ग्रामपंचायत निवडणुक – रत्नागिरी जिल्हय़ात तीन दिवस मद्यविक्री बंद

   Follow us on        

Grampanchayat Election News : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील दारूविक्री दिवसभर बंद राहणार अशी सुचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. त्यांच्या आदेशानुसार मद्यविक्री दि. १७, १८, २० डिसेंबरला संपूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.

हेही वाचा : राज्यात तलाठी भरती होणार.. जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या …

जिल्हय़ात एकूण 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी देशी, विदेशी मद्य, माडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होणार आहेत अशा ग्रामपंचायत क्षेत्रांना मात्र हा आदेश लागु होणार नाही आहे. ह्या आदेशाची अवमानता केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४, ५६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search