
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील टोलवसुली बाबत माजी खासदार निलेश राणे यांनी एक विधान केले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना प्रशासन जर जबरदस्तीने टोल सुरू करत असेल तर पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा इशारा देतानाच, प्रशासनाने आधी जनतेचे प्रश्न, म्हणणे जाणून घ्यावे, ते सोडवावेत आणि मगच टोल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभेचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.
ट्विटर च्या माध्यमातून पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामर्गावरील हातिवले टोल नाका येथे म्हणजेच अगदी टोलच्या आजूबाजूला देखील काम पूर्ण झालेले नाही, रायगड जिल्ह्यात देखील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकणाचे काम केवळ 60 टक्केच झाले आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करणे ही जनतेवर जबरदस्ती आहे. जनतेने एकदा याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घ्यायला हव्यात. टोल ला आमचा विरोध नाही मात्र काम अपूर्ण असताना, जनतेचे प्रश्न नसोडवता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जर जबरदस्तीने अचानक टोल सुरू करू नये. भविष्यात जनता रस्त्यावर उतरली तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न देखील निलेश राणे यांनी केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून घेऊन मग टोल बाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.
राजापूर हातिवले टोलच्या आजूबाजूलाच अजून महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही, हा त्याचा पुरावा. यामुळे प्रशासनाने जनतेचा रोष स्वतःवर ओढून घेऊ नये, टोलला विरोध नाही पण जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल करू नये. pic.twitter.com/y3XGaZgeDY
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 3, 2022
![]()
Facebook Comments Box
Related posts:
गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
कोकण
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक; 'या' गाड्यांच्या वेळापत्रकांवर होणार परिणाम
कोकण
ऐन गणेशचतुर्थीच्या तोंडावर रेल्वेचे दोन ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांचे वेळापत्रक ...
कोकण

