Category Archives: कोकण

आता मिशन विधानसभा; राणे बंधूंचा ‘या’ दोन जागांवर दावा, महायुतीत वादाची ठिणगी पडणार?

   Follow us on        
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत कोकणात १००% यश मिळवलेल्या महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तर आमदार नितेश राणे यांनी भर पत्रकार परिषदेत राजापूर मतदार संघावर भाजप पक्षातर्फे दावा केला आहे. 
निलेश राणेंचे रत्नागिरी मतदारसंघाबाबत ट्वीट
निलेश राणे ट्वीटमध्ये लिहितात, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार
मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते उच्चशिक्षण मंत्री होती. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आत्तापर्यंत 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत.
तर लोकसभा निवडणुकीत भाजपला राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात दोन नंबरची मते मिळाली आहेत. फक्त 21 हजार मतांनी भाजपा पिछाडीवर आहे. 2019 च्या तुलनेत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपा ने चांगला लोकाश्रय मिळवला आहे. हे भाजपसाठी सुचिन्ह असुन येत्या विधानसभेला राजापूर विधानसभेवर भाजपाचा दावा असणार असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना निलेश राणे आणि नितेश राणे यांनी असे ठोकल्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

Loading

Lok Sabha Election Result 2024: कोकण महायुतीचेच; मविआचा सुपडा साफ

   Follow us on        
Loksabha Election Result 2024: राज्यात जरी मविआ ला भरघोस यश मिळाले असले तरी कोकणात मात्र महायुतीने १००% जागांवर यश मिळवले आहे. ठाणे, कल्याण, रायगड, पालघर आणि रतनागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.   
ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राज विचारे यांचा पराभव झाला, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी उमेदवार ठरले. पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत.  हेमंत सावरा 184422 मताधिक्याने विजयी ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Gite)  यांचा 82784 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये देखील ठाकरे गटाला अपयश आलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्धात नारायण राणेंचा 47 हजार 858 मतांनी विजय झाला आहे.
ठाणे, कोकणातील विजयी खासदारांची यादी
ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
पालघर – हेमंत विष्णू सवेरा  (भाजप)
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
रत्नागिरी-सिंधुदर्ग – नारायण राणे (भाजप)
रायगडमध्ये अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’ 
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगडमध्ये मिळालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी राज्यात चार जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’ असं म्हणावं लागेल.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी
पालघर लोकसभेवर अखेर महायुतीने आपला झेंडा फडकवला असून महायुती भाजपाचे डॉ. हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं. पालघर लोकसभेवर अखेर पुन्हा एकदा महायुतीने आपलं नाव कोरलं असून भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार मतांनी विजयी झाले असून. या विजयानंतर जिल्ह्यातील प्रश्न आहेत. त्यांना प्राधान्य देण्याचं त्यांनी सांगितलं असून हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले असून त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत यांचा ४७८५८ मतांच्या फरकाने पराभव केला आहे. सावंतवाडी  भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आधी दोनदा खासदार झालेल्या विनायक राऊत यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेनेला असलेली सहानुभूती, जातीय ध्रुवीकरणाची शक्यता, रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. शिवसेनेतील फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. साहजिकच त्यांच्या अनुक्रमे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. त्या दोघांनी राणेंसाठी ताकद लावली..

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाडीला जून अखेरपर्यंत मुदतवाढ

    Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ३० जून २०२४ पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या गाडीची सेवा दिनांक ०६ जून २०२४ ला समाप्त होणार होती. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या गाडीचा जून अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाला त्याचे ‘हिरवे’ वैभव परत मिळणार

इंदापूर ते भोगाव (कशेडी) पाहिल्या टप्प्यातील महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपयांचा निधी वर्ग 

   Follow us on        

Mumbai Goa Highway Updates: जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा मोठी सावली देणारी झाडे होती. नवीन महामार्गाच्या कामासाठी ती झाडे तोडण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूचा भाग उजाड झाला आहे. या भागात या पावसाळ्यापासून झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला काही वर्षानी त्याचे ‘हिरवे’ गतवैभव प्राप्त होणार आहे.

झाडे लावण्यात वन विभागाकडून दिरंगाई?

महामार्ग पूर्ण होत असताना दोन वर्षापूर्वी वन विभागाकडे निधी आला होता. मात्र वनविभागाने तो निधी वापरून झाडे लावण्यात दिरंगाई केली असल्याचा आरोप केला जात आहे. इंदापूर ते भोगाव (कशेडी) पाहिल्या टप्प्यातील महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपये ईतका निधी दोन वर्षापूर्वीच वर्ग करण्यात आला होता. मात्र तेव्हा झाडे लावली गेली नाहीत. महामार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने तसेच आलेला निधी टॅप झाला असल्याने झाडे लावण्यात दिरंगाई झाली असल्याचे कारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. मात्र यावर्षी पावसाळय़ात झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

 

Loading

Revas Reddy Coastal Highway: अजून दोन पुलांच्या बांधकामासाठीच्या निविदा उघडल्या; ‘या’ कंपनीने लावली सर्वात कमी बोली

   Follow us on        
Revas Reddy Coastal Highway Updateds: रेवस-रेड्डी कोस्टल हायवे बद्दल एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड (ABL) या कंपनीलाला शुक्रवारी कोकणातील  जयगड आणि कुंडलिका नद्यांवर दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. अशोका बिल्डकॉन आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) या दोन्ही करारांसाठी आपल्या निविदा सादर केल्या होत्या. 
जयगड खाडी पूल
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नदीवरील तवसल आणि सांडेलवगण यांना जोडणारा 2 लेन असलेला 4.4 किमी लांबीचा जयगड खाडी पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. 
MSRDC चा अंदाज: रु. 625.87 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -794.85
HCC – 826.15
जयगड खाडी पूल
कुंडलिका खाडी पूल
3.8 किमी लांबीचा कुंडलिका पूल 2 लेनसह रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा आणि साळव यांना जोडेल. या पुलाला रेवदंडा खाडी पूल असेही संबोधले जाते.
MSRDC चा अंदाज: रु. 1061.67 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -1357.87
HCC  – 1422.64
कुंडलिका खाडी पूल
अशोका बिल्डकॉन लिमिटेड ची बोली जयगड पुलासाठी 794.85 कोटी आणि रु. कुंडलिका पुलासाठी 1357.87 कोटी हे MSRDC च्या अंदाजापेक्षा 26.99% आणि 27.89% जास्त होते, त्यामुळे वाटाघाटी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती 
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)

Loading

कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ( KRCL ) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता + प्रकल्प अभियंता (निविदा आणि प्रस्ताव), CAD/ड्राफ्ट्समन आणि सहाय्यक अभियंता/कंत्राटी या पदांसाठी उमेदवार भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार दिलेल्या पदांसाठी 11 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना पदांनुसार रु.35400 ते रु.56100 पर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची उच्च वयोमर्यादा ही पदांनुसार ४५ वर्षांपर्यंत आहे

कोकण रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लागू उमेदवारांची निवड समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल . पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहू शकतात.ही नियुक्ती 01-वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणी सर्व संबंधित कागदपत्रे आणि रीतसर भरलेला अर्ज सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

पदांनुसार रिक्त जागा खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

किमान /कमाल वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ईतर सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात वाचा 👇🏻

KRCL-Recruitment-2024.pdf

 

Loading

Mumbai Goa Highway: अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी कशेडी घाटात मजबूत हाईट खांबाची पुन्हा उभारणी

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणार्‍या अवजड वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा मजबूत हाईट खांब उभारले. यामुळे अवजड वाहतुकीच्या खांबांना अखेर ब्रेक लागला आहे.बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती.यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी हाईट खांबाचा अवलंब करण्यात आला. मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसातच उखडले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांबाची उभारणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारपासून प्रत्यक्षात कार्यवाही देखील सुरू केली आहे.



मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास 45 मिनिटांचा कालावधी लागतो आणि त्यात एखादं अवजड वाहनात बिघाड झाल्यास घाटावरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

Loading

चिपळूणसाठी स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडण्यात यावी – जल फॉउंडेशनची रेल्वेकडे मागणी

   Follow us on        
रत्नागिरी, आवाज कोकणचा: चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. तर गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येत नाही. काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. गणेशोत्सवात तर हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. तिकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे. परंतु खेड/चिपळूणचे मुंबईपासूनचे अंतर रत्नागिरी/सावंतवाडीच्या तुलनेत कमी असल्यामुळे व पनवेल किंवा दिव्याला पोहोचणे त्रासदायक असल्यामुळे अति गर्दीचे दिवस वगळता प्रवासी त्या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नसतात.



हेच लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणी जल फाउंडेशनने रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे व कोंकण रेल्वेकडे केली आहे.
मागील काही वर्षांत खेड, माणगाव, रोहा येथे अति गर्दीमुळे प्रवाशांमध्ये झालेले वाद, गाडीवर दगडफेक यांसारखे प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जल फौंडेशच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-श्री. अक्षय म्हापदी
रेल्वे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते 

Loading

Revas Reddy Coastal Highway: कुणकेश्वर व काळबादेवी पुलांसाठी ‘विजय एम मिस्त्री’ ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली

   Follow us on        
Revas Reddy Coastal Highway Updates:विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड (VMCPL) ला शुक्रवारी  रेवस रेड्डी या सागरी महार्गावरील कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग SH-4 (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे) वरील दोन्ही पूल हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या 8 नवीन पुलांच्या मालिकेचा भाग आहेत. 
MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. 15 मे रोजी कुणकेश्वर पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 3 आणि काळबादेवी पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 2 निविदा उघडण्यात आल्या होत्या.
कुणकेश्वर पूल
1.6 किमी कुणकेश्वर पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येणार आहे.  यामध्ये 165 मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह 330 मीटर लांबीचा “आयकॉनिक केबल-स्टेड” पूल हे घटक समाविष्ट आहेत.
MSRDC चा अंदाज: रु. 158.69 कोटी
कंपनी  बोली
Vijay M Mistry 187.53
Ashoka 196.78
T and T Infra तांत्रिकदृष्ट्या अपात्र
“iconic” cable-stayed Kunkeshwar Bridge
काळबादेवी पूल
2 लेन असलेला 1.8 किमी लांबीचा काळबादेवी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवर बांधण्यात येणार आहे.
MSRDC चा अंदाज: रु. 291.64 कोटी
कंपनी  बोली
Vijay M Mistry 353.32
Ashoka 367.47
“Iconic” cable-stayed Kalbadevi Bridge
विजय एम मिस्त्री यांची रु. कुणकेश्वर पुलासाठी 187.53 कोटी आणि रु. काळबादेवी पुलासाठी 353.32 कोटी MSRDC च्या अंदाजापेक्षा 18.18% आणि 21.15% जास्त होत आहे. त्यामुळे MSRDC आणि  बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे. 



या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती 
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)

Loading

दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी देण्याची कोकण रेल्वेची तयारी; पनवेल-कोचुवेली गाडी लवकरच सुरु होणार

कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या नवीन गाड्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी चालविण्याची कोकण रेल्वेची तयारी
   Follow us on        
Railway Updates: कोकण रेल्वेमार्गावर पनवेल – कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने ही गाडी चालवण्याची संमती दिली असल्याची माहिती आहे. मात्र ही सेवा कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही असा खुलासा मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
सध्या नेत्रावती एक्स्प्रेस ही मुंबईहून केरळला जाणारी एकमेव दैनिक गाडी आहे. कोकण रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या गाड्या दैनिक स्वरूपाच्या नसून आठवड्यातून २ दिवस धावणाऱ्या आहेत. मुंबई-कन्याकुमारी डेली ट्रेन जयंती जनता एक्स्प्रेस चे रूपांतर पुणे-कन्याकुमारी  झाल्यामुळे, केरळातील मल्याळीं जनतेने मुंबईसाठीची एक दैनंदिन ट्रेन गमावली आहे.
या स्थितीत मुंबई-केरळ दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेने गेल्या वेळापत्रक समितीच्या बैठकीत केली होती. या बैठकीत दैनिक ट्रेनचे वेळापत्रक काढण्यात अडचणी येत असल्याने दररोजच्या ऐवजी साप्ताहिक सेवेच्या विनंतीवर विचार करण्याचे कोकण रेल्वेने सुचवले होते. त्यानुसार ही गाडी आठवड्यातून एकदाच धावणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबईतील इतर ठिकाणाहून सोडावी, अशी शिफारस दक्षिण रेल्वेने केली आहे. तथापि, मध्य रेल्वेने सांगितले की शहरातील सर्व टर्मिनस जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहेत, त्यामुळे ट्रेन पनवेलहून निघू सोडण्यात येईल.  या निर्णयानंतर आता लवकरच पनवेल – कोचुवेली या नवीन साप्ताहिक गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांची नाराजी.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी वसई- सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी अशा गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन मागण्या केल्या आहेत. मात्र कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने चालत असून या मार्गावर नवीन गाडी चालविणे शक्य नाही हे कारण देऊन या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. मात्र आता दक्षिणेकडील राज्यासाठी नवीन गाडी कशी काय मंजूर केली गेली हा प्रश्न विचारला जात आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search