Category Archives: मुंबई

अजून एक महत्वाचे कार्यालय मुंबईतून दिल्लीत जाणार; मुंबईचे महत्व कमी केले जात आहे…

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मोठे उद्योग इतर राज्यात जात असताना, मुंबईतून पण काही महत्वाची सरकारी प्रधान कार्यालये  बाहेरच्या राज्यात हलविण्याचे प्रकार चालू आहेत. आता तर केंद्र सरकारने १९४३ पासून मुंबईत असणारे टेक्स्टाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. यापूर्वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या अहमदाबादला हलवण्यात आले होते. हाच धागा पकडत मोदी सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला आहे. 

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या सगळ्या प्रकाराबाबत ट्विट केले आहे. यामध्ये सावंत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग, प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. महाराष्ट्राला मागे सारणे हा १२ कोटी मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहेच पण देशासाठीही घातक आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

ब्रेकिंग – मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेच्या जागी गुजराथी; मराठी भाषा मुंबईतून हद्दपार होते आहे?

PC – FB
मुंबई | वरील फोटो गुजराथ मधील नसून मुंबई मधील एका रेल्वे स्थानकाच्या लिफ्ट मधील आहे . एकीकडे मुंबईमध्ये मराठी टक्का कमी होत असताना आता इथे मराठी भाषा पण हद्दपार करण्याचे  असे धक्कायदायक प्रकार घडताना दिसत आहेत. कांदिवली रेल्वे स्थानकाच्या एका लिफ्ट मध्ये सूचना पाटीवर मराठी भाषेच्या जागी चक्क गुजराथी भाषा वापरली गेली आहे. 
ही सूचना अनुक्रमे गुजराथी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये छापून चिटकवली गेली आहे. या सूचनेमध्ये मराठी भाषेला अजिबात स्थान देण्यात आले नाही. कांदिवली स्थानकाच्या बोरिवली दिशेने असणाऱ्या लिफ्ट मध्ये ही सूचना लावण्यात आली आहे. 
मुंबईकरांच्या बोलण्यातून तडीपार होणारी मराठी भाषा आता सरकारी सूचना, माहितीपत्रके आणि इतर माध्यमातून तडीपार होताना दिसणे हे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला धक्कादायक असे आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली; डझन चे दरही आवाक्यात…..

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११०४३ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले आहे. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली आहे. सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली आहे. मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

ब्रेकिंग – लोकल ट्रेनचे 3 डब्बे रुळावरून घसरले;बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प

नवी मुंबई |बेलापूरहून खारकोपर स्टेशनला जाणाऱ्या लोकल ट्रेनचे 3 डब्बे खारकोपर स्टेशनमध्ये प्रवेश करताना रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा नाही. रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचल्या असून गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

फक्त बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक बंद आहे. हार्बर , मेन लाईन आणि इतर मार्गांवरील वाहतूक सुरुळीत चालू आहे

 

मुंबई लोकल ट्रेन – आजपासून ‘हा’ महत्वाचा बदल.

मुंबई :मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा व महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज, २० फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. कामाला जाताना आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून हा नवा बदल नेमका काय आहे हे आधीच सविस्तर जाणून घेऊयात.

प्राप्त माहितीन्वये, जलद मार्गावरील रेल्वे अप व डाऊन दिशेने ज्या १२ डब्यांची रेल्वे गाडी पहिल्या प्लॅटफाॅर्मवर जिथे थांबत होती ती आता १५ डब्यांची रेल्वे जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बदल लागू असतील.

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या स्थानकात हे नवे बदल अंमलात आणण्यात आले आहेत. या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. अद्यापही या मार्गावर काही ठराविकच गाड्या १५ डब्याच्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजेच कर्जत- कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

पत्रकाराने वाचवलेत आजीचे प्राण!

नवी मुंबई | प्रतिनिधी :  खारघर स्टेशन,सकाळचे ११ वाजले होते. स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल आली आणि काही सेकंदात प्लॅटफाॅर्मवरून ती लोकल निघाली, तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. समोर एक ६५-७० वर्षांची प्रवासी लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्यामध्ये अडकून घासत जात होती. तिचा एक पाय लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला होता आणि एक पाय लोकलमध्ये होता. लोकल वेगाने पुढे जात होती.
प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आजीला वाचावण्यासाठी धावले. त्यात सर्वात पुढे होता विलास बडे नावाचा एक तरुण. त्याने धावत जाऊन आजीला पकडले. सुदैवाने त्या आजीने हॅंडलचा हात सोडला आणि ते दोघे  प्लॅटफाॅर्मवर कोसळले. जेमतेम पाच सेकंदात हे सगळं घडलं. घडलेल्या प्रसंगाने आज्जी प्रचंड भेदरली होती पण सुखरूप आहे.
विलास बडे IBN लोकमत मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या धाडसामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. घडलेल्या प्रसंगाने आजी प्रचंड भेदरल्या होत्या पण सुखरूप आहे.
Watch This Video 

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी…. पीक अवरलाच मेट्रो बंद

Mumbai Metro News:संध्याकाळी ऑफिस ते घर असा मेट्रो रेल्वेने प्रवाशांची उद्या मोठी गैरसोय होणार आहे. कारण उद्या संध्याकाळी 5:45 ते 7:30 दरम्यान मेट्रो सेवा बंद रहाणार आहे. काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचं मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही मेट्रोकडून करण्यात आलं आहे.

नेमक्या ऑफिसेस सुटण्याच्या वेळात मेट्रो बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

 

पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ लोकल्स उद्यापासून १५ डब्यांसह धावणार..


Mumbai News :पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १२ लोकल्सचा  १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक लोकलमध्ये २५ टक्के अतिरिक्त आसनक्षमता वाढणार आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवार ११ जानेवारी २०२३ पासून या गाड्या १५ डब्यांसहित धावणार आहेत. जलद मार्गावर ६ लोकल्स आणि धीम्या मार्गावर ६ लोकल्स मध्ये हा बदल करण्यात आला आहे.
सध्या ह्या मार्गावर १५ डब्यांच्या १३२ लोकल फेऱ्या होत्या त्याची संख्या १४४  होणार आहे.  असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.१५ डब्यांचा विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एसी लोकलने प्रवास करता यावा ह्यासाठी वापरला जात आहे चक्क बनावट पास

Mumbai Local News:एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी प्रवासी चक्क बनावट Fake पास वापरत असल्याचे प्रकार उघडकीस यायला लागले आहेत. चर्चगेट ते विरार ह्या मार्गावर  दोन दिवसांपूर्वी तिकीट तपासणीसांच्या एका गस्त पथकाने अशाच एका बनावट पास धारकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीवर फसवणूकी संबधित कलमे लावून अटक केली आहे.
चौकशीत त्याने तो पास विरारला एका मोबाईल रीचार्ज शॉप मधून 600 रुपयांना विकत घेतला होता असे कबूल केले आहे. विरार ते चर्चगेट एसी  प्रवासभाडे वर वर पाहता हा पास खरा वाटत असला तरी काही बारकाईने निरीक्षण केल्यास फरक लक्षात येतो. तिकीट तपासणीसाने जेव्हा ह्या बनावट पासधारकास पास दाखविण्यास सांगितले तेव्हा एका प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेला तो पास दाखवला. थोडीसी शंका आल्याने तपासणीसाने तो प्लास्टिक कव्हर मधून बाहेर काढला आणि साधारण एका मिनिटच्या बारीक निरीक्षणाने तो पास बनावट असल्याचे त्याचा लक्षात आले.
विरार ते चर्चगेट एसी लोकल चे प्रवासभाडे महिना 2005 एवढे आहे तर हा बनावट पास 600 रुपयामंध्ये बनवून भेटत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search