रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये समाविष्ट

   Follow us on        
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावे?
या ३११ गावांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा, खेड तालुक्यातील ८५ गावांचा, राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा, संगमेश्वर तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search