Category Archives: कोकण

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जणाऱ्या गणेशभक्तांसाठी अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक खुशखबर आहे.  गणपती उत्सव २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चिपळूण – पनवेल – चिपळूण दरम्यान अजून काही  अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या (मेमू) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत.

गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ चिपळूण – पनवेल – चिपळूण मेमू अनारक्षित विशेष:

गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष ०३/०९/२०२५ (बुधवार) आणि ०४/०९/२०२५ (गुरुवार) रोजी चिपळूणहून सकाळी ११:०५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – चिपळूण मेमू अनारक्षित स्पेशल गाडी ०३/०९/२०२५ (बुधवार) आणि ०४/०९/२०२५ (गुरुवार) रोजी पनवेलहून सायंकाळी ४:४० वाजता सुटेल. गाडी त्याच दिवशी रात्री २१:५५ वाजता चिपळूणला पोहोचेल.

ही गाडी अंजनी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवांखावती, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्टेशनवर थांबेल.

रचना: एकूण ०८ मेमू कोच.

 

Konkan Railway: प्रवाशांना दिलासा! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून आज विशेष गाडीची सोय

   Follow us on        

मुंबई : आगामी गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक विशेष गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. ही गाडी रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री निघणार आहे.

०१२३३ क्रमांकाची ‘लोकमान्य टिळक टर्मिनस–सावंतवाडी रोड गणपती विशेष गाडी’ लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजता (२४ ऑगस्टच्या मध्यरात्री) सुटेल आणि सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:१५ वाजता पोहोचेल.

आरक्षण : २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

थांबे : ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड़, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.

संरचना :

  • १ एसी टू टायर

  • ६ एसी थ्री टायर

  • ९ स्लीपर

  • ९ सामान्य अनारक्षित

  • २ एसएलआर

  • २ जनरेटर

प्रवासी रेल्वे गाड्यांचे तपशील जाणून घेण्यासाठी enquiry.indianrail.gov.in तसेच RailOne, NTES अॅपचा वापर करू शकतात.

Konkan Railway: बाप्पा पावला! गणेशोत्सवात मुंबई-मडगाव वंदेभारत एक्सप्रेस होणार १६ डब्यांची

   Follow us on        

मुंबई, दि. 22 ऑगस्ट 2025 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – माडगाव (MAO) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 22229/22230) मध्ये तात्पुरत्या काळासाठी आठ डब्यांऐवजी सोळा डबे लावले जाणार आहेत.

रेल्वेच्या सूचनेनुसार, सध्या या गाडीत ८ डब्यांचा वंदे भारत रेक आहे. मात्र प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्यासाठी वंदे भारत आता १६ डब्यांच्या रेकसह धावणार आहे. ही वाढीव सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी कोणत्या दिवशी सुविधा?

मुंबईहून (गाडी क्र. 22229) : 25 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 29 ऑगस्ट 2025

माडगावहून (गाडी क्र. 22230) : 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट 2025

प्रवाशांना होणारा फायदा

या बदलामुळे हजारो प्रवाशांना अतिरिक्त आसनांची उपलब्धता होणार आहे. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत प्रवासी तिकिटांची प्रचंड मागणी असते. त्यामुळे प्रवाशांना या तात्पुरत्या वाढीव डब्यांचा मोठा लाभ मिळेल, अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे.

आरक्षणाची सोय

वाढीव डब्यांनुसार आरक्षण व्यवस्थाही तत्काळ अद्ययावत करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. प्रवाशांनी आपली तिकिटे वेळेत आरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

“प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आम्ही तात्पुरती ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आगामी सणासुदीमध्ये प्रवाशांना प्रवासाचा त्रास होऊ नये हीच आमची भूमिका आहे,” असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गणेश भक्तांसाठी टोलमाफी

   Follow us on        

मुंबई, – यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.
या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.

Konkan Railway: दसरा- दिवाळी व छठपूजेसाठी प्रवाशांना दिलासा; वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडीचा कालावधी वाढवला

   Follow us on        

वास्को:प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेने वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-दा-गामा एक्स्प्रेस विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी व छठपूजा उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या गाड्यांचा तपशील:

  • गाडी क्रमांक 07311 वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर एक्स्प्रेस विशेष

    • धावणार : प्रत्येक सोमवार

    • कालावधी : 08.09.2025 ते 22.12.2025 पर्यंत

  • गाडी क्रमांक 07312 मुझफ्फरपूर – वास्को-दा-गामा एक्स्प्रेस विशेष

    • धावणार : प्रत्येक गुरुवार

    • कालावधी : 11.09.2025 ते 25.12.2025 पर्यंत

सुधारित वेळापत्रक (प्रमुख थांबे):

  • गाडी क्र. 07311 (सोमवार)

    • वास्को द गामा : 14:30

    • मडगाव : 16:00 / 16:20

    • थिवी : 17:10 / 17:12

    • सावंतवाडी रोड : 17:42 / 17:44

    • रत्नागिरी : 20:50 / 20:55

    • चिपळून : 22:38 / 22:40

  • गाडी क्र. 07312 (शनिवार)

    • वास्को द गामा : 14:55

    • मडगाव : 12:30 / 12:50

    • थिवी : 10:30 / 10:32

    • सावंतवाडी रोड : 10:00 / 10:02

    • रत्नागिरी : 06:40 / 06:45

    • चिपळून : 03:26 / 03:28

रोहा ते मुझफ्फरपूर दरम्यानच्या थांब्यांच्या वेळेत कोणताही बदल नाही. प्रवाशांनी नवीन वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाची आखणी करावी, असे कोकण रेल्वेने आवाहन केले आहे.

Konkan Railway: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका; या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        



मुंबई, दि. १९ ऑगस्ट २०२५ – मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासावर परिणाम झाला आहे. कोकण रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार अनेक गाड्या उशिराने सुटणार असून काही गाड्यांचे गंतव्यस्थानही बदलण्यात आले आहे.

गाड्यांचे वेळापत्रक बदल

गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस ही गाडी दुपारी ३:१० वाजता सुटण्याऐवजी संध्याकाळी ५:०० वाजता सुटेल.

गाडी क्रमांक २२११३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस ही गाडी दुपारी ४:४५ वाजता सुटण्याऐवजी संध्याकाळी ६:०० वाजता सुटेल.


गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही गाडी मुंबईपर्यंत न येता पनवेल येथेच थांबवली जाणार आहे.


आरंभ स्थानकात बदल

गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आज मुंबईऐवजी पनवेल स्थानकातून सुटणार आहे.


यामुळे प्रवाशांना गैरसोय होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले असून प्रवाशांनी वेळापत्रकातील बदल लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

खुशखबर! पुणे – सिंधुदुर्ग मार्गावर ‘फ्लाय९१’ कडून गणेशोत्सवासाठी विशेष उड्डाणांची घोषणा

   Follow us on    

 

 

पुणे, १८ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन फ्लाय९१ (FLY91) या विमानसेवेने पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाय९१ने विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. २४ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट तसेच ५ व ७ सप्टेंबर २०२५ या दिवशी अतिरिक्त उड्डाणे सुरू राहतील.

या विशेष उड्डाणांची तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

यामुळे पुण्यातील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास आणखी सुलभ व सुखकर होणार आहे.

 

 

गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे. अनेक जण आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करतात. पुणे–सिंधुदुर्ग मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवल्याने प्रवाशांना अधिक सोयी, लवचिकता आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. 

मनोज चाको

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (फ्लाय९१) 

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी प्रवाशांना दिलासा: चिपळूण-पनवेलदरम्यान विशेष मेमू गाड्या धावणार

   Follow us on    

 

 

चिपळूण : गणेशोत्सव २०२५ दरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खास निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण–पनवेल–चिपळूण दरम्यान अतिरिक्त अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

गाड्यांचा तपशील :

गाडी क्रमांक ०११६० चिपळूण–पनवेल मेमू विशेष

दिनांक : ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५

प्रस्थान : चिपळूण येथून सकाळी ११:०५ वाजता

आगमन : पनवेल येथे दुपारी ४:१० वाजता

 

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल–चिपळूण मेमू विशेष

दिनांक : ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५

प्रस्थान : पनवेल येथून संध्याकाळी ४:४० वाजता

आगमन : चिपळूण येथे रात्री ९:५५ वाजता

गाड्यांना अंजनी, खेर्डी, दिवाणखवटी, विंहेरे, करंजडी, वेअर, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, पेण, आपटा अशा महत्वाच्या स्थानकांवर थांबे असतील.

या गाड्यांची रचना ८ मेमू कोचेसची असून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

 

Ganpati Festival 2025: Additional MEMU Specials between Chiplun and Panvel announced

   Follow us on    

 

 

Chiplun: To manage the festive rush of passengers during Ganpati Festival 2025, Central Railway has decided to run additional unreserved MEMU special trains between Chiplun and Panvel.

Train Details as below.

Train No. 01160 Chiplun–Panvel MEMU Special

Dates: 5th, 6th & 7th September 2025

Departure: 11:05 hrs from Chiplun

Arrival: 16:10 hrs at Panvel

 

Train No. 01159 Panvel–Chiplun MEMU Special

Dates: 5th, 6th & 7th September 2025

Departure: 16:40 hrs from Panvel

Arrival: 21:55 hrs at Chiplun

The trains will halt at Anjani, Khed, Diwankhavati, Vinhere, Karanjadi, Veer, Mangaon, Indapur, Kolad, Roha, Nagothane, Pen, Apta and other important stations.

The train will run with 8 MEMU coaches, offering relief to passengers during the festive rush.

For detailed halts & timings, passengers may visit www.enquiry.indianrail.gov.in.

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

   Follow us on    

 

 

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुम्बई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाट मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरड हटवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जेसीबी व यंत्रसामग्रीच्या मदतीने रवी इन्फ्रा कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे अडथळे येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, घाट मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search