Mumbai Goa Highway | बांदा-पत्रादेवी येथे लवकरच टोल ‘वसुली’…….

Mumbai Goa Highway: गोव्यात जाणे आता महागणार आहे. गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल देणे बंधनकारक होणार आहे. गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी यांनी पणजी (गोवा) येथे दिले. तीन राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये हे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. त्यामुळे आता गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

पणजी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आरटीओ विभागाचा टोलनाका सुमारे ३२ एकर जागा संपादन करून याआधीच उभारण्यात आलेला आहे. मात्र कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार, कोणाला या टोल मधून सवलत असेल, टोलचे दर काय असतिल याची अद्याप निश्चिती झालेली नाही.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search