Category Archives: कोकण

गणेशचतुर्थीसाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीच्या मुदतीत वाढ

   Follow us on        

Konkan Railway : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने अहमदाबाद जंक्शन ते मंगळूरू जंक्शन दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष ट्रेनच्या (Train No. 09424 / 09423) फेऱ्यांच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

​गाडी क्रमांक ०९४२४ (अहमदाबाद – मंगळूरू जंक्शन साप्ताहिक विशेष): ही ट्रेन आता २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, दर शुक्रवारी नियमितपणे धावेल.

​गाडी क्रमांक ०९४२३ (मंगळूरू जंक्शन – अहमदाबाद साप्ताहिक विशेष): ही ट्रेन २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, दर शनिवारी धावेल.

​वेळापत्रक आणि पावसाळी/विना-पावसाळी वेळा:

​दोन्ही गाड्या १६ ऑक्टोबर २०२६ (गाडी क्र. ०९४२४) आणि १७ ऑक्टोबर २०२६ (गाडी क्र. ०९४२३) पर्यंत सध्याच्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावतील.

​२३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या फेऱ्यांसाठी नवीन विना-पावसाळी (Non-Monsoon) वेळापत्रक लागू होईल:

​गाडी क्र. ०९४२४: अहमदाबादहून दर शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०:०० वाजता मंगळूरू जंक्शनला पोहोचेल (२३ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२६).

​गाडी क्र. ०९४२३: मंगळूरू जंक्शनहून दर शनिवारी रात्री २२:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:१५ वाजता अहमदाबाद जंक्शनला पोहोचेल (२४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६).

​प्रमुख थांबे:

ही विशेष ट्रेन नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदानपूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबेल.

​प्रवाशांनी या विस्तारित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ३ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) मार्फत पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठित आणि संगणकीकृत पद्धतीने राबवली जाणार आहे.

   Follow us on        

​सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नव्याने मंजूष मिळालेल्या ६७ लिपिक जागांसाठी देशपातळीवरील नामांकित आणि विश्वासू संस्था असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) कडे या नवीन भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी बँक आपली भरती प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) मार्फत पार पाडत असे आणि निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊन ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. आता नव्या टप्प्यात टीसीएससोबत अधिकृत करार करून पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे, ज्याचे वेळापत्रक अधिकृतपणे निश्चित झाले आहे.

​बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांना ३ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत असणार आहे, तर या भरतीसाठीची संगणकाधारित परीक्षा १८ ऑक्टोबर २०२६ च्या दरम्यान घेतली जाईल. टीसीएसला विविध बँका, वित्तीय संस्था आणि शासकीय उपक्रमांच्या परीक्षा आयोजित करण्याचा मोठा अनुभव असल्याने ही परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

​ग्राहकांना उत्तम आणि आधुनिक बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने तसेच वाढत्या व्यावसायिक विस्ताराला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडून ही भरती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बँकेच्या शाखांमधील कामकाजात अधिक कार्यक्षमता यावी आणि ग्राहकोपयोगी सेवा अधिक परिणामकारक ठराव्यात, यासाठी लिपिक वर्गाची ही पदे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गसह परिसरातील नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र तरुणांसाठी ही एक उत्तम व सुवर्णसंधी मानली जात आहे.

​या संपूर्ण भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात, पदांसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम यांसारख्या सर्व महत्त्वपूर्ण अटी-शर्ती लवकरच बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी १ सप्टेंबर २०२६ नंतर बँकेची ही वेबसाईट नियमितपणे तपाजत राहावी, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची सूचना किंवा अद्ययावत माहिती हुकणार नाही आणि वेळेत अर्ज करता येईल.

​बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्ह्यातील तमाम पात्र व इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि निश्चित केलेल्या मुदतीत आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत. सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्याने उमेदवारांनी कोणतीही गैरसमजुती न बाळगता केवळ आपल्या अभ्यास व योग्य तयारीवर भर देऊन या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले आहे.

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी

गणपतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वे तिकिटांची कमतरता लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी अहमदाबाद-मंगळुरु साप्ताहिक विशेष ट्रेनला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.

   Follow us on        

​कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये सध्या क्षमतेपेक्षा बरीच जास्त प्रवासी संख्या दिसून येत आहे. विशेषतः गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, लाखो इच्छुकांना अजूनही रेल्वेची तिकिटे मिळालेली नाहीत. या प्रचंड गर्दीला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने आधीच शेकडो विशेष फेऱ्या सुरू केल्या आहेत.

​याच पार्श्वभूमीवर, कोकण आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू-अहमदाबाद साप्ताहिक विशेष ट्रेनला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.

​ही विशेष प्रवासी सुविधा येत्या २८ ऑगस्ट २०२६ पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. यामुळे डहाणू आणि पालघर परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

​वेळापत्रकानुसार, अहमदाबाद-मंगळुरू साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक ०१९२४) पालघरला रात्री १० वाजून २ मिनिटांनी पोहोचेल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर रात्री १० वाजून ४ मिनिटांनी मंगळुरूच्या दिशेने रवाना होईल. तसेच परतीच्या प्रवासात, मंगळुरु-अहमदाबाद विशेष गाडी (क्रमांक ०१९२३) पालघर येथे संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पोहचून ७ वाजून १२ मिनिटांनी अहमदाबादकडे सुटेल.

​ही विशेष ट्रेन अहमदाबाद येथून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता निघून पालघर, वसई रोड, रत्नागिरी आणि मडगाव मार्गे दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी मंगळुरूहून सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल, जी विशेष भाडे आकारणीसह धावणार असून प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवासाठी दोन दिवस धावणार ‘मोदी एक्सप्रेस’

 

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबर रोजी विशेष ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन धावणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान ्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची यावर्षीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही गाडी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील फलाट क्रमांक १४ वरून सकाळी १०:३० वाजता कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.

​मुंबईहून सुटणारी ही विशेष रेल्वे गाडी रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी येथे पोहोचणार असून प्रवाशांसाठी प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्षाेशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. यामध्ये कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडाध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

​गेल्या १४ वर्षांपासून ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावात पोहोचवत असताना प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून मनापासून आनंद होतो, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यंदाही सर्व चाकरमानी नाчыत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’साठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली हक्काची मोदी एक्सप्रेस पकडावी आणि बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात गावाकडे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Konkan Railway: मुंबई – मडगाव मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी विशेष गाड्या जाहीर!

Konkan Railway: 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

​या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​गाडीचे वेळापत्रक आणि फेऱ्या:

​गाडी क्रमांक 01007 (CSMT – मडगांव विशेष):

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२:४० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ०३:३० वाजता मडगांव येथे पोहोचेल.

​दिनांक: ११.०९.२०२६ (शुक्रवार) आणि १३.०९.२०२६ (रविवार). (एकूण २ फेऱ्या)

​गाडी क्रमांक 01008 (मडगांव – CSMT विशेष):

​मडगांव येथून सायंकाकाळी ०४:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

​दिनांक: ११.०९.२०२६ (शुक्रवार) आणि १३.०९.२०२६ (रविवार). (एकूण २ फेऱ्या)

​गाडीची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनमध्ये एकूण २२ आयसीएफ (ICF) कोच असतील, ज्यामध्ये २ वातानुकूलित तृतीय (3AC), १२ शयनयान (Sleeper), ६ सामान्य द्वितीय श्रेणी (GS) आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन (SLRD) समाविष्ट आहेत.

या गाडीचे थांबे

  • ​दादर
  • ​ठाणे
  • ​पनवेल
  • ​पेण
  • ​रोहा
  • ​माणगाव
  • ​वीर
  • ​खेड
  • ​चिपळूण
  • ​सावर्डे
  • ​आरवली रोड
  • ​संगमेश्वर रोड
  • ​रत्नागिरी
  • ​आडवली
  • ​विलवडे
  • ​राजापूर रोड
  • ​वैभववाडी रोड
  • ​नांदगाव रोड
  • ​कणकवली
  • ​सिंधुदुर्ग
  • ​कुडाळ
  • ​सावंतवाडी रोड
  • ​थिवी
  • ​करमळी

​आरक्षण आणि तिकीट बुकिंग

​आरक्षण सुरू होण्याची तारीख: शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून आयआरसीटीसी (IRCTC) आणि RailOne वर आरक्षण सुरू होईल.

​महत्त्वाची टीप: या गाडीच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा RailOne अथवा NTES ॲप डाऊनलोड करा. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ॲपचा वापर केल्यास अधिकृत माहिती मिळेलच याची शाश्वती नाही.

वेर्णा येथे कोकण रेल्वे मार्गावर रो-रो वॅगन रुळावरून घसरली

वेर्णा: कोकण रेल्वे मार्गावर वेर्णा येथे रो-रो वॅगन रुळावरून घसरल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्ती आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले.

​रेल्वे प्रशासनाच्या पथकांनी सुमारे चार तास अथक प्रयत्न करून, रुळावरून घसरलेल्या रो-रो वॅगनमुळे अडकलेला रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत केला. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीतपणे पूर्ववत करण्यात आली.

​दरम्यान, रो-रो वॅगन रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेमुळे रेल्वे मार्गाचे किंवा अन्य रेल्वे मालमत्तेचे किती नुकसान झाले आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची पाहणी आणि आवश्यक तपास केला जात असून, वॅगन घसरण्यामागील नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच याविषयी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Raksha Bandhan Special Train : कोकण रेल्वे मार्गावर धावणार भुसावळ – मडगाव रक्षाबंधन विशेष गाडी

Konkan Railway : सणासुदीला प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचा मार्ग सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या समन्वयाने एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या कोचींग अधिसूचना क्रमांक ७४५/२०२६ नुसार ही गाडी भुसावळ जंक्शन ते मडगाव जंक्शन दरम्यान चालवली जाईल. ही वन-वे स्पेशल ट्रेन (टाईप-टीओडी, सब टाईप-ईएक्सआरएच) असणार असून, यामुळे कोकण आणि दक्षिण भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाडी क्रमांक ०११०१ ही विशेष ट्रेन भुसावळ जंक्शन येथून २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १९:०० वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. भुसावळहून निघाल्यानंतर ही गाडी मध्य रेल्वेच्या विविध प्रमुख स्थानकांवरून मार्गक्रमण करत पुढे सरकेल. या गाडीच्या नियोजित वेळेनुसार ती रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या हद्दीतील स्थानकांवर थांबत प्रवाशांना सेवा देईल.

​प्रवास मार्गामध्ये ही गाडी नाशिक रोड (०१:१५/०१:२० वा.), इगतपुरी (०२:२०/०२:२५ वा.), कल्याण (०४:००/०४:०३ वा.) आणि पनवेल (०५:००/०५:०५ वा.) या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. यानंतर रोहा स्थानकावर पोहोचल्यानंतर (सकाळी ०६:२०/०६:२५ वा.) ही गाडी कोकण रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करेल. रोहा ते मडगाव या टप्प्यासाठी कोकण रेल्वेचे कर्मचारी या गाडीचे संचालन पाहणार आहेत.

​कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी चिपळूण (०९:२०/०९:२५ वा.), रत्नागिरी (११:३०/११:३५ वा.) आणि सावंतवाडी रोड (१३:५०/१३:५५ वा.) येथे थांबेल. याशिवाय गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताना थिविम् (१४:२०/१४:२५ वा.) आणि करमळी (१४:५०/१४:५५ वा.) स्थानकांवर थांबून ही विशेष ट्रेन २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १७:०० वाजता मडगाव जंक्शन येथे आपला प्रवास पूर्ण करेल.

​या विशेष गाडीची रचना एकूण २० आयसीएफ (ICF) कोचेसची आहे, ज्यामध्ये १८ शयनयान (GSCN) आणि २ एसएलआरडी (SLRD) कोचेसचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रवासादरम्यान आणि रेल्वे स्थानकांवर राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे तसेच सामाजिक अंतर व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

Konkan Railway: जबलपूर – कोईम्बतूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस नियमित होणार

पश्चिम मध्य रेल्वे: रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनुसार, पश्चिम मध्य रेल्वेने जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर विशेष गाड्या (Train Nos. 02198/02197) नियमित (regularise) करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता ही सेवा ट्रेन क्रमांक 20160/20159 जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावणार आहे.

​गाडीची सुरुवातीची तारीख आणि वार

​जबलपूर ते कोईम्बतूर (ट्रेन क्र. 20160): ही नियमित सेवा २३ ऑक्टोबर २०२६ पासून दर शुक्रवारी जबलपूरहून रात्री २३.५० वाजता सुरू होईल.

​कोईम्बतूर ते जबलपूर (ट्रेन क्र. 20159): ही सेवा २६ ऑक्टोबर २०२६ पासून दर सोमवारी कोईम्बतूरहून सायंकाल १७.०५ वाजता धावेल.

​डब्यांची रचना (Coach Composition)

​या गाडीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे एकूण २२ डबे असतील:

​१ – प्रथम वातानुकूलित वर्ग (AC First Class)

​२ – द्वितीय वातानुकूलित वर्ग (AC Two Tier)

​६ – तृतीय वातानुकूलित वर्ग (AC Three Tier)

​९ – स्लीपर कोच (Sleeper Class)

​४ – साधारण द्वितीय श्रेणी (General Second Class)

​२ – दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल द्वितीय श्रेणी डबे (Second Class Coaches – Divyangjan Friendly)

​अग्रिम आरक्षण (Advance Reservation)

​या नियमित सेवेसाठीचे अग्रिम आरक्षण दक्षिण रेल्वेच्या वतीने २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ०८.०० वाजल्यापासून सुरू होईल.

जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या दोन्ही फेऱ्यांचे (ट्रेन क्र. 20160 आणि ट्रेन क्र. 20159) सविस्तर थांबे आणि वेळापत्रक दिले आहे:

ट्रेन क्र. 20160: जबलपूर ते कोईम्बतूर (शुक्रवार)

  •  * जबलपूर (Jabalpur): आगमन – / प्रस्थान – 23.50 (शुक्रवार)
  •  * नरसिंहपूर (Narsinghpur): आगमन/प्रस्थान – 00.48 / 00.50
  •  * गाडरवारा (Gadarwara): आगमन/प्रस्थान – 01.23 / 01.25
  •  * पिपरिया (Pipariya): आगमन/प्रस्थान – 02.03 / 02.05
  •  * इटारसी (Itarsi): आगमन/प्रस्थान – 03.50 / 04.00
  •  * हरदा (Harda): आगमन/प्रस्थान – 04.35 / 04.37
  •  * खंडवा (Khandwa): आगमन/प्रस्थान – 06.42 / 06.45
  •  * भुसावळ (Bhusaval): आगमन/प्रस्थान – 08.25 / 08.30
  •  * नाशिक रोड (Nasik Road): आगमन/प्रस्थान – 11.37 / 11.40
  •  * पनवेल (Panvel): आगमन/प्रस्थान – 15.20 / 15.25
  •  * रोहा (Roha): आगमन/प्रस्थान – 16.45 / 16.50
  •  * खेड (Khed): आगमन/प्रस्थान – 18.10 / 18.12
  •  * चिपळूण (Chiplun): आगमन/प्रस्थान – 18.28 / 18.30
  •  * रत्नागिरी (Ratnagiri): आगमन/प्रस्थान – 20.20 / 20.25
  •  * कणकवली (Kankavli): आगमन/प्रस्थान – 22.00 / 22.02
  •  * कुडाळ (Kudal): आगमन/प्रस्थान – 22.38 / 22.40
  •  * थिविम (Thivim): आगमन/प्रस्थान – 23.16 / 23.18
  •  * मडगाव जंक्शन (Madgaon Jn): आगमन/प्रस्थान – 00.15 / 00.25
  •  * कारवार (Karwar): आगमन/प्रस्थान – 01.10 / 01.12
  •  * कुमटा (Kumta): आगमन/प्रस्थान – 01.56 / 01.58
  •  * मूकंबिका रोड बैंदूर (Mookambika Road Byndoor – Halt): आगमन/प्रस्थान – 03.02 / 03.04
  •  * कुंदापुरा (Kundapura): आगमन/प्रस्थान – 03.32 / 03.34
  •  * उडुपी (Udupi): आगमन/प्रस्थान – 04.16 / 04.18
  •  * मुल्की (Mulki): आगमन/प्रस्थान – 04.56 / 04.58
  •  * मंगलुरू जंक्शन (Mangaluru Jn): आगमन/प्रस्थान – 06.35 / 06.45
  •  * कासरगोड (Kasaragod): आगमन/प्रस्थान – 07.28 / 07.30
  •  * कन्नूर (Kannur): आगमन/प्रस्थान – 08.37 / 08.40
  •  * वडकरा (Vadakara): आगमन/प्रस्थान – 09.14 / 09.16
  •  * कोझिकोड (Kozhikode): आगमन/प्रस्थान – 09.52 / 09.55
  •  * तिरूर (Tirur): आगमन/प्रस्थान – 10.18 / 10.20
  •  * शोरानूर (Shoranur): आगमन/प्रस्थान – 11.25 / 11.30
  •  * पालक्काड (Palakkad): आगमन/प्रस्थान – 12.37 / 12.40
  •  * कोईम्बतूर (Coimbatore): आगमन – 14.30 (रविवार) / प्रस्थान –

२. ट्रेन क्र. 20159: कोईम्बतूर ते जबलपूर (सोमवार)

  •  * कोईम्बतूर (Coimbatore): आगमन – / प्रस्थान – 17.05 (सोमवार)
  •  * पालक्काड (Palakkad): आगमन/प्रस्थान – 18.10 / 18.15
  •  * शोरानूर (Shoranur): आगमन/प्रस्थान – 19.25 / 19.30
  •  * तिरूर (Tirur): आगमन/प्रस्थान – 20.07 / 20.09
  •  * कोझिकोड (Kozhikode): आगमन/प्रस्थान – 20.50 / 20.55
  •  * वडकरा (Vadakara): आगमन/प्रस्थान – 21.33 / 21.35
  •  * कन्नूर (Kannur): आगमन/प्रस्थान – 22.05 / 22.10
  •  * कासरगोड (Kasaragod): आगमन/प्रस्थान – 00.03 / 00.05
  •  * मंगलुरू जंक्शन (Mangaluru Jn): आगमन/प्रस्थान – 01.10 / 01.20
  •  * मुल्की (Mulki): आगमन/प्रस्थान – 02.30 / 02.32
  •  * उडुपी (Udupi): आगमन/प्रस्थान – 03.00 / 03.02
  •  * कुंदापुरा (Kundapura): आगमन/प्रस्थान – 03.26 / 03.28
  •  * मूकंबिका रोड बैंदूर (Mookambika Road Byndoor – Halt): आगमन/प्रस्थान – 03.50 / 03.52
  •  * कुमटा (Kumta): आगमन/प्रस्थान – 04.42 / 04.44
  •  * कारवार (Karwar): आगमन/प्रस्थान – 05.26 / 05.28
  •  * मडगाव जंक्शन (Madgaon Jn): आगमन/प्रस्थान – 06.40 / 06.50
  •  * थिविम (Thivim): आगमन/प्रस्थान – 07.46 / 07.48
  •  * कुडाळ (Kudal): आगमन/प्रस्थान – 09.28 / 09.30
  •  * कणकवली (Kankavli): आगमन/प्रस्थान – 10.00 / 10.02
  •  * रत्नागिरी (Ratnagiri): आगमन/प्रस्थान – 12.25 / 12.30
  •  * चिपळूण (Chiplun): आगमन/प्रस्थान – 13.32 / 13.34
  •  * खेड (Khed): आगमन/प्रस्थान – 13.56 / 13.58
  •  * रोहा (Roha): आगमन/प्रस्थान – 15.50 / 15.55
  •  * पनवेल (Panvel): आगमन/प्रस्थान – 16.50 / 16.55
  •  * नाशिक रोड (Nasik Road): आगमन/प्रस्थान – 20.40 / 20.45
  •  * भुसावळ (Bhusaval): आगमन/प्रस्थान – 00.25 / 00.30
  •  * खंडवा (Khandwa): आगमन/प्रस्थान – 02.32 / 02.35
  •  * हरदा (Harda): आगमन/प्रस्थान – 03.48 / 03.50
  •  * इटारसी (Itarsi): आगमन/प्रस्थान – 05.00 / 05.10
  •  * पिपरिया (Pipariya): आगमन/प्रस्थान – 05.58 / 06.00
  •  * गाडरवारा (Gadarwara): आगमन/प्रस्थान – 06.28 / 06.30
  •  * नरसिंहपूर (Narsinghpur): आगमन/प्रस्थान – 06.58 / 07.00
  •  * जबलपूर (Jabalpur): आगमन – 08.45 / प्रस्थान –

​प्रवाशांनी या नवीन वेळेची व बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सावंतवाडीतील ऐतिहासिक कारागृहाची संरक्षक भिंत जमीनदोस्त, कारण काय?

सावंतवाडी:सावंतवाडीतील संस्थानकालीन इतिहासाची साक्ष देणारी ऐतिहासिक कारागृहाची संपूर्ण संरक्षक भिंत आता पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली असून, या जागी आधुनिक पद्धतीने साडेचार कोटी रुपयांच्या खर्चातून नवीन सिमेंटची भिंत उभारण्यात येणार आहे.

​या वास्तूचे सावंतवाडीच्या इतिहासात विशेष महत्त्व असून, पोर्तुगीज सत्तेच्या काळात या ठिकाणी तोफांसाठी लागणारा दारूगोळा साठवला जात असे आणि पुढे ब्रिटिश राजवटीत या वास्तूचे कारागृहात रूपांतर करण्यात आले, ज्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

​काळाच्या ओघात या जुन्या संरक्षक भिंतीची अवस्था खराब झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यावर विटांचे बांधकाम आणि फेन्सिंग बसवण्याचे अतिरिक्त प्रयत्न केले गेले होते, परंतु बांधकाम भिंतीला झेलत न आल्याने मागील काळात कारागृहाच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूचा काही भाग कोसळला होता.

​भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर प्रशासनावर मोठी टीका झाली होती आणि त्यावेळी तो भाग दुरुस्त करून जुन्याच पद्धतीने भिंत उभारण्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र त्यानंतर झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये संपूर्ण संरक्षक भिंतीची सुरक्षा धोक्यात असल्याचे निष्पन्न झाले.

​स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार जुनी भिंत धोकादायक ठरल्यामुळे तिचा केवळ खराब झालेला भाग दुरुस्त करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण भिंत पाडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आता वारसा जपायचा की आधुनिकता यावर नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रेल्वेचा अजब कारभार! मंगलोर एक्सप्रेसचा सावंतवाडी स्थानकावरील थांबाच गायब

 सावंतवाडी: कोकण रेल्वेचे २१ ऑक्टोबरपासून बिगर पावसाळी नियमित वेळापत्रकाचे आरक्षण सुरू झाल्यापासून तीन दिवस झाले तरीही नव्याने थांबा मंजूर झालेल्या मंगलोर  एक्सप्रेसला सावंतवाडी स्थानकावर थांबा दाखवत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गाडीला सावंतवाडी टर्मिनसला अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, २१, २२ आणि आता २३ ऑक्टोबरचेही रेल्वे बुकिंग सुरू झाले असूनही, रेल्वेच्या अधिकृत बुकिंग ॲप किंवा साईटवर या गाडीचा सावंतवाडी थांबा आणि वेळेची माहिती अद्यापही अपडेट करण्यात आलेली नाही.

​टाईमटेबल बदलून आणि नवीन बुकिंग सुरू होऊनही फक्त १२१३३ मँगलोर एक्सप्रेसचा सावंतवाडी टर्मिनसचा थांबा ऑनलाइन प्रणालीत दाखवला जात नसल्यामुळे सावंतवाडीकर प्रवासी दोन महिने अगोदर सुरू होणाऱ्या आरक्षणाच्या सुविधेपासून वंचित राहत आहेत. कोकण रेल्वेच्या या स्पष्ट हलगर्जीपणामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून याचा थेट परिणाम सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या तिकीट विक्रीवर होत आहे.

इतर सर्व गाड्यांचे टाईमटेबल अपडेट झाले असताना फक्त या एकाच गाडीबाबत होत असलेल्या या दिरंगाईमुळे “सावंतवाडीकरांनी नक्की तिकीट बुकिंग कसे करावे?” असा गंभीर प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही तांत्रिक त्रुटी सुधारावी आणि मँगलोर एक्सप्रेसचे बुकिंग सावंतवाडीसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search