Revas Reddy Costal Highway: उड्डाणपूल नको तर समुद्राला समांतर असा रस्ता हवा- काळबादेवी ग्रामस्थांची मागणी

   Follow us on        

Revas Reddy Costal Highway: रेवस रेड्डी सागरी महामार्ग नियोजनामध्ये रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे साडेचार कि.मी. चे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीवरचा रस्ता व्हावा, यामुळे गावच्या पर्यटन उद्योगाला मोठी मदत मिळेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी यापूर्वी ग्रामसभेत ठराव झाला असून आता गमिस्थांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे.

आतापर्यंत चारशेहून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती सरपंच तृप्ती पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मिऱ्या-काळबादेवी खाडीवील पूल प्रस्तावित आहे. या पुलाला जोडून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपूल बसणी साखरतर रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी मिऱ्या-काळबादेवी पुलाला लागून समुद्रालगत आरे गावापर्यंत रस्ता प्रस्तावित करावा अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभने २० ऑगस्ट २०२४ रोजी केली

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search