रत्नागिरी | चिपळूण येथे यांचा यंत्र वाशिष्टी नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशन ची सामग्री दाखल झाली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा ची जबाबदारी नाम फाउंडेशनने स्वीकारली आहे. शासनाने गाळ उपसण्यासाठी लागणारा इंधन पुरवठ्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार सध्या दोन पोकलेन दाखल झाले आहेत .वाशिष्टीने देखील गाळ उपशासाठी गतवर्षी एकूण तीन टप्पे करण्यात आले होते त्यानुसार काही प्रमाणात गाळ काढला गेला अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे शिल्लक असल्याचे बचाव समितीचे म्हणणे आहे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम अतिशय संत गतीने होत असल्याचे निदर्शनास येतात चिपळूण बचाव समिती पुन्हा आक्रमक झाली होती
२२ जुलै २०२१ रोजी चिपळूणात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले.प्रत्येक क्षेत्राला या पुराचा जबरदस्त असा फटका बसला.या महापुराची कारणमीमांसा झाली तेव्हा धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेले भरमसाठ पाणी तसेच चिपळूणमधील वाशिष्ठी व शिव या दोन नद्यामध्ये साठलेला भयंकर गाळ अशी दोन प्रमुख कारणे समोर आली.त्यासाठी चिपळूण बचाव समितीने पुढाकार घेत प्रथम नद्यांमधील गाळ काढण्याची मागणी शासनाकडे केली.प्रथम दुर्लक्ष झाल्याने बचाव समितीने थेट उपोषणाचे हत्यार उपसले आणि त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे.