आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो वारकरी येतात. ह्या वारकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आज समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात येणार्या भाविकांच्या गाड्यांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणार्या भाविकांना जशी टोल मुक्ती भेटते तशीच सुविधा आता पंढरपुरात वारीला येणार्या वारकर्यांना मिळणार आहे. आषाढी वारीसाठी राज्यातूनच नाही तर पूर्ण देशातून भाविक येतात. या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी जसे भाविक गाडी नंबर आणि नावनोंदणी करून स्टिकर घेतात तसेच वारकर्यांना घ्यावा लागणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
Facebook Comments Box