Author Archives: Kokanai Digital




सिंधुदुर्ग:कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.




Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांचे थांबे पाहून महाराष्ट्रात थांबे देताना हात आखडता घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळ आणि नववर्ष गोव्याची मक्तेदारी असली तरीही त्या काळात महाराष्ट्रातही पर्यटकांचे प्रमाण वाढते. तसेच शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकही आपापल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असतात. तळकोकणात जत्रांचा हंगामही सुरू होत असल्याने चाकरमानी गावी जात असतात. सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण याआधीच भरल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांत थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांनी समितीतर्फे नाराजी व्यक्त केली असून या गाड्यांना महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांतील रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याची मागणी निवेदना द्वारे मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.
हिवाळी पर्यटन आणि सणांच्या काळात धावणाऱ्या ०११५१/०११५२ मुंबई-करमळी, ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली, आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी या हिवाळी विशेष गाड्यांना महाड, लांजा, राजापूर आणि वैभववाडी या तालुक्यांत थांबा न दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या गाड्या या भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.
रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही गाडीला एकही थांबा न दिल्यामुळे या गाड्या नक्की कोणासाठी सोडल्या जातात हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे दर १५ ते २० किलोमीटरवर थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रात थांबे देण्यास आपले प्रशासन तयार नाही. कोकण रेल्वेत २२% आर्थिक सहभाग उचलून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही या आमच्या मतावर या प्रकारांमुळे मोहोर उमटते.
कोकण रेल्वे मार्गावरील वरील सर्व तालुके हे कोकणातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटन हंगामामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत या स्थानकांना थांबे न दिल्याने स्थानिक रहिवाशांची अनावश्यक गैरसोय होणार आहे.
वरील गाड्यांना वरील स्थानकांवर थांबा दिल्यास स्थानिक नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटेल,पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.
आपण या भागातील प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील गाड्यांना आरक्षण सुरु होण्यापूर्वी महाड तालुक्यातील वीर, लांजा तालुक्यातील विलवडे, राजापूर तालुक्यातील राजापूर रोड आणि वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी रोड तसेच ०११५१/०११५२ मुंबई-करमळी गाडीला सावंतवाडी रोड स्थानकांवर तातडीने थांबे देण्याची व्यवस्था करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो.
आपण लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 22:28:32 पर्यंत
- नक्षत्र-अश्विनी – 09:53:20 पर्यंत
- करण-भाव – 11:50:57 पर्यंत, बालव – 22:28:32 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-परिघ – 15:22:39 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:04
- सूर्यास्त- 18:01
- चन्द्र-राशि-मेष
- चंद्रोदय- 15:16:00
- चंद्रास्त- 28:41:00
- ऋतु- हेमंत
- १७८७: ला पेनसिल्वेनिया हे अमेरिकेचे संविधान स्विकार करणारे दुसरे राष्ट्र बनले.
- १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन
- १८००: ला वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी बनले.
- १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
- १८८४: ला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळला गेला जो अधिकृत रित्या पहिला होता.
- १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
- १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
- १९११: ला जॉर्ज पाचवा भारतामध्ये आला होता.
- १९१७: ला इटली येथील फ्रेंच आल्प्स येथे फ्रान्स च्या सैन्याची रेल्वे रुळावरून रेल्वे घसरून ५४३ लोकांचा मृत्यू.
- १९२३: ला इटलीच्या गंगा मानल्या जाणाऱ्या नदीवरील बांध फुटल्यामुळे ६०० च्या जवळपास लोक मारल्या गेले होते.
- १९३६: ला चीन चे नेता च्यांग काई शेक यांनी जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती.
- १९५८: ला जिनिया हा देश संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य बनला.
- १९६३: ला केनियाला स्वातंत्र्य मिळाले.
- १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
- १९९०: ला टी. एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले.
- १९९६: ला भारत आणि बांग्लादेश यांच्या मध्ये ३० वर्षापर्यंत गंगेचे पाणी वाटण्याच्या करारा वर सह्या झाल्या होत्या.
- २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
- २००१: आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
- २००१: ला भारताने नेपाळ ला दोन चीता हेलिकॉप्टर आणि काही अवजारे दिली होती.
- २००८: ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोइली यांनी सरकारी कर्मचारी यांच्या सेवा मंडळांमध्ये बदलाव करण्यासाठी शिफारस केली.
- २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
- 2021: हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 जिंकली
- १८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)
- १८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८)
- १८९२: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (मृत्यू: ११ मार्च १९६५)
- १९०५: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)
- १९०७: खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)
- १९१५: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८)
- १९१९: ला भारतीय क्रिकेटर भाऊसाहेब निंबाळकर यांचा जन्म.
- १९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)
- १९४०: शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- १९४५: ला संसद आणि लोकसभेचे सदस्य माजीद मेमन यांचा जन्म.
- १९४९: ला महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म.
- १९४९: ला तमिळ तसेच हिंदी चित्रपटांचे अभिनेते रजनीकांत यांचा जन्म.
- १९५०: रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते
- १९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.
- १९५४: ला मुंबई येथे २६/११ च्या झालेल्या दहशदवादी हल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा जन्म.
- १९७३: ला मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध सुपर स्टार भरत जाधव यांचा जन्म.
- १९७८: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार उमेश कामत यांचा जन्म.
- १९८१: युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू
- १९८४: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार संतोष जुवेकर यांचा जन्म.
- १९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: ? ? १९०८)
- १९६४: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
- १९९१: दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ – १९६६) (जन्म: ? ? ????)
- १९९२: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)
- २०००: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)
- २००५: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
- २००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
- २०१२: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न’ (जन्म: ७ एप्रिल १९२०)
- २०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
- २०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)




रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत. तालुक्यात असणार्या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दापोलीत स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.
तालुक्यात 105 ग्रामपंचायती आणि 173 गावे आहेत. या 173 गावांमध्ये अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे, रो -हाऊसेस, बंगलो, बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत. शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढार्यांचे ‘खिसेही गरम’ केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.
तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाले असल्याचीही ओरड होताना दिसत आहे. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकासकांनी रो-हाऊसेस, बंगलो बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे. यातील अनेक ठिकाणी विकसकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत.
कोकणातील लोक वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक मुंबईसारख्या ठिकाणी खोली विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे. गावाला केवळ सणासुदीला तो येताना दिसत आहे. शासनाकडून मिळणार्या धान्यामुळे तालुक्यातील शेतीही ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे शेती ओसाड ठेऊन करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेचे बाब ठरली आहे.
आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 25:11:42 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 11:48:41 पर्यंत
- करण-वणिज – 14:29:58 पर्यंत, विष्टि – 25:11:42 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वरियान – 18:47:12 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:04
- सूर्यास्त- 18:00
- चन्द्र-राशि-मीन – 11:48:41 पर्यंत
- चंद्रोदय- 14:33:00
- चंद्रास्त- 27:37:00
- ऋतु- हेमंत
- १६८७: ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास मध्ये सर्वात आधी महानगरपालिका बनवली होती.
- १८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
- १८४५: पहिले आंग्ल-सिख युद्ध झाले होते.
- १८५८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि यदुनाथ बोस हे कलकत्ता विश्वविद्यालयामधून पहिले पदवीधर बनले.
- १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
- १९३७: इटली ने मित्र राष्ट्र संघ ला सोडले.
- १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४६: डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे निर्वाचित अध्यक्ष बनले होते.
- १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
- १९४६: स्पेन या देशाला संयुक्त राष्ट्र संघाने निलंबित केले.
- १९६०: लहान मुलांच्या विकासकामाला लागलेली संस्था युनिसेफ च्या सन्मानासाठी १५ नवीन टपाल तिकिटांची निर्मिती सुरु केली होती.
- १९६४: संयुक्त राष्ट्र संघाची संस्था युनिसेफ ची स्थापना.
- १९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
- १९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
- १९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
- २००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
- २००३: मेरिदा येथे ७३ देशांनी भ्रष्टाचार विरोधी करारावर सह्या केल्या.
- २००७: उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या मध्ये ५० वर्षानंतर पुन्हा रेल्वे सेवा पुर्वव्रत.
- २०१४: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या योग दिवसाला संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकृती दिली होती.
- १८१०: फ्रांस चे प्रसिद्ध कवी अल्फ्रेड डोमोसे यांचा जन्म.
- १८४३: रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१०)
- १८६७: ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४०)
- १८८२: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
- १८९२: अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ – १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ – १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ – १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ – १९६६), पद्मविभूषण (१९७७)
- १८९९: पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक (मृत्यू: ? ? ????)
- १९०९: नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ????)
- १९१५: मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६)
- १९२२: मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
- १९२५: राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६)
- १९२९: सुभाष गुप्ते – लेगस्पिनर (मृत्यू: ३१ मे २००२)
- १९३१: भगवान श्री रजनीश (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
- १९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.
- १९४२: आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (मृत्यू: २६ मार्च १९९९)
- १९६९: विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
- १९८२: ला तमिळ चे प्रसिद्ध लेखक सुब्रह्मण्य भारती यांचा जन्म.
- २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
- १७८३: रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)
- १९३९: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचे निधन.
- १९४९: प्रसिद्ध विचारक आणि लेखक कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचा जन्म.
- १९८७: गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)
- १९९८: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
- २००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)
- २००१: रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)
- २००२: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)
- २००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
- २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
- २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.




सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व दीपकभाई केसरकर यांना घेऊन २७ जून २०१५ सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास केला होता. तेव्हा कोकणी जनता आणि मुंबईस्थित चाकरमानी या घटनेने सुखावले होते, मात्र त्यानंतर या टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत पूर्ण झाले नाही आहे. २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ असा नारा त्यांनी दिला होता. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नुसते आलेच नाही तर पक्षाच्या विक्रमी जागांसह सत्तेवर आले आहेत. त्यामुळे आता तरी ते सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करतील अशी आशा समस्त कोकणकरां कडून करण्यात येत आहे.
आता नाही तर कधीच नाही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासासाठी पोषक राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात केंद्रात आणि राज्यात महायुतीचा दबदबा आहे. जिल्हय़ातील सर्वच आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार नारायण राणे आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगले संबध निर्माण झाले आहेत. आमदार दिपक केसरकर यापुर्वीपासूनच सावंतवाडी टर्मिनस साठी आग्रही आहेत आणि त्यांच्या परीने ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सावंतवाडी टर्मिनस साठी लागणार्या पाण्यासाठी तिलारी प्रकल्पातून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असल्याचेही मागे सांगितले होते. मात्र त्यासाठी मोठी दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याची केंद्रीय, राज्यातील आणि जिल्हय़ातील राजकिय परिस्थिती पाहता हे काम पूर्ण करून घेण्यासाठी हीच नामी संधी आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी चा पाठपुरावा
सावंतवाडी येथे टर्मिनस व्हावे, येथे महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा मिळावा आणि ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करत आली आहे. विविध माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती केली तर आहे त्याबरोबरच आपला मागण्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघटना आग्रही आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१५ साली त्यांनी सावंतवाडी टर्मिनसचे जे स्वप्न त्यांनी कोकणी जनतेला दाखवले होते ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.




Konkan Railway Updates:कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. तब्बल सहा गाड्यांच्या डब्यांच्या बदल करण्यात येणार असून खासकरून या गाड्यांचे जनरल डबे कमी करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे.
१६३३४ / १६३३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, 3 टियर एसी इकॉनॉमी – ०२ ,स्लीपर – ०७ ,जनरल – ०४ , पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, ३ टियर एसी इकॉनॉमी – ०३ ,स्लीपर – ०७ ,जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
दिनांक ०२ डिसेंबर २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
१६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल -०४, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७,जनरल – ०३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६३४ / २२६३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल – ०४, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१
दिनांक ०४ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५३ / २२६५४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल -०४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल -0२, जनरेटर कार – ०२
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५५ / २२६५६ एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०३, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – २, जनरेटर कार – ०२
दिनांक ११ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५९ / २२६६० कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना -०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ०२, जनरेटर कार – ०२
दिनांक ०६ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.