परशुराम घाट वाहतुकीसाठी १२ तारखेपर्यंत बंद

जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी आज काढलेल्या परिपत्रकानुसार परशुराम घाट १२ तारखेपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ आणि ११६ नुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे
ह्या आधी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग ९ जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आला होता, पण आता तो कालावधी आजून वाढवला आहे .
ह्या आदेशानुसार हा घाट वाहुतुकीसाठी १२ जुलै रात्री १२ वाजेपर्यत पूर्णपणे बंद राहील. सदर कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी – आंबडस – चिपळूण या पर्यायी मार्गे योग्य होईल असा अभिप्राय कायकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण- रायगड यांनी दिला असल्यामुळे त्यानुसार पर्यायी वाहतूक वाळविणेस अभिप्राय आहे असे कळविण्यात आलेले आहे. तसेच जड वाहनांची वाहतूक मुंबई-पुणे व माणगाव- ताम्हाणे मार्गे वळविण्यास विनंती करण्यात आलेली आहे.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search