाडी: रविवारी चराठे-ओटवणे रस्त्यावर झालेल्या अपघतात कारिवडे गावातील ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजारातून दुचाकीवरून घरी जात असताना येथील एका वळणावर त्याचा दुचाकीवरून ताबा सुटून ती एका मोठ्या दगडावर आढळली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात गंभीर जखमी रुग्णांना उपचार करण्याची सोय नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याला बांबुळी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

मात्र तिथे कोणतीही रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना रुग्णवाहिका शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. १०८ वरून मागवलेली रुग्णवाहिका बांद्यावरून जवळपास सव्वा ते दिड तासाने आली. रुग्णाला घेऊन ती रुग्णवाहिका निघाली खरी मात्र बांबुळी रुग्णालयात पोहोचेपर्यंत परशुरामची प्राणज्योत मालवली.

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती आणि परशुरामवर वेळेत उपचार चालू झाले असते तर त्याचा जीव वाचवता आला असता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा जीव गेला. असे अजून किती बळी प्रशासन घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. L

सावंतवाडी तालुक्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते अजून काही वर्षे होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. मात्र ते होईपर्यंत किमान गंभीर जखमी रुग्णांना गोवा राज्यात जलद गतीने नेण्यासाठी रुग्णवाहिका तरी उपलब्ध करून द्यावी. येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देऊन सरळ आपले हात वर करतात. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो. साहजिकच याबाबत त्यांना कल्पना नसल्याने खूप वेळ वाया जातो. येथील प्रशासन अशा गंभीर जखमी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी एक-दोन रुग्णवाहिका का ठेवू शकत नाही हा पण एक प्रश्नच आहे.
सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चे काय झाले?
१६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना या हॉस्पिटलच्या कामास गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी या हॉस्पिटलसाठीची जागा सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच असावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र काही राजकीय मंडळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंबकर यांनी सावंतवाडीतील ‘यशराज मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ या पर्यायी प्रकल्पाला महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की जागेचा वाद सुटला तरी हॉस्पिटल उभारणीस किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची वाटचाल ठप्प झाली असून अद्याप कोणतेही ठोस पाऊल पुढे पडलेले नाही.

सावंतवाडी आणि आजूबाजूचा परिसर अजूनही अशा प्रकारच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहे. सावंतवाडीत एक सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पटिल व्हावे ही मागणी राजकीय इच्छा शक्ती अभावी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवेला आता कोकणातही ‘हॉल्ट’

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळाने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दरम्यान सुरू केलेल्या रो-रो (Ro-Ro) कार ट्रान्सपोर्टेशन सेवेला आता नवा थांबा मिळाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी नांदगाव रोड स्थानकावर या सेवेसाठी अतिरिक्त थांबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कार मालकांसाठी ही सेवा अधिक लवचिक आणि उपयोगी ठरणार आहे. आता प्रवासी कोलाड, नांदगाव रोड किंवा वेर्णा या कोणत्याही स्थानकावरून कार लोड आणि अनलोड करू शकतील.

या सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोलाड ते वेर्णा दरम्यान एका कारसाठी भाडे ₹७८७५/- (५% GST सहित) आहे, तर कोलाड ते नांदगाव दरम्यानचे भाडे ₹५४६०/- इतके आहे. प्रत्येक कारसाठी ₹४०००/- नोंदणी शुल्क आकारले जाईल, जे सेवेसाठी पात्र ठरल्यास अंतिम भाड्यातून वजा केले जाईल. मात्र, जर १६ हून कमी बुकिंग्स प्राप्त झाल्या तर सेवा रद्द करण्यात येईल आणि नोंदणी शुल्क परत करण्यात येईल.

कार लोड झाल्यानंतर चालक किंवा सहप्रवाशांना कारमध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नसेल. त्याऐवजी प्रवाशांनी रेल्वेच्या कोचमध्ये 3AC किंवा 2S वर्गात तिकिट काढून प्रवास करावा लागेल. एका कार बुकिंगवर ३ प्रवासी (२ जण 3AC आणि १ जण 2S) प्रवास करू शकतात. अतिरिक्त प्रवासी केवळ रिक्त जागा उपलब्ध असल्यासच प्रवास करू शकतील.

या नव्या थांब्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. कोलाडहून वेर्णाकडे जाणारी सेवा दुपारी ३ वाजता सुटेल आणि नांदगाव रोडवर रात्री १० वाजता पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा स्थानकात आगमन होईल. वेर्णाहून परतीच्या प्रवासात गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, नांदगावला रात्री ८ वाजता पोहोचेल आणि कोलाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल.

नोंदणीसाठी कोलाड, वेर्णा किंवा कणकवली (नांदगावसाठी) स्थानकावर संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी आणि अटी व शर्तींसाठी अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेच्या समस्या आणि उपाययोजना: सागर तळवडेकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वे संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेली जनजागृती वाखाणण्याजोगी असून, युवकांच्या सहभागातून कोकण रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे संपर्क प्रमुख श्री. सागर तळवडेकर यांनी “कोकण रेल्वे समस्या आणि निवारण – माझ्या नजरेतून” या शीर्षकाखाली तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

“कोकण रेल्वे समस्या आणि निवारण.
माझ्या नजरेतून..

नमस्कार मंडळी, काही वर्षापासून कोकण रेल्वे संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना तळकोकणात जी जनजागृती झालीत ती खरच वाखण्याजोगे आहे. याआपल्या माहिती साठी सांगतो की 2017 ते 2020 पर्यंत सावंतवाडीचे कै. डी के सावंत यांनी जी रेल्वे संदर्भात मुहूर्त बांधली ती आता कुठे रंगू लागली आहे. कोरोना काळात कोणालाही न कळता सावंतवाडी आणि कणकवली स्थानकावरून गाड्या कमी करण्यात आल्या, परंतु तेव्हा याचा विरोध कोणी केला नव्हता, त्यात सावंतवाडी येथील प्रस्तावित टर्मिनसचे काम देखील ठप्प पडले होते.
‎दरम्यानच्या काळात सावंतवाडीतील काही तरुणांनी बॅनर लावून केलेली रेल्वे प्रशासनाची थट्टा पूर्ण जिल्हाभर गाजली होती.आणि येथूनच या सिंधुदुर्गात कोकण रेल्वे महामंडळाविरोधात कोकणवासीयांची नकारात्मकता दिसून यायला लागली.
‎वर्षं 2022, जेव्हा कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली आणि सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेले थांबे कर्नाटक राज्यातील स्थानकांना देण्यात आले तेव्हा सावंतवाडीतील काही युवकांच्या मनात पाल चुकचुकली. आणि इथूनच काल पर्यंत झालेले आंदोलन हे त्याचेच फळ. आणि हो कोकणातील अजून स्थानकांवर पुढेही आंदोलने होतील..!! 

समस्या क्र. १.- कोकण रेल्वे नेमकी कोणाची..??

‎बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या महनीय व्यक्तींमुळे रेल्वे कोकणात आली खरी, परंतु फायदा कोकणाला काही झालाच नाही. मुळात कोकण रेल्वे हे एक महामंडळ असल्याकारणाने याला अर्थसंकल्पीय तरतूदच नाही. त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक, आदी उत्पन्नावर या महामंडळाला आपला कारभार हाकावा लागतो.
‎उपाय- या महामंडळाचे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करणे.आणि कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करणे. यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांनी आपली संमती देणे आवश्यक आहे.
‎महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केलीय. त्यासाठी आम्ही युवकांनी मेल मोहीम करून हा मुद्दा खासदार धैर्यशील मोहिते, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, रविंद्र वाईकर आदींकडून लोकसभेत आणि राज्यसभेत उपस्थित केला.(त्यांनी मांडलेला मजकूर आणि आम्ही केलेली मेल मोहिमेतील मजकूर यात १०० टक्के साधर्म्य होते) १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेऊन या विषयाला महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोचवले होते.

समस्या क्र. २.- कोकणी माणसांना तिकिटे, नवीन गाड्या कधी मिळणार..?? खरंच टर्मिनसची आवश्यकता असते का??

‎कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या ह्या बारामाही फुल धावतात, त्यामुळे आपला कोकणी माणूस हा वेटींग वरच राहतो.याला मूळ कारण काय असावे बरे..?? काही लोक म्हणतील एजंट..!!परंतु मी म्हणतो याला एजंट कारणीभूत नाही, एजंट हे तांत्रिक कारण असूच शकत नाही. मूळ कारण हे टर्मिनस सुविधा आहे.
‎कोकणात टर्मिनस नसल्याकारणाने येथून गाड्या सोडण्यावर निर्बंध येतात.त्यामुळे कोकणसाठी नवीन गाडी सोडायची म्हटल्यावर ती गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत सोडली जाते,आणि इथेच सगळा खेळ होऊन जातो. कारण गोव्यात बाराही महिने पर्यटकांचा भरणा चालू असतो, गोव्यातील मडगाव आणि थिवी हे स्थानक प्रवासी संख्या आणि उत्पन्नात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून गाडी जर गोव्यापर्यंत गेली तर सर्वात जास्त तिकीट कोटा ही तेथील स्थानकांना अधिक मिळतो आणि आपली कोकणी जनता वेटींग वर मूग गिळून गप्प राहते आणि आपला रोष एजंट वर काढते.
‎उपाय – कोकणाला जर कोकणमर्यादित गाड्या हव्या असतील, पुरेसा तिकीट कोटा हवा असेल तर कोकणात स्वतंत्र टर्मिनसची नितांत आवश्यकता आहे.
त्यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे टर्मिनस मंजूर केले खरे परंतु कोकणवासीयांचा निद्रस्त भूमिकेमुळे हे टर्मिनस गेले १० वर्ष रखडले.
सावंतवाडीत जर टर्मिनस आणि कोचिंग डेपो झाला तर त्याचा फायदा फक्त सावंतवाडीला होणार नसून तर संपूर्ण कोकणला त्याचा फायदा होईल. ज्या प्रमाणे तुतारी एक्सप्रेस मध्ये फक्त कोकणी मनुष्य मुंबई पर्यंतचा प्रवास करतो तसाच प्रवास अजून काही गाड्या सावंतवाडी वरून सुरू झाल्यास होईल. त्यासाठी परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपोची आवश्यकता आहे.

समस्या क्र. ३.- कोकण रेल्वे महामार्गाचे दुहेरीकरण कधी..??वाढीव थांबे कधी मिळणार..??सिंधुदुर्गात १५ गाड्या का थांबत नाहीत??येथील प्रवासी सुविधांचे काय..??

‎कोकण रेल्वे हे केंद्राचा रेल्वे मंत्रालय संलग्न महामंडळ आहे,ज्या मध्ये ४ राज्यांची हिस्सेदारी आहे. आणि सदर महामंडळ सध्या कर्जाच्या खाईत आहे, आजमितीस या महामंडळावर हजारो कोटीच्या घरात कर्ज आहे.
‎उपाय – आजचा घडीला कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण दुहेरीकरण करण्यासाठी किमान ४० हजार कोटींची गरज आहे.जे एका महामंडळाला झेपण्यासारखे नाही. याचकारणाने सध्या या मार्गाचे दुहेरीकरण होणे शक्य नाही.या महामंडळाने टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव प्रत्येक राज्यसरकारला पाठवला होता परंतु त्याचे घोडे पुढे धावलेच नाहीत.
‎थांब्यासंदर्भात बोलायचे झाले तर त्याला मोठा जन लढा उभारावा लागतो कारण जो पर्यंत मागणी करत नाही तो पर्यंत त्याचा वर कारवाई होत नाही. मी एक रेल्वेचा अभ्यासक म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्याचे एक कारण म्हणजे आपली उदासीनता.त्यामुळेच कदाचित सिंधुदुर्गात एकूण १५ गाड्या थांबत नाहीत, त्यात सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेली राजधानी एक्सप्रेस व गरीब रथ एक्सप्रेस आणि कणकवली स्थानकातून काढलेली हिसार कोइंबतूर एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

‎येथील प्रवासी सुविधासंदर्भात बोलायचे झाले तर आम्ही सिंधुदुर्गातील तरुण युवक गेले दोन वर्षे याचा पाठपुरावा करत आहोत याचे फलित म्हणजे वैभववाडी येथे पादचारी पूलचे काम सुरू आहे ( ओंकार लाड व टीम चे प्रयत्न), कणकवली येथे प्लॅटफॉर्म २ वर २५० मीटरचा COP ( कव्हर ऑन प्लॅटफॉर्म) म्हणजेच निवारा शेड, व खाली जाणारा सरकता जिना.(सुनीत चव्हाण आणि टीम). सिंधुदुर्ग येथे PRS सुविधा, वांद्रे मडगाव एक्स्प्रेसचा थांबा (शुभम परब आणि टीम).
सावंतवाडी येथे अप्रोच रोडचे काम ९० टक्के पूर्ण, PRS सुविधा पूर्णवेळ सुरू, वांद्रे – मडगाव व नागपूर मडगाव एक्स्प्रेसचे थांबे मिळाले, प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटरचा COP आणि लिफ्ट प्रस्तावित/ मंजूर. (सागर, मिहिर, भूषण आणि टीम) आदी.
मंडळी, या काही महत्त्वाचा समस्या जे मला वाटतात. याव्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील आणि माझ्याकडून काही चुकल्या असतील.तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता. मी आणि माझी संपूर्ण टीम त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू.‎‎आपल्या सूचनांचे नक्कीच स्वागत करून मी थांबतो.”


‎- ‎सागर तळवडेकर
‎उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.
‎संपर्क प्रमुख, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

सावंतवाडी: दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी, ता.०३ –

चराठा-नमसवाडी रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे आहे. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम पोखरे हे म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होते. रविवारी सुट्टीमुळे ते काही कामानिमित्त गावी आले होते. चराठा येथे चिकन घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, ओटवणे रस्त्यावर ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी बाजूच्या दगडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीसह रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

वैभववाडी: देव तरी त्याला कोण मारी! करूळ घाटातील अपघातात दोघेजण थोडक्यात वाचले

   Follow us on        

वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.

अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली.  टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.

   

सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले.  चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

 

Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on        

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search