जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी आज काढलेल्या परिपत्रकानुसार परशुराम घाट १२ तारखेपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ आणि ११६ नुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे
ह्या आधी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग ९ जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आला होता, पण आता तो कालावधी आजून वाढवला आहे .
ह्या आदेशानुसार हा घाट वाहुतुकीसाठी १२ जुलै रात्री १२ वाजेपर्यत पूर्णपणे बंद राहील. सदर कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी – आंबडस – चिपळूण या पर्यायी मार्गे योग्य होईल असा अभिप्राय कायकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण- रायगड यांनी दिला असल्यामुळे त्यानुसार पर्यायी वाहतूक वाळविणेस अभिप्राय आहे असे कळविण्यात आलेले आहे. तसेच जड वाहनांची वाहतूक मुंबई-पुणे व माणगाव- ताम्हाणे मार्गे वळविण्यास विनंती करण्यात आलेली आहे.


Facebook Comments Box
Related posts:
Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणू...
कोकण
प्रवाशांचे हाल संपता संपेनात; अजून एका एक्सप्रेसची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित
कोकण
"मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरू पर्यंत नेण्यापेक्षा....." कोकण विकास समितीने रेल्वेला दिला ...
कोकण