मुंबई: मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे १ जानेवारी २०२६ पासून घेतलेला पायाभूत सुविधांच्या कामाचा ‘ब्लॉक’ आता नियोजित वेळेनुसार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी हा ब्लॉक संपल्यामुळे, या काळात विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.
या बदलामुळे कोकण रेल्वे आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, खालील गाड्या आता त्यांच्या मूळ वेळापत्रकानुसार आणि मूळ स्थानकापर्यंत धावतील:
१. आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील: (३१ जानेवारी २०२६ पासून):
आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील
गाडी क्र. १६३४६: तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस)
गाडी क्र. १२६२०: मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस)
२. एल.टी.टी. वरून सुटणाऱ्या गाड्या:
३१ जानेवारी २०२६ पासून: गाडी क्र. १२६१९ (लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस) आता मूळ वेळापत्रकानुसार एल.टी.टी. वरून सुटेल.
१ फेब्रुवारी २०२६ पासून: गाडी क्र. १६३४५ (लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस) आपल्या नियमित वेळेनुसार एल.टी.टी. वरून मार्गस्थ होईल.
महिनाभर चाललेल्या या ब्लॉकचा फटका केवळ मुंबईकरांनाच नाही, तर कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला होता.


