(File Photo)
Follow us on



ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा सुरू असलेल्या ८१ शाळांची यादी पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यात एक मराठी, दोन हिंदी तर, ७८ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिवा परिसरात सर्वाधिक म्हणजे ५५ शाळा बेकायदा सुरू असल्याची बाब यादीतून समोर आली आहे. या शाळा तात्काळ बंद केल्या नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.
ठाणे महापालिकेची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरात बेकायदा शाळा सुरू करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात सुरू झाले आहेत. अशा बेकायदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पालिका प्रशासन गेल्या काही वर्षांपासून बेकायदा शाळांची यादी जाहीर करत आहे. यंदाही पालिकेने शहरातील बेकायदा शाळांची यादी जाहीर केली असून त्यानुसार संपुर्ण पालिका क्षेत्रात ८१ शाळा बेकायदा सुरू असल्याचे उघड झाले आहे.दिवा परिसरात ५५ बेकायदा शाळा असल्याचे समोर आले,या शाळा तात्काळ बंद करण्याचा आदेश. नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.
बेकायदेशीर शाळांची यादी
आरंभ इंग्लीश स्कूल, आगापे इंग्लिश स्कूल, नालंदा हिंदी विद्यालय, रेन्बो इंग्लिस स्कूल, सिम्बाॅयसेस हायस्कूल, जीवन इंग्लिश स्कूल, एम.एस इंग्लिश स्कूल, कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल, आर.एल.पी हायस्कूल, आदर्श हायस्कूल, श्री. दत्तात्रय कृपा इंग्लिश स्कूल, एम.आर.पी इंग्लिश स्कूल, एस.एस. मेमोरियल इंग्लिश स्कूल, ओम साई इंग्लिश स्कूल, स्टार इंग्लिश हायस्कूल, श्री. विद्या ज्योती इंग्लिश स्कुल, केंब्रिज इंग्लिश स्कुल, पब्लिक इंग्लिश स्कूल, पब्लिक मराठी स्कूल, टिवकल स्टार इंग्लिश स्कूल, होली एंजल इंग्लिश स्कूल, आर्या गुरूकुल इंग्लिश स्कूल, सेंट सायमन हायस्कूल, शिवदिक्षा इंग्लिश स्कूल, श्री. राम कृष्णा इंग्लिश स्कूल, केंट व्हॅलो इंटरनॅशनल स्कूल, ब्रायटन इंटर नॅशनल इंग्लिश स्कूल, अक्षर इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, यंग मास्टर्स इंग्लिश स्कूल, स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल, एस.एम. ब्रिल्ऐट इंग्लिश स्कूल, न्यु माॅर्डन स्कूल, एस.डी.के इंग्लिश स्कूल, डाॅन बाॅस्को स्कूल, मदर टच, लिटील विंगस, आर.म. फाॅउंडेशन, कुबेरेश्वर महादेव, जिनियस, ऑरबिट इंग्लिश स्कूल, जागृती विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल, नंदछाया विद्यानिकेतन, सेंट सिमाॅन हायस्कूल, अलाहादी मक्तब ॲँड पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम), होलो ट्रोनेटो हायइंग्लिश स्कूल, एस.जी. इंग्लिश स्कूल, अलहिदाया पब्लिक स्कूल, ड्रिम वर्ल्ड इंग्लिश स्कूल, प्रभावती इंग्लिश स्कूल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बुरहानी स्मार्ट चॅम्प, लिटील एंजल्स प्रायमरी स्कुल, आयेशा इंग्लिश प्रायमरी स्कूल, द कॅम्पेनियन हायस्कुल, इव्हा वर्ल्ड स्कूल, गुरूकूल ब्राईट ब्लर्ड स्कूल, खैबर इंग्लिश स्कूल, गौतम सिंघानिया स्कूल (घोडबंदर), झोरेज इंग्लिश ॲँड इस्लामिक स्कूल, अशरफी स्कूल, अल-हमद इंग्रजी स्कूल, ह्युमिनीटी पब्लिक स्कुल, आइशा इंग्लिश स्कूल, एम.एम. पब्लिक स्कूल, हसरा इंग्रजी ॲकेडमी अशी बेकायदा शाळाची यादी आहे.




सिंधुदुर्ग: १४४ वर्षातून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत.महा कुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराजदरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण व पनवेल स्थानकांवर थांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू धर्मात महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून सनातन धर्माच्या परंपरेचे सखोल प्रतिबिंब उमटते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्णकुंभ म्हणतात. बाराव्या पूर्णकुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा होतो. तब्बल १४४ वर्षांनंतर यंदा महाकुंभ होत आहे. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाची व्यवस्थाही आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी काही तारखा निश्चित केल्या जातात. यंदा महाकुंभात एकूण ६ शाही स्नान होणार असून त्यापैकी २ स्नान पूर्ण झाले आहेत.
महाकुंभ शाही स्नानाच्या तारखा
१. पौष पौर्णिमा: १३-०१-२०२५/सोमवार
२. मकर संक्रांत : १४-०१-२०२५/मंगळवार
३. मौनी अमावस्या (सोमवती): २९-०१-२०२५/बुधवार
४. वसंत पंचमी: ०३-०२-२०२५/सोमवार
५. माघी पौर्णिमा: १२-०२-२०२५/बुधवार
६. महाशिवरात्री: २६-०२-२०२५/बुधवार
महाकुंभमेळा कधी संपणार?
महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानही याच दिवशी केले जाणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 19:38:50 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 08:59:34 पर्यंत
- करण-विष्टि – 08:12:38 पर्यंत, शकुन – 19:38:50 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वज्र – 23:51:08 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:28
- चन्द्र-राशि-धनु – 14:53:01 पर्यंत
- चंद्रोदय- 31:07:00
- चंद्रास्त- 17:22:00
- ऋतु- शिशिर
- १६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध
- १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
- १९६१: ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
- १९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
- २०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
- १४५७: हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ एप्रिल १५०९)
- १८६५: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
- १८९९: फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (मृत्यू: १५ मे १९९३)
- १९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)
- १९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९३७: सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी, उरिया इ. अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.
- १९५५: निकोलस सारकोझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
- १५४७: हेन्री (आठवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जून १४९१)
- १६१६: संत दासोपंत समाधिस्थ (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)
- १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)
- १९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. (जन्म: २ नोव्हेंबर १८९७)
- १९९६: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)
- १९९७: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (जन्म: २७ जुलै १९११)
- २००७: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६)




अनेक जुन्या गोष्टी आता कालबाह्य होत असून त्यांची जागा आता स्मार्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत आहेत. आपणही आपले आयुष्य आरामदायी आणि सुखकारक व्हावे यासाठी या वस्तू वापरतो. मात्र या वस्तूंचे जेवढे फायदे आहेत तेवढे दुष्परिणाम असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र आपण वापरत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे आपल्याला जीवघेणा आजार होऊ शकतो अस कोणी म्हंटले तर?
हो, असा दावा केला जात आहे अॅपल Apple कंपनीच्या स्मार्ट वॉचमुळे युझरला कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून या कंपनीवर टीका केली जात आहे. या दाव्यावरून Apple कंपनीविरोधात एक खटला दाखल करण्यात आला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
डेली मेल युके यांनी सादर केलेल्या एका अहवालात अॅपल वॉचमध्ये PFAS म्हणजेच पॉली फ्लोरोअल्किल पदार्थ आढळला आहे. हे एक हानिकारक रसायन म्हणून ओळखले जाते आणि यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावरूनच कॅलिफोर्नियाच्या नॉर्दन डिस्ट्रिक्टमध्ये अॅपल कंपनीविरोधात नुकताच एक खटला दाखल करण्यात आला असून Apple ने जाणूनबुजून हे तथ्य ग्राहकांपासून लपविल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर मार्केटमध्ये असलेल्या १५वॉच कंपनीच्या स्मार्ट वॉच मध्ये हे रसायन भेटले आहे. नोट्रे डेम विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या २२ ब्रँड च्या केलेल्या अभ्यासात एकूण १५ ब्रँडमध्ये ही रसायने असल्याचे आढळून आली आहेत.
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 24:19:12 पर्यंत
- नक्षत्र-ज्येष्ठा – 09:45:51 पर्यंत
- करण-वणिज – 11:56:20 पर्यंत, विष्टि – 24:19:12 पर्यंत
- पक्ष-शुक्ल
- योग-अतिगंड – 11:26:52 पर्यंत
- वार-मंगळवार
- सूर्योदय-06:36:21
- सूर्यास्त-17:32:46
- चन्द्र राशि-वृश्चिक – 09:45:51 पर्यंत
- चंद्रोदय-10:05:00
- चंद्रास्त-20:07:59
- ऋतु-हेमंतआजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 20:37:33 पर्यंत
- नक्षत्र-मूळ – 09:03:14 पर्यंत
- करण-गर – 08:52:47 पर्यंत, वणिज – 20:37:33 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-हर्शण – 25:56:48 पर्यंत
- वार-सोमवार
- सूर्योदय-07:12:02
- सूर्यास्त-17:55:58
- चन्द्र राशि-धनु
- चंद्रोदय-30:22:00
- चंद्रास्त-15:35:00
- ऋतु-शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे ‘द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी’ची स्थापना
- १९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
- १९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या ’रेड आर्मी’ने पोलंडमधील ’ऑस्विच’ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
- १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.
- १९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.जन्म
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७५६: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१)
- १८५०: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२)
- १९०१: लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ’तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४)
- १९२२: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (मृत्यू: २२ आक्टोबर १९९८)
- १९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)
- १९६७: बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९४७: पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८)
- १९६८: सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२)
- १९८६: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ आक्टोबर १९३१)
- २००७: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२)
- २००८: सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१)
- २००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१०)




Konkan Railway: गणेश चतुर्थी नंतर कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगोत्सव म्हणजेच होळी. अगदी तळकोकणापासून पालघर ठाणे पर्यंत ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी प्रमाणेच हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातो. चाकरमान्यांचा मोठा वर्ग गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतो.
यावर्षी होलिकाउत्सव मार्च १३ रोजी पासून सुरू होत आहे. मात्र या तारखे दरम्यानच्या जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या चाकरमान्यांना आरक्षण भेटले नाही त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. होळी आणि धूलिवंदन दिवशीच्या आणि आदल्या दिवशीच्या (१२,१३, १४ मार्च) तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे.
नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त गाड्यांची घोषणा होण्याची वाट पहावी लागणार आहे. अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अतिरिक्त गाडीची घोषणा केली नाही आहे. मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.
बेलापूरच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एकञित बैठकीत लवकरचं सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…
… अन्यथा गनिमी काव्याने ‘रेल रोको’ करु ; प्रवासी संघटनेचा कोकण रेल्वे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा…
Follow us on



सावंतवाडी: ९ वर्षे होऊन अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आज प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी यांच्याकडून रेल रोको चे लक्षवेधी आंदोलन हाती घेण्यात आले होते, या आंदोलनासाठी सकाळी रेल्वे स्थानकात आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते, आंदोलनाची पार्श्वभूमी बघता रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी स्टेशन परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता,
यावेळी स्थानकाबाहेर बसलेल्या प्रवासी संघटनेच्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी कोकण रेल्वे चे क्षेत्रीय वाहतूक नियंत्रक श्री.शैलेश आंबर्डेकर आले असता, त्यांच्यावर संतप्त आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस मंजूर आहे की नाही ते सांगा, जर झाले असेल ते अद्याप अपुर्ण अवस्थेत का आहे..? वेळोवेळी आंदोलने, उपोषण करुनही का दखल घेतली जात नाही असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.
यावर ठोस लेखी लिहून देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली, त्यानंतर श्री.आंबर्डेकर यांनी आंदोलकांना बेलापूर येथील उच्च स्तरीय अधिकारी व प्रवासी संघटना पदाधिकारी यांची बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ आंदोलकांना दिली, त्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करीत आहोत असे जाहीर केले.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकाचे रखडलेल्या कामासाठी कोकण रेल्वेने निधीची तरतूद याच आर्थिक वर्षात करावी. नवीन प्लॅटफॉर्म किंवा टर्मिनस लूप लाईन चिपळूण स्थानकाचा धर्तीवर सावंतवाडी स्थानकात उभारावे. या स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करावा. या ठिकाणी शून्य आधारित काढून घेण्यात आलेल्या राजधानी, गरीब रथ एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करावे. नव्याने मंगलोर एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा, रेल्वे स्थानकात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा बोर्ड लावण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या.
अध्यक्ष ऍड.संदीप निंबाळकर, सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, मिलिंद देसाई, सुधीर राऊळ, रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहिर मठकर, जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ, पांडुरंग नाटेकर, संजय नाटेकर, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईचे गणेश चव्हाण, शांताराम गावडे, उमाकांत वारंग, निरवडे सरपंच सुहानी गावडे, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, तेजस पोयेकर, सुभाष शिरसाट, उमेश कोरगावकर, रवी जाधव, विलास जाधव, उमाकांत वारंग, साईल नाईक, केतन गावडे, मेहुल रेडिझ, सचिन गावडे, अजित सातार्डेकर, सुहास पेडणेकर, भुषण मांजरेकर, संदीप राऊळ, सुदेश राऊळ, मनोहर पारकर, रिक्षा व्यावसायिक, रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम
Follow us on



चिपळूण:- SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक १ या शाळेतील इयत्ता १ली ते ७ वीच्या १५१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्याचे रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता वितरण करण्यात आले.
तसेच श्री रुपेश श्याम कदम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरील शाळेतील तसेच सुमन विद्यालय टेरव या शाळेतील मिळून २५८ विद्यार्थ्यां खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.श्री. सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रश्मी काणेकर, उपाध्यक्षा सौ. दिक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.मानवी मेंगे, सौ.मानसी दाभोळकर, सौ. रूचीता हेमंत तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील सौ.वृषाली लाखण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.