नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्‍वरवासियांचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी: नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्‍वर रोड स्थानकात थांबा मिळावा यासाठी तीन वर्षापासून पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही जाग येत नसलेल्या रेल्वे प्रशासनाविरोधात २६ जानेवारी २०२३ म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून निसर्गरम्य चिपळूण-संगेमश्‍वर ग्रुप तसेच संगमेश्‍वरवासियांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

(Also Read>उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे)

संगमेश्‍वर रोड स्थानकातून रेल्वेला दर महिन्याला चांगला महसूल मिळत असतानाही कोकण रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव का केला जातो, असा प्रश्‍न संगमेश्‍वरमधील जनता विचारत आहे. कोकणवासियांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यात संगमेश्‍वर तालुक्यात १९६ गावातील चाकरमानी कामधंद्यानिमित्त कोकण ते मुंबई असा नेहमी प्रवास करत असतात. संगमेश्‍वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबाव्यात यासाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्‍वर फेसबुक ग्रुपवर वारंवार रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहे. त्यास स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे. जनतेच्या या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देवून जनतेवर होणारा अन्याय दूर करेल असे वाटले होते. असे आंदोलनाची हाक दिलेल्या संदेश जिमन यांनी म्हटले आहे.

(Also Read>कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे)

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search