Author Archives: Kokanai Digital

० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार?

मुंबई:  शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत?संबंधित शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणाची शक्यता आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने याबाबतचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

शिक्षण हक्क कायदा काय सांगतो?

शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या शाळा या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर अंतरावर असाव्यात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा तीन किलोमीटर अंतरावर असाव्यात असा आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि शाळा जवळ असावी असा शिक्षण हक्क कायदा सांगतो, त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा बंद झाल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होईल असं तज्ञांचा म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा एकदा अशा शाळा बंद करायला विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारद्वारे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळांपर्यंत चांगली वाहतूक सुविधा देता येईल का याचा पूर्ण आढावा कदाचित घेऊन काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

Loading

वेदांता पाठोपाठ अजून एक कंपनी महाराष्ट्रातून बाहेर

मुंबई: अधून मधून कंपनी मध्ये जात जा, नाहीतर तुम्ही असाल वर्क फ्रॉम होम मध्ये आणि कंपनी गेली असेल दुसर्‍या राज्यामध्ये. अशा आशयाचा एक जोक अलीकडे सोशल नेटवर्किंग मेडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरात मध्ये गेल्याने लोक ह्या प्रकारचे जोक्स करताना दिसत होते. पण ही गोष्ट आता गंभीर होत चालली आहे. कारण अजून एक कंपनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.

‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही आपले मुख्य कार्यालय मुंबई वरून चेन्नई येथे नेण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटिस एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे.

कंपनीच्या नोटीसमध्ये काय आहे?
‘फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, “कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे,” अशी माहिती दिली आहे.तसेच, “कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते,” असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

   

Loading

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा पुणे येथे पार पडला

पुणे :आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चाैक, मंगळवार पेठ,पुणे, महाराष्ट्र येथे  महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित “आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमात शाहीर श्रीकांत रेणके आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला,गणेशवंदना,तालवाद्य वादन,उमाजी नाईक यांच्यावर आधारीत गीत आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जिवनपटावर आधारीत अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर झाला कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली,ढोलकी – राहूल कुलकर्णी सिंथेसायझर- दिपक पवार भरत शर्मा,राहूल पवार यांनी साथसंगत केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कडून झाले.

आलेले पाहुणे श्री.संदीप ओव्हाळअॅड. राजेश म्हामुणकर रोहिदास दादा मदने,गंगाराम जाधव,सुभाष जाधव,शेखर गोरगले ,सुरेश चव्हाण,शांताराम गोपने,प्रशांत गोपने,महेश म्हसुडगे,आरती ताई साठे, हिरा जी बुवा , संदीप शेळके, भूषण कांबळे, राजाराम निकम, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून त्यांना पुषपगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.विकास सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी संत असंख्य रसिक गणांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले.

Loading

सणासुदीच्या हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाडी… आरक्षण 22 सप्टेंबर पासून.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 30 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.

 

ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.

 

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.

 

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

ह्या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत. 

एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

 

ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 22/09/2022 पासून रेल्वेच्या टीकेट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.

 

   

Loading

लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपये दंड

मुंबई : पालिकेच्या भायखळा ‘ई’ विभागाने लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. मंडळाने गणेशभक्तांसाठी दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे मंडळाने रस्त्यावर १८३ खड्डे खोदल्याने त्याची भरपाई म्हणून हा दंड आकारला गेला आहे.

महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा दंड मंडळाच्या महापालिके कडे जमा असलेल्या निधीतून वसूल केला जातो.

भायखळा ‘ई’ विभागाच्या हद्दीमधील टी. बी. कदम मार्गावर (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बिल्डिंगपर्यंत) पालिकेची परवानगी न घेता दर्शन रांगेसाठी मार्गिका उभारण्यात आली. या मार्गिकेला बॅरिकेड्स लावण्यासाठी खड्डे पाडण्यात आले. पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार रुपये याप्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. ही रक्कम ‘ई’ विभाग कार्यालयात तातडीने भरण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.

 

या पूर्वीपण अशा प्रकारचा दंड महापालिकेकडून
आकारला गेला होता. सन 2012 साली 23.56 लाख, 2013 साली 5.60 लाख, 2014 साली 5.56 लाख तर 2015 ह्या वर्षी 3.36 लाख ह्या कारणास्तव मंडळातून दंड वसूल करण्यात आला होता.

 

 

Loading

दहावी – बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. पूर्ण वेळापत्रक ईथे पहा

मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी-मार्च२०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी -बारावीच्या परीक्षांचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.

 

मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे वेळा पत्रक अंतिम नसेल त्यामध्ये काही प्रमाणात बदल केले जातील. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना परीक्षे संदर्भात कल्पना दिली तर ते त्या प्रमाणे नियोजन करू शकतात आणि ताण कमी करू शकतात ह्या हेतूने हे प्राथमिक स्वरूपाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले गेले आहे असे मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पूर्ण वेळापत्रक 👇🏻

TIMETABLE-SSC-MAR-23 TIMETABLEHSCFEB23GEN

Loading

कोकणकन्या एक्सप्रेस आता होणार सुपरफास्ट, कमी वेळात जास्त अंतर कापणार

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना एक खुशखबर आहे.  सर्व कोकणकरांची आवडती आणि सर्वांची पहिली पसंती असणारी कोकणकन्या एक्सप्रेस 10112 / 10111 आता “सुपरफास्ट” कॅटेगरी मध्ये येणार आहे. ह्या गाडीचा नंबर सुद्धा बदलणार आहे. हि गाडी आता 20112 / 20111 Madgoan Jn – Mumbai CSMT -Madgoan Jn Konkan Kanya Superfast Express  ह्या नावाने चालविण्यात येणार आहे. दिनांक २० जानेवारी २०२३ पासून हा बदल अमलात आणला जाणार आहे.

“सुपरफास्ट” कॅटेगरी मध्ये आल्याने हि गाडी मुंबई ते मडगाव हे अंतर कमी वेळात कापणार आहे. 20111 Mumbai CSMT -Madgoan Jn Konkan Kanya Superfast हि गाडी मुंबई सीएसमटी स्थानकावरून रात्री २३:०५ वाजता सुटून मडगावला  सकाळी ९:४६ ला पोहोचेल. 20112 Madgoan Jn – Mumbai CSMT Konkan Kanya Superfast हि गाडी मडगाव स्टेशन वरून संध्याकाळी ७ वाजता सुटून मुंबई सीएसमटी स्टेशन ला सकाळी ५.४० ला पोहोचेल. ह्या गाडीच्या स्थानकामध्ये काही बदल करण्यात आलेली नाही आहे.

   

Loading

सकाळी सुटणार्‍या कल्याण ते सिएसमटी महिला विशेष लोकल च्या वेळेत बदल करण्याची मागणी.

कल्याण : कल्याण वरून सिएसमटीला जाणारी सकाळी 08.09 च्या महिला विशेष गाडी मध्ये बदल करण्याची मागणी ह्या लोकलने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांकडून होत आहे. तशा आशयाची लेखी विनंती प्रवाशांच्या सहींसहित मंडल रेल प्रबंधक (DRM), सिएसमटी केली गेली आहे.

ह्या अर्जात खालील मागण्यांचा समावेश आहे.

  1. ह्या गाडीचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करावे. पूर्वी ही गाडी कल्याण स्थानकावरून सकाळी 08.01 वाजता सुटत होती.

  2. ही गाडी वेळेत यावी.

  3. ही गाडी 15 डब्यांची करावी किंवा,

  4. एक महिला विशेष गाडी ऑफिस च्या वेळेत (peak hours) मध्ये वाढवावी. (सकाळ आणि संध्याकाळ)

महिला प्रवाशांची वाढणार्‍या संख्ये प्रमाणात गाड्या वाढवल्या गेल्या नाहीत त्यामुळे महिला प्रवाशांना खास करुन वयस्कर महिलांना प्रवास करणे खूप त्रासाचे होत असल्याने या मागण्या केल्या गेल्या आहेत.  

Loading

भारत – ऑस्ट्रेलिया क्रिकेट श्रुंखला २० सप्टेंबर पासून. जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम भारत दौऱ्यासाठी येणार आहे. ह्या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या क्रिकेट संघासोबत तीन T २०-२० सामने खेळणार आहे. पहिला सामना मोहाली येथे पंजाब क्रिकेट असोसिएशन च्या बिंद्रा स्टेडियम येथेर दिनांक मंगळवारी २० सप्टेंबर रोजी दोन्ही संघासोबत रंगणार आहे. दुसरा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे दिनांक शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी तर तिसरा सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे रविवार दिनांक २५ सप्टेंबर खेळवण्यात येणार आहे. हे सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता चालू होतील.

ह्या सामन्यासाठी भारतीय संघ

Rohit Sharma (Captain)Batsman
Virat KohliBatsman
Suryakumar YadavBatsman
Deepak HoodaBatting Allrounder
Hardik PandyaBatting Allrounder
Ravichandran AshwinBowling Allrounder
Axar PatelBowling Allrounder
KL RahulWK-Batsman
Rishabh PantWK-Batsman
Dinesh KarthikWK-Batsman
Yuzvendra ChahalBowler
Bhuvneshwar KumarBowler
Umesh YadavBowler
Harshal PatelBowler
Deepak ChaharBowler
Jasprit BumrahBowler

ह्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ

Aaron Finch (Captain)Batsman
Steven SmithBatsman
BatsmanALL ROUNDER
Tim DavidBatting Allrounder
Glenn MaxwellBatting Allrounder
Ashton AgarBowling Allrounder
Cameron GreenBowling Allrounder
Daniel SamsBowling Allrounder
Sean AbbottBowling Allrounder
Bowling AllrounderWICKET KEEPER
Josh InglisWK-Batsman
Matthew WadeWK-Batsman
WK-BatsmanBOWLER
Pat CumminsBowler
Josh HazlewoodBowler
Kane RichardsonBowler
Adam ZampaBowler
Nathan EllisBowler

आगामी २०-२० विश्वचषकाच्या धर्तीवर हा दौरा महत्वाचा मानला जातो. आशिया कप मधील गोलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ खूप आधीच त्या मालिकेतून बाहेर पडला, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसपिर्त बुमराह चे पुनरागमन आणि विराट कोहली याला भेटलेला सूर भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरेल.

Loading

AC लोकलच्या मोटरमेन कडून हलगर्जीपणा, लोकलचे दरवाजे उपघडलेच नाही, प्रवासी कारशेड ला

ठाणे: AC लोकल चे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होण्याचे प्रकार उपनगरीय मध्यरेल्वे मार्गावर घडत आहेत.

लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना चक्क कारशेडला जावे लागण्याची घटना मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवर काल घडली. हि लोकल कळवा कारशेड ला गेली आणि सर्व प्रवाशांना अंधारात रुळावरून पायपीट करत यावे लागले.

अशा प्रकारच्या घटना मध्य रेल्वेवर २ ते ३ वेळा घडल्या आहेत. मागे कल्याण सीएसमटी AC लोकल चे दरवाजे दादर स्टेशनला न उघडता ती पुढच्या स्टेशन ला गाडी गेली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने हि गोष्ट मान्य केली नाही होती. पण त्या संदर्भातील विडिओ ट्विटर वर एका प्रवाशाने अपलोड केला होता.

काही दिवसांपूर्वी सीएसमटी स्थानकावर पण असाच प्रकार घडला होता.ठाणे सीएएमसटी एसी लोकल सीएसएमटी स्थानकात पोहोचली. थांबली. पण लोकलचे दरवाजे काही उघडलेच नाहीत. आता दरवाजे का बरं उघडत नाहीत? हे कळायला काही मार्ग नव्हता. लोकल स्थानकात आल्यानंतर मोटरमन खाली उतरला आणि चालू लागले. पण थोड्याच वेळात त्याला घडलेला प्रकार लक्षात आला आणि पुन्हा येऊन त्यानं अखेर लोकलचे दरवाजे उघडले.

मोटारमनच्या चुकीमुळे दरवाजे ओपन होत नाही आहेत. गाडी थांबल्यावर गाडीचे दरवाजे उघडणे आणि बंद करणे हे सर्व मोटरमन च्या नियंत्रणामध्ये असते. पण ह्या मध्ये होणाऱ्या हलगर्जीपणामुळे AC लोकल्स मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनां त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search