Category Archives: मुंबई

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा.

मुंबई :सध्याच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर पाहण्यास मिळत आहे. या गर्दी मुळे कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गर्दीच्या वेळेत मुंबई मधील महत्वाच्या स्थानकांवर होणार्‍या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात येणार आहे.

दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही मर्यादा असणार आहेत. गर्दीच्या ठराविक वेळेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र वरीष्ठ नागरिक, अपंग तसेच लहान मुल असलेल्या महिलांसाठी या मर्यादेतून वगळण्यात आले आहे. 

प्रवाशांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा आणल्यास ही अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे. 

 

Loading

मध्यरेल्वे मार्गावरील १० लोकल गाड्या एसी लोकल्समध्ये परावर्तित होणार….

मुंबई :मुंबई लोकल मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकल्सना प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वे मार्गावरील अजून १० गाड्यांचे रूपांतर एसी लोकल्समध्ये करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्‍या एकूण एसी गाड्यांची 56 वरून 66 ईतकी होणार आहे. हा बदल दिनांक 06 नोव्हेंबर पासून अमलात आणला जाणार आहे.

या एसी लोकल सोमवार ते शनिवार धावतील आणि रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी धावणार नाहीत.

खालील गाड्या दिनांक 06 नोव्हेंबर पासून एसी लोकल म्हणुन चालविण्यात येणार आहेत

1)गाडी क्रमांक K-14 CSMT स्लो लोकल जी कल्याणहून 07.16 वाजता सुटते आणि 8.45 वाजता CSMT ला पोहोचते.

2)गाडी क्रमांक K-25 कल्याण स्लो लोकल जी CSMT वरून 08.49 वाजता सुटते आणि कल्याणला 10.18 वाजता पोहोचते.

3)गाडी क्रमांक K-50 CSMT स्लो लोकल जी कल्याणहून 10.25 वाजता सुटते आणि 11.54 वाजता CSMT ला पोहोचते.

4)गाडी क्रमांक A-27 अंबरनाथ स्लो लोकल जी CSMT वरून 11.58 वाजता सुटते आणि अंबरनाथला 13.44 वाजता पोहोचते.

5)गाडी क्रमांक A-42 CSMT स्लो लोकल जी अंबरनाथहून 14.00 वाजता सुटते आणि 15.47 वाजता CSMT ला पोहोचते.

6)गाडी क्रमांक DL-33 डोंबिवली स्लो लोकल जी CSMT वरून 16.01 वाजता सुटते आणि 17.20 वाजता डोंबिवलीला पोहोचते.

7)गाडी क्रमांक DDL-2 परळ स्लो लोकल जी डोंबिवलीहून 17.32 वाजता सुटते आणि 18.38 वाजता परळला पोहोचते.

8)गाडी क्रमांक DK-15 कल्याण स्लो लोकल जी परळहून १८.४० वाजता सुटते आणि १९.५४ वाजता कल्याणला पोहोचते.

9)गाडी क्रमांक PK-22 परळ स्लो लोकल जी कल्याणहून 20.10 वाजता सुटते आणि 21.25 वाजता परळला पोहोचते.

10)गाडी क्रमांक PK-23 कल्याण स्लो लोकल जी परळहून 21.39 वाजता सुटते आणि कल्याणला 22.53 वाजता पोहोचते.

Loading

Video : मुंबई एलटीटी – मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदरांचा सुळसुळाट

Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. पण, रेल्वे डब्यांमध्ये आणि रेल्वे यार्डमध्ये उंदीर नियंत्रणाचे उपाय नियमितपणे केले जातात, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

 

 

 

Loading

एसटीची मुंबई ते बांदा स्लीपर बससेवा आजपासून सुरु; वेळापत्रक, थांबे आणि तिकीटदर येथे जाणून घ्या.

मुंबई : एसटीची मुंबई ते बांदा अशी नवीन शयनयान बस सेवा आजपासून म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे. ही गाडी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सेंट्रल या स्थानकावरून सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ती बांदा या ठिकाणी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ती बांदा शहरातून संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून ती मुंबई सेंट्रलला ९ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल 
ही गाडी मुंबई गोवा महामार्गावरून न चालविता पुणे सातारा मार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील फक्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 
मुंबई ते बांदा या मार्गावरील प्रवासासाठी 1246 रुपये तिकीट दर असणार आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला प्रवाशांसाठी असलेल्या तिकीट सवलती या विना वातानुकूलीत शयनयान बसला देखील लागू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बोरीवली – बांदा या मार्गावर ही शयनयान बसस धावणार आहे. त्यानंतर गोव्यातील पणजीपर्यंत या बसेचा विस्तार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पन्नास विना वातानुकूलित शयनयान बसेस ( sleeper coach ) येणार आहेत.
या गाडीचे थांबे
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Bus-Stops.pdf” title=”__ MSRTC __ Bus Stops”]
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Stops2.pdf” title=”__ MSRTC __ Stops2″]

Loading

‘नेरुळ’ च्या जागी ‘नेरूल’; ”सुधारणा न केल्यास…” मराठी एकीकरण समितीचा रेल्वेला इशारा

ठाणे : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात अनेक मराठी शहरांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर सरकारी कार्यालयात, कागदोपत्री आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दर्शक फलकांवर ही चुकीची नावे वापरून तीच कायम करण्यात आल्याचे प्रकारही घडत आहेत. 

रेल्वे प्रशासना सुद्धा या गोष्टीत मागे नाही आहे. रेल्वेमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा जास्त भरणा असल्याने रेल्वेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. 

ठाणे ते पनवेल लोकल रेल्वे प्रशासनाने असाच एक प्रकार केल्याचा  नेरुळ या स्थानकाच्या नावाच्या बाबतीत घडला आहे. या स्थानकाचे नाव ‘नेरूळ’ असताना ते वेळापत्रक दर्शिकेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘नेरूल’ असे दाखविण्यात आले आहे.

याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. नेरूळ गंतव्य स्थानकाच्या नावाचा अचूक मराठी देवनागरी लिपीत वापर करण्यात यावा.विहीत मुदतीत बदल न केल्यास पीजी पोर्टलवर तक्रार नोंद करण्यात येईल. असा इशारा या समितीने दिला आहे 

Loading

एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर थांबणार

 

Konkan Railway News :कोंकण रेल्वे मार्गावर धावणारी लांब पल्ल्याची एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस या जलद गाडीला  पनवेल या स्थानकावर थांबा मिळणार आहे. 26 ऑगस्ट पासून हा बदल अमलात आणला जाणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

आठवड्यातुन दोन दिवस धावणारी या गाडीची पनवेल स्थानकावर थांबण्याची वेळ जाहीर करण्यात आली आहे. एलटीटी स्थानकावरून रात्री 20:50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12223 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  पनवेल स्थानकावर रात्री 21: 44 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ रात्री 02:25 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.

परतीच्या प्रवासात एर्नाकुलम स्थानकावरून रात्री 21:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12224 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  पनवेल स्थानकावर संध्याकाळी 17:02 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ दुपारी 15:30 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.

अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी दुरांतो एक्सप्रेस ओळखली जाते. एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  12223/24 ही गाडी  एलटीटी – एर्नाकुलम या स्थानकादरम्यान ही  फक्त रत्नागिरी, मडगाव, कोझिकोडे मेन आणि मंगुळुरु या चार स्थानकावर थांबते. एलटीटी वरून सुटून ही गाडी डायरेक्ट रत्नागिरी स्थानकावर थांबत होती. या गाडीला पनवेल येथे थांबा मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होती. रेल्वे बोर्डाने ही मागणी पूर्ण केली आहे. मात्र दक्षिणेकडील कुन्नूर, कासारगोड आणि शोरानूर या स्थानकावर या गाडीला थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाने दुर्लक्ष केले आहे.

Loading

Mumbai | चिकन डिशमध्ये आढळला उंदीर; हॉटेल मालकावर कारवाई

मुंबई : वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर केलेल्या एका ग्राहकाला चक्क उंदीर आढळला आहे.  त्याच्या ताटात उंदीर आढळल्याची तक्रार केल्यानंतर वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आणि दोन स्वयंपाकींना मंगळवारी अटक करण्यात आली.
रविवारी रात्री पापा पांचो दा ढाब्यावर जेवण कमी चवीचे असल्याचे  गोरेगावस्थित अनुराग सिंग या बँक अधिकाऱ्याने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. हे रेस्टॉरंट दोन दशकांहून अधिक काळ पंजाबी खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहे.
 
वांद्रे येथे दिवसभर खरेदी केल्यानंतर रविवारी रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सिंग यांनी सांगितले की त्यांनी ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदीराचे बाळ आढळले. सुरुवातीला तिने याकडे लक्ष दिले नाही आणि चिकनचा तुकडा समजून त्यातील काही खाल्ले. बारकाईने पाहणी केल्यावर त्याला कळले की तो उंदराचे बाळ आहे.
 
जेव्हा त्यांनी  वेट स्टाफकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी माफी मागितल्याचे सांगितले, परंतु व्यवस्थापक आणखी 45 मिनिटे पुढे आला नाही. सिंग म्हणाले की, करीत उंदीर सापडल्यानंतर लगेचच आजारी वाटले, ज्यापैकी काही त्याने आधीच खाल्ले होते. घरी परतताना त्यांनी काही औषधे लिहून दिलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला.
 
वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने हॉटेल व्यवस्थापक विवियन सिक्वेरा आणि दोन स्वयंपाकी यांच्या अटकेची पुष्टी केली. “त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 272 (विक्रीच्या अन्नात भेसळ) आणि 336 (कोणत्याही व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असलेल्या अविचारी किंवा निष्काळजी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. तिघांचीही जामिनावर सुटका झाली. ते म्हणाले की ते आता रेस्टॉरंटच्या मांस पुरवठादाराची चौकशी करत आहेत.

Loading

Mumbai Local Train : मुंबईकरांचा प्रवास आरामदायक होणारा! १२ डब्यांच्या ‘या’ ४९ लोकल उद्यापासून १५ डब्यांसह धावणार

Mumbai Local Train News : लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. गर्दीच्या वेळी लोकलला लटकत प्रवास टाळण्यासाठी व एका लोकल ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना आरामशीर प्रवास करता यावा, याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा नव्या बदलासह रेल्वे धावणार आहेत.

उपनगरीय वाहतूक सेवा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. ४९लोकल ट्रेन १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार आहेत. त्यामध्ये मुख्यपणे चर्चगेट ते विरार दरम्यानची स्लो लाइन आणि केवळ १५ फास्ट लाइन सेवांचा समावेश आहे.

खालील गाड्या उद्या १५ ऑगस्टपासून या बदलानुसार धावणार आहेत.

झूम करण्यासाठी फोटोवर लॉंग प्रेस करा..

Loading

दोन वंदे भारत एक्सप्रेसना उद्यापासून ठाणे व कल्याण येथे थांबा

मुंबई: मुंबई येथून सुटणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत गाड्यांना उद्या दिनांक ४ ऑगस्टपासून  कल्याण आणि ठाणे येथे 2 मिनिटे थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

शिर्डी साईनगर एक्सप्रेस सीएसएमटीहून सुटल्यानंतर सकाळी ७.११ वाजता कल्याणला थांबेल. सीएसएमटीला परतताना ही गाडी कल्याणला रात्री ९.४५ वाजता थांबेल.

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून सोलापूरसाठी निघाल्यानंतर दुपारी ४.३३ वाजता ठाणे स्थानकावर थांबेल. दुपारी ४.५३ वाजता कल्याणला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान ती ठाणे येथे सकाळी 11.50 वाजता थांबेल.

Loading

Rainfall Updates | मुंबईसह कोकणातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

मुंबई : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.
सर्व  संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढून उद्या  प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search