Author Archives: Kokanai Digital

Special Trains: मुंबई – गुजरात दरम्यान धावणार अतिजलद तेजस विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .

ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,

ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.

ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल – गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.

कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठे भगदाड; वाहतुकीस धोका निर्माण

   Follow us on        
Mumbai Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुड़व टेंब येथे एक भला मोठा भगदाड, असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गांवर प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहुन आपला प्रवास करावा.
निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

Metro Line14: मुंबई मेट्रोचा अंबरनाथ-बदलापूर पर्यंत विस्तार होणार; असा असेल मार्ग

   Follow us on        
Metro Line14: अंबरनाथ -बदलापूर लोकल प्रवाशांसाठी  एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
एमएमआरडीएने कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गाच्या कामासाठी पाऊल टाकले आहे. या मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. पीपीपी म्हणजेच सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहेत.
कसा असेल कांजूरमार्ग – बदलापूर मार्ग?
  • मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
  • हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
  • कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
  • मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
  • हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
  • घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
  • या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
  • कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
  • हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाटी एमएमआरडीएन यापूर्वीच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.

२४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वादशी – 19:23:09 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 13:49:19 पर्यंत
  • करण-कौलव – 09:00:56 पर्यंत, तैतुल – 19:23:09 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-आयुष्मान – 14:59:51 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:07
  • चन्द्र राशि-मीन – 13:49:19 पर्यंत
  • चंद्रोदय-28:03:59
  • चंद्रास्त-16:17:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • शांतता आणि नि:शस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन
  • राष्ट्रीय बंधू दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1626 : पीटर मिनुएटने स्थानिकांकडून मॅनहॅटन बेट $24 मध्ये विकत घेतले.
  • 1830 : युनायटेड स्टेट्समधील पहिली प्रवासी रोड रेल्वे सेवा सुरू झाली.
  • 1844 : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी त्यांनी विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
  • 1883 : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
  • 1923 : आयरिश गृहयुद्ध संपले.
  • 1940 : इगोर सिकोरसकी यांनी सिंगल-रोटर हेलिकॉप्टर यशस्वीपणे उडवले.
  • 1976 : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू केली.
  • 1991 : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1993 : मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
  • 1994 : 26 फेब्रुवारी 1993 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या चार दहशतवाद्यांना प्रत्येकी 240 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • 2000 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेला Insat-3B हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
  • 2001 : 18 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
  • 2004 : उत्तर कोरियाने आपल्या देशात मोबाईल फोनवर बंदी घातली.
  • 2010 : सात सिलिकॉन रेणूंच्या आकाराचे जगातील सर्वात लहान ट्रान्झिस्टर बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1686 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1736)
  • 1819 : ‘व्हिक्टोरिया’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1901)
  • 1924 : ‘रघुवीर भोपळे’ ऊर्फ जादूगार रघुवीर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1984)
  • 1933 : ‘हेमचंद्र तुकाराम’ तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1999)
  • 1942 : ‘माधव गाडगीळ’ – पर्यावरणतज्ञ यांचा जन्म.
  • 1955 : ‘राजेश रोशन’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1973 : ‘शिरीष कुंदर’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1543 : ‘निकोलस कोपर्निकस’ – पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1473)
  • 1950 : ‘आर्चिबाल्ड वावेल’ – भारताचे 43वे गर्वनर जनरल यांचे निधन. (जन्म: 5 मे 1883)
  • 1984 : ‘विन्स मॅकमोहन सीनिय’ – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1914)
  • 1990 : ‘के. ऎस. हेगडे’ – लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचा मृत्यू.
  • 1993 : ‘बुलो चंदीराम रामचंदानी’ ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक यांचे निधन. (जन्म: 6 मे 1920 – हैदराबाद)
  • 1995 : ‘हॅरॉल्ड विल्सन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 11 मार्च 1916)
  • 1999 : ‘विजयपाल लालाराम’ तथा गुरू हनुमान – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1901)
  • 2000 : ‘मजरुह सुलतानपुरी’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

फक्त १९९१ रुपयामंध्ये विमान प्रवास! फ्लाय-९१ कंपनीची गोवा, हैद्राबाद, बेंगळुरु आणि सिंधुदुर्ग प्रवासासाठी खास ऑफर

   Follow us on        
Fly-91 Offer: मूळची गोव्याची असणाऱ्या Fly91 या विमान कंपनीने सोमवारी चार शहरांतून उड्डाणासह व्यावसायिक ऑपरेशन्सला सुरूवात केली आहे. कंपनीने गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू केली आहेत. Fly91 एप्रिलमध्ये आगती, जळगाव आणि पुणे येथे उड्डाणे सुरू करणार आहे. यावेळी कंपनीने 1,991 रुपये विमान भाडे या विशेष ऑफर देखील लॉन्च केली आहे
Fly91 एअरलाइनच्या विमानाने गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 7.55 वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेतले. एअरलाइनने बेंगळुरू ते सिंधुदुर्ग हे पहिले उड्डाणही चालवले आहे. गोवा आणि बेंगळुरू दरम्यान सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाणे कार्यरत करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीचे व्यावसायिक उड्डाण सुरू करणे एअरलाइनच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कंपनीने लॉन्च केलेली 1,991 रुपये विमान भाड्याची विशेष ऑफर सर्व ठिकाणांसाठी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विमान कंपनी सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी गोवा आणि बेंगळुरू दरम्यान उड्डाणे चालवेल. त्याचप्रमाणे, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान दर आठवड्याला समान संख्येने उड्डाणे चालविली जातील. याशिवाय गोवा ते हैदराबाद आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून दोनदा विमानसेवा चालणार आहे, असे चाको म्हणाले.
लक्षद्वीप आणि गोवा सारख्या लोकप्रिय स्थळांशी प्रवाशांना जोडणे हा Fly91 चा उद्देश आहे. भारतातील टियर आणि शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे, असे चाको म्हणाले.

महत्वाचे: आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षांच्या संपर्क क्रमांकाची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबईदि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबईजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षमहानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई

आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143,

दूरध्वनी: 022- 220227990022- 22794229022- 22023039,

आपत्कालीन संपर्क – 1070

ई-मेल [email protected]

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-

  • मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२,
  • मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४,
  • ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७,
  • पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०,
  • रायगड – ०२१४१-२२२०९७,
  • रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८,
  • सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७,
  • नाशिक – ०२५३-२३१७१५१,
  • अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४,
  • धुळे- ०२५६२-२८८०६६,
  • नंदुरबार – ०२५६४-२१०००६, 
  • जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०, 
  • पुणे – ०२०-२६१२३३७१, 
  • सोलापूर – ०२१७-२७३१०१२,
  • कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४, 
  • सांगली – ०२३३-२६००५००,
  • सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५,
  • छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७,
  • धाराशिव- ०२४७२-२२७३०१, 
  • हिंगोली – ०२४५६-२२२५६०, 
  • परभणी – ०२४५२-२२६४००,
  • बीड- ०२४४२-२९९२९९,
  • नांदेड – ०२४६२-२३५०७७, 
  • जालना- ०२४८२-२२३१३२,
  • लातूर- ०२३८२-२२०२०४,
  • अमरावती- ०७२१-२६६२०२५,
  • यवतमाळ – ०७२३२-२४०७२०, 
  • वाशिम- ०७२५२-२३४२३८, 
  • अकोला- ०७२४-२४२४४४४,
  • बुलढाणा- ०७२६२-२४२६८३, 
  • नागपूर – ०७१२-२५६२६६८,
  • वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०,
  • चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७,
  • गोंदिया – ०७१८२- २३०१९६, 
  • भंडारा- ०७१८४- २५१२२२,
  • गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५

 

महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक

  • बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७२२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९,
  • ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५, 
  • नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१,
  • भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८,
  • कल्याण – ०२५१-२२११३७३,
  • मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२,
  • उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३,
  • वसई-विरार – ०२५०-२३३४५४७,
  • पनवेल – ०२२-२७४५८०४०,
  • नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५,
  • मालेगाव – ०२५५४- २३४५६७,
  • अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०,
  •  धुळे- ०२५६२-२८८३२०,
  • जळगाव – ०२५७-२२३७६६६,
  • पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३,
  • पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११,
  • सोलापूर – ०२१७-२७४०३३५,
  • कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१,
  • सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१,
  • छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४,
  • परभणी – ०२४५२-२२३१०१,
  • नांदेड- ०२४६२-२३४४६१,
  • लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५,
  • अमरावती – ०७२१-२५७६४२६,
  • अकोला – ०७२४-२४३४४६०,
  • नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००,
  • चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७,  ०७१७२-२५९४०६/२५४६१४

 

रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी

  • कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९
  • पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९
  • मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०

२३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि – एकादशी – 22:32:49 पर्यंत
  • नक्षत्र – उत्तराभाद्रपद – 16:03:29 पर्यंत
  • करण – भाव – 11:57:55 पर्यंत, बालव – 22:32:49 पर्यंत
  • पक्ष – कृष्ण
  • योग – प्रीति – 18:36:05 पर्यंत
  • वार – शुक्रवार
  • सूर्योदय – 06:04
  • सूर्यास्त – 19:07
  • चन्द्र राशि – मीन
  • चंद्रोदय – 27:21:00
  • चंद्रास्त – 15:15:00
  • ऋतु – ग्रीष्म

जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
  • १५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
  • १८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
  • १८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
  • १९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
  • १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
  • १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
  • १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
  • १९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
  • १९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
  • १९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
  • १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
  • २००८: भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • २०१६: भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
  • १७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
  • १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
  • १८९६: जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म.
  • १९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
  • १९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
  • १९२२: प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.
  • १९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
  • १९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
  • १९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
  • १९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
  • १९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
  • १९४८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.
  • १९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
  • १९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५७: ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
  • १९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)
  • १९३०: प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.
  • १९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)
  • १९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
  • १९७५: भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.
  • १९३४: क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
  • २०१०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कानू सन्याल यांचे निधन.
  • २०१०: राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन.
  • २०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
  • २०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

मुंबई ते तळकोकण प्रवास फक्त ५ तासांत; यंदा गणपतीत कोकणात जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार

   Follow us on        
मुंबई: यंदा गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. आता मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.
जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने चाकरमानी कमी वेळेत कोकणात पोहोचणार आहेत. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणात प्रवास करणार आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे चाकरमान्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
चाकरमान्यांचा त्रास कमी होणार
गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवासाचा त्रास चाकरमान्यांसाठी नेहमीचाच झाला आहे. या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे.
जलवाहतूक सेवेसाठी एम टू एम बोट वापरली जाणार आहे. येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील, असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.

Amboli: सिंधुदुर्ग-चौकुळ येथील पाणवठ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        
आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावात एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. या गावातील जांभळ्याचे कोंड नदीतील एका पाणवठ्यात हा वाघ खडकावर बसून पाणी पिताना आढळून आला. याचे फोटो आणि व्हिडिओ स्थानिक युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
आंबोली वनविभागाशी या घटनेबाबत  संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व मान्य केले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो याच वाघाचे आहेत की नाही? याबाबत निश्चितपणे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनखात्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्टयात एकूण आठ पट्टेरी वाघ आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर वाघांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृत नोंद वनविभागाच्या दप्तरी झाली आहे. वनविभागाने यापूर्वीच वाघांचे अस्तित्व मान्य केले होते आणि त्यानंतर बऱ्याचदा आंबोली-चौकुळ भागात वाघ दिसून आला होता. काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता.
वनविभागाच्या नोंदीनुसार आंबोली ते मांगेली हा वाघांचा प्रमुख भ्रमणमार्ग आहे. काही दिवसांपूर्वी दाभिळमधील जंगल भागातील विहिरीत मृत पट्टेरी वाघीण आढळून आली होती. जी वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली होती. आणि आता पुन्हा चौकुळ येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने या पट्टयातील वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Yetav App: आता ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणे घरबसल्या रिक्षा आणि कार बुकिंग करता येणे शक्य; ‘येतंव अ‍ॅप’ कसे वापरावे?

   Follow us on        
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रिक्षा प्रवाशांना महानगरातील ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणेच प्रवासासाठी घरबसल्या रिक्षा बुकिंग करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने ‘येतंव’ हे प्रवासी रिक्षा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘येतंव’ अ‍ॅप रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोफत आहे.सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा.लि.यांच्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित केले आहे. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे रविवारी लोकार्पण झाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वळंजू, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झॅपअ‍ॅप सोल्यूशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी उपस्थित होते.
ऱिक्षा चालकांनी असे वापरावे अ‍ॅप
रिक्षाचालकांनी या अ‍ॅपवर प्रथम लोकेशन टाकावे. यामुळे प्रवाशांना सर्च केल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अ‍ॅपद्वारे प्रवाशी रिक्षा कोठेही बोलवू शकतात. रेल्वे स्थानकावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे.
5300 जणांनी डाऊनलोड केले अ‍ॅप
गेल्या सव्वा महिन्यात 5300 जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून 220 रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. पैकी रिक्षाचालकांना या अ‍ॅपवर 1914 कॉल आले आहेत.
‘येतंव’ कसे वापरावे
प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना जवळच्या दोन कि.मी. परिसरातील रिक्षा किंवा चारचाकी गाडी हवी असल्यास त्याची उपलब्धता व संपर्क क्रमांक मिळू शकेल. यामध्ये भाडे ठरवण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच असून प्रवासी व रिक्षाचालक परस्पर संवादाद्वारे किंवा व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून भाडे निश्चित करू शकतात. त्यात अ‍ॅप कोणताही हस्तक्षेप करणार नाही. स्मार्ट फोन नसलेल्या रिक्षाचालक कोणत्याही फोनवरून महासंघाने दिलेल्या 9082408882 क्रमांकावर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.
हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search