Category Archives: मुंबई

Barsu Refinery | आंदोलन पुन्हा पेटणार; आंदोलकांचा थेट विधानभवनावर मोर्चा काढण्याचा बेत

Barsu Refinery | बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला होणारे  आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. येत्या  २० जुलैला विधान भवनावर मोर्चा काढण्याची योजना बारसू रिफायनरी विरोधी समितीने आखली आहे . यासंबंधी समितीचे एक महत्वाची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली आहे. या समितीबरोबर राज्यातील आणि देशातील काही संघटना देखील या मोर्चात सामील होणार आहेत. या मोर्चाला १ लाखापेक्षा  जास्त विरोधक एकत्र जमवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 
असा असणार हा मोर्चा
दिनांक २० जुलै रोजी राणीची बाग ते आझाद मैदान या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विधानभवनावर कूच करून सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. 
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरण घातक प्रकल्प म्हणून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा विरोध झुगारून येथे माती परीक्षण करण्यात आले असून सरकारतर्फे आपली मनमानी करताना दिसत आहे, मात्र ‘एकाच जिद्द; रिफायनरी रद्द’ या घोषवाक्याखाली समितीने आंदोलन घडले असून जोपर्यत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी समितीची भूमिका आहे. 

Loading

मुंबई प्रभादेवी येथे ”आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” संपन्न

मुंबई |दि.३०.०५.२०२३ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले होते. या महोत्सवमध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले. या विनामूल्य लघुचित्रपट पाहण्याचा आनंद असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी घेतला. संपूर्ण थिएटर खचाखच भरले होते. महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह देवून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे सर, सुप्रसि्दध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आरयन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे,इ. मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई संतोष रोकडे सरांनी शासकीय योजना तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या उपक्रमांची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी चित्रपट आणि लघुपट ई. विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.

महोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक आरयन देसाई यांनी सर्व मान्यवर व मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत नविन उपक्रम म्हणजेच मराठी चित्रपटांचा गौरव सोहळा “मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा” सुरू करण्याचे जाहीर केले. सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

Loading

आरपीएफची अवैध तिकीट आरक्षणाविरोधात मोठी कारवाई | ७१ तिकीट दलालांवर गुन्हे दाखल; २६ लाख रुपयांची तिकिटे जप्त

मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.

ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

६३ गुन्हे दाखल

दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.

Loading

गुजरातच्या धर्तीवर आता मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा दिसणार ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका

मुंबई| रुग्णवाहिका म्हंटले तर डोळ्यासमोर चित्र राहते ते पांढऱ्या कलरच्या, अंगात धडकी भरवणाऱ्या कर्णकर्कश आवाजाच्या सायरनची गाडी. मात्र आता आता मुंबईमध्ये आणि त्यानंतर राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची सुंदर दिसणारी तसेच रंगीबेरंगी पडदे इत्यादी सुविधा असलेली खिलखिलाट रुग्णवाहिका दिसणार आहे.  गुजरात सरकारच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये माता, नवजात बालके आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेणाऱ्या खिलखिलाट रुग्णवाहिकांची सेवा सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तब्बल ५ खिलखिलाट रुग्णवाहिकांची खरेदी केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमार्फत माता, नवजात बालके आणि त्यांच्या नातेवाईकांना आरामदायी आसन व्यवस्थेसह बाळाची काळजी घेण्याची व्यवस्था, नीटनेटके आणि सुंदर भाग तसेच रंगीबेरंगी पडदे इत्यादी सुविधा असलेल्या खिलखिलाट रुग्णवाहिकांची सेवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दिली जाणार आहे. अशा प्रकारच्या रुग्णवाहिका गुजरातमध्ये असल्याने त्या धर्तीवर या खिलखिलाट रुग्णवाहिकांची सेवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देण्याचे निर्देश उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पाच खिलखिलाट रुग्णवाहिकांची खरेदी करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.  यासाठी महालक्ष्मी २४ फोर्स एलएलपी या कंपनीची निवड करण्यात आली. या निविदेत या कंपनीने रुग्णवाहिका वाहन २४ लाख १२ हजार रुपये तसेच ब्रँडींगच्या कामांसाठी १५ हजार रुपये आणि आतील रचनांची कामे आदींसाठी ३२ हजार रुपये अशाप्रकरे एकूण २४ लाख ६० हजार रुपयांमध्ये एक रुग्णवाहिकेची बोली लावली असून या सर्व रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी  १ कोटी  २३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
केईएम रुग्णालय, शीव रुग्णालय, नायर रुगालय, कुपर रुग्णालय आणि कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल रुग्णालय येथे प्रसूतीनंतर माता, नवजात बालक आणि त्यांच्य नातेवाईकांना ड्रॉप बॅक सुविधा प्रदान करण्यात येतील असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या खिलखिलाट रुग्णवाहिकांची खरेदी केली जात आहे.

Loading

हापूस आंब्याची आवक वाढली; दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. 

वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. 

मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे. 

 

 

Loading

सीएसएमटी स्थानकावर ब्लॉक; कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाडीवर होणार परिणाम…

Konkan Railway News – कोकण रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी स्थानकावर घेण्यात येणार्‍या ब्लॉक मुळे मंगलोर जंक्शन ते सीएसएमटी, मुंबई दरम्यान धावणारी Majn Csmt Exp – 12134 गाडी 23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान सीएसएमटी स्थानकापर्यंत न चालवता ती दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. 

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 तसेच 12 आणि 13 वर रेल्वेच्या माध्यमातून काही आवश्यक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या दोन लाईनवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. त्यामुळे  23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान काही गाड्यांची सेवा दादर स्थानकापर्यंत असणार आहे असे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

Loading

मुंबई ते कोकण प्रवास होणार सुसाट; जवळपास दोन तास वेळ वाचणार…


मुंबई – मुंबई ते कोकण हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकण प्रवास अधिक गतीमान होणार आहे.

ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील प्रकल्प आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा मार्ग जोडतो. त्याचा बहुतांश लाभ मुंबईकरांना होणार असला तरी या मार्गामुळे मुंबई स्थित कोकणवासीयांचा फायदा होणार आहे. 

हा सागरी पूल पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडतो. त्यामुळे मुंबईकरांना कोकणात जाणे सोपे होणार आहे. सध्या मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो, ट्रॅफिक जामची पण मोठी समस्या आहे. 

मात्र या सागरी मार्गामुळे 25 मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकणातील आपल्या गावचा प्रवासातही जवळपास दोन तास वाचणार आहेत.

 

   






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर ११ नवीन लोकल्स; वसई-विरारकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

मुंबई | 03-04-23| मुंबईतील पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासन या मार्गावर 11 नव्या 12 डब्यांच्या नॉन एसी गाड्या चालविणार आहे. त्या नवीन गाड्यांमुळे या मार्गावर चालविण्यात येणार्‍या गाड्यांची संख्या 1383 वरुन 1394 एवढी होणार आहे.

या गाड्या दिनांक 5 एप्रिल पासून चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या नवीन गाड्या चालविताना काही वेगळे प्रयोग पण करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर बोरिवली आणि वांद्रे ही स्थानकांवर गाड्यांना थांबे दिले जाणार नाही. बोरिवली च्या पुढे दहिसर, भायंदर, वसई आणि विरार असे मोजकीच स्थानके घेणार असल्याने विरार – वसई करांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. 

Loading

नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या जीवन कार्यावर प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मुंबई – नटवर्य प्रभाकर पणशीकर जयंती निमित्त गुरूवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ,मिनी थिएटर, ३ रा मजला, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात मंदार व्यास (गायक),, श्रेयस व्यास (गायक) आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांच्या कडून झाले.

हेही वाचा- नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी अनोखे ‘पत्र लिहा’ आंदोलन

कार्यक्रमाचे अध्यक्ष व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे प्रकल्प संचालक श्री.संतोष रोकडे साहेब,नटवर्य प्रभाकर पणशीकरांची ज्येष्ठ कन्या सौ. जान्हवी पणशीकर सिंह, लेखक दिग्दर्शक महेंद्र पाटील, आय. बी. एन. लोकमत चे वैभव राणे आदी मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यात आले.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन पु. ल. देशपांडे कला अकादमी चे प्रकल्प संचालक श्री. संतोष रोकडे साहेब यांनी स्वागत केले. सौ जान्हवी पणशीकर सिंह यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. संतोष रोकडे साहेबांनी मार्गदर्शनपर भाषण केले. या कार्यक्रमात मंदार व्यास (गायक),, श्रेयस व्यास (गायक) यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नाटकातील नाट्यसंगीत व शास्त्रीय गायन सादर केले.गौरी कुलकर्णी राणे (तानपुरा), निनाद कुणकवळेकर (तबला), अथर्व चांदोरकर (हार्मोनियम ) यांनी त्यांना साथसंगत केली.तसेच प्रशांत तांबे, लेखक , दिग्दर्शक ज्ञानेश्वर शिंदे, आकाश उबाळे,कवियीत्री दया चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यांना पुषपगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले. अमेय रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले

Loading

अजून एक महत्वाचे कार्यालय मुंबईतून दिल्लीत जाणार; मुंबईचे महत्व कमी केले जात आहे…

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मोठे उद्योग इतर राज्यात जात असताना, मुंबईतून पण काही महत्वाची सरकारी प्रधान कार्यालये  बाहेरच्या राज्यात हलविण्याचे प्रकार चालू आहेत. आता तर केंद्र सरकारने १९४३ पासून मुंबईत असणारे टेक्स्टाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. यापूर्वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या अहमदाबादला हलवण्यात आले होते. हाच धागा पकडत मोदी सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला आहे. 

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या सगळ्या प्रकाराबाबत ट्विट केले आहे. यामध्ये सावंत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग, प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. महाराष्ट्राला मागे सारणे हा १२ कोटी मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहेच पण देशासाठीही घातक आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search