Category Archives: कोकण

राज्यात थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 

श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

 

Loading

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान.

मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. हे विधान त्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

कोश्यारींचं विधान

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

 

ह्याआधी पण त्यांनी महाराष्ट्रविरोधी काही वादग्रस्त विधाने केली होती. पण त्यावर सर्व स्तरातून विरोध झाल्याने त्यांनी माफी मागितली होती. राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तिने अशी वादग्रस्त आणि समाजात तणाव निर्माण होण्यास कारणीभूत होणारी विधाने करणे खूपच चुकीचे ह्या पदाच्या प्रतिमेला काळिमा फासण्यासारखे आहे. 

Loading

कोकण रेल्वेच्या अजून काही गाड्या विद्युत इंजिनसह धावणार

Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर (AC Traction) चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार आता अजून काही गाड्या विद्युत इंजिनसह धावणार आहेत.

खालील गाड्या आता विद्युत इंजिनसह धावणार आहेत.

Sno. Train no. Journey Commences from
1 20924 Gandhidham – Tirunelveli Weekly Express 21/11/2022 (Monday)
2 20923 Tirunelveli -Gandhidham Weekly Express 24/11/2022  (Thursday)
3 22908 Hapa – Madgaon Jn. Weekly Express 23/11/2022  (Wednesday)
4 22907 Madgaon Jn. – Hapa Weekly Express 25/11/2022  (Friday)

 

ह्या आधी काही गाड्यांमध्ये हा बदल करण्यात आलेला होता. कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे विद्युतीकरण पूर्णकोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी टप्या टप्प्याने सज्ज होताना दिसत आहेत.

Loading

कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायपालट

Konkan Railway News :रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा, तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी दिले. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्री चव्हाण यांच्या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असून लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.

कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणा-या रस्त्यांचे मजबूतीकरण, नुतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले

Loading

KR UPDATES:कोचुवेळी यार्ड कामा निमित्त कोकण रेल्वेच्या ‘ह्या’ गाड्या रद्द

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील कोचुवेळी येथे यार्ड च्या कामा निमित्त कोकण रेल्वे मार्गावर चालणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हे काम दिनांक ०८ डिसेंबर ते १२ डिसेंबर ह्या दरम्यान होणार आहे.

खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

गाडी क्रमांक १२२०२ दि ०८ डिसेंबर व ११ डिसेंम्बर
गाडी क्रमांक १२२०१ दि ०९ डिसेंबर व १२ डिसेंबर

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Related दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक

Loading

‘जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती’ची येत्या रविवारी सभा.

Mumbai-Goa Highway News :मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 12 वर्षापासुन रखडले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाची अवस्था खूप खराब झाली असल्याने अपघातांची संख्या पण वाढताना दिसत आहे. या प्रश्‍नांवर चर्चा करून पुढील नियोजनाची रूपरेषा आखण्यासाठी जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समितीने येत्या रविवारी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 ते 8.30 ह्या वेळेत सभेचे आयोजन केले आहे.

Read Also : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची “कहाणी अधुरीच”… काम पुन्हा ठप्प

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, शारदाटॉकीज च्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व येथे ही सभा होणार आहे. मूळच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

8369892105 कैलास

9029410321 अनिल 

8652505542 रुपेश 

8082460913 तृषांत

 

 

Loading

KR UPDATES – 16/11/22 -कोकण रेल्वेमागार्वर ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार

Konkan Railway News: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही काही गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या  Three Tier AC श्रेणीचे 2 अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे.
12133 Mumbai CSMT – Mangaluru Jn. Express
दिनांक  : 16/11/2022 & 18/11/2022
12134 Mangaluru Jn. – Mumbai CSMT Express
दिनांक  : 17/11/2022 & 19/11/2022
या दोन्ही गाड्यांचे थांबे
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, पनवेल जंक्शन, रत्नागिरी, कणकवली, करमळी, मडगांव जंक्शन, कारवार, कुमटा, भटकळ, बैन्दूर मूकांबिका रोड, कुंडापुरा, उडुपी, सुरथकल, मंगलूरु जंक्शन

Loading

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद?

Mumbai Goa Highway : परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.या घाटात गेल्या वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान घाट केव्हापासून बंद ठेवायचा ते अद्याप निश्चित झालेले नाही.

याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र तसे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे. घाटातील वाहतूक बंद ठेवून चिरणीमार्गे वाहतूक वळवण्याचे ठरले आहे

Loading

कर्नाक बंदर पूल तोडण्यासाठी पॉवरब्लॉक – कोकणरेल्वेच्या गाड्यांवर परिणाम.

मुंबईः शहरातील पी डिमेलो मार्गावरून मनीष मार्केट, झवेरी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, महापालिका मुख्यालय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणारा कर्नाक बंदर पूल पुर्नबांधणी साठी तोडण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल रेल्वे तर्फे १९/११/२०२२ आणि २०/११/२०२२ रोजी एक पॉवर ब्लॉक घेणार आहे. ह्या दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ह्या स्टेशन वरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाडयांचा प्रवास त्याच्या अगोदरच्या स्टेशन पर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे. ह्या कामामुळे कोकण मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या खालील गाड्यांचा आरंभ किंवा शेवटच्या स्थानकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
खालील गाड्यांचे आरंभ आणि शेवटचे स्थानक दादर असेल.
Train No. Date
1. Train no. 12052 Madgaon Jn. – Mumbai CSMT Janshatabdi Express 19/11/2022 (Saturday) & 20/11/2022 (Sunday)
2. Train no. 22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 19/11/2022 (Saturday) & 20/11/2022 (Sunday)
3. Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express 20/11/2022 (Sunday)
4. Train no. 22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 20/11/2022 (Sunday)

खालील गाड्यांचे आरंभ आणि शेवटचे स्थानक पनवेल असेल.

Train No. Date
1. Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Express  19/11/2022 (Saturday) 
2. Train no. 10112 Madgaon Jn. – Mumbai CSMT Konkankanya Express  19/11/2022 (Saturday) 
3. Train no. 12134 Mangaluru Jn. – Mumbai CSMT Express 19/11/2022 (Saturday) 
4. Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Express j 20/11/2022 (Sunday)
5. Train no. 10103 Mumbai CSMT – Madgaon Jn. Mandovi  19/11/2022 (Saturday) 
6. Train no. 12133 Mumbai CSMT – Mangaluru Jn. Express 19/11/2022 (Saturday) 
7. Train no. 10111 Mumbai CSMT- Madgaon Jn. Konkankanya  19/11/2022 (Saturday) & 20/11/2022 (Sunday)

प्रवाशांनी कृपया ह्याची नोंद घ्यावी

Related : 

KR UPDATES 09/11/2022- कोकण मार्गावरील काही गाड्यांच्या आरंभ स्थानकामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा बदल

दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस

Loading

६१ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी मालवणमध्ये

सिंधुदुर्ग :६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि प्राथमिक फेरी मामा वरेकर नाट्यगृह, मालवण येथे होणार आहे. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणारी हि स्पर्धा २९ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. दरदिवशी संध्याकाळी ७ वाजता एक स्पर्धक संस्था आपले नाटक सादर करणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली फाईल डाउनलोड करा.
६१ व्या प्राथमिक फेरी-सिंधुदुर्ग.pdf
महाराष्ट्र सरकार १९६१ पासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search