Category Archives: मुंबई

मुंबईला आज यलो अलर्ट… विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता

मुंबई :राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. हाच परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत – ठाणे आणि कळवा दरम्यान तांत्रिक बिघाड.

ठाणे :मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कळवा ह्या दोन स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. दोन्ही जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल्स खूप धीम्या गतीने चालविण्यात येत आहेत. सर्व गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने चालत आहेत. लोकल्स च्या एका मागोमाग रांगा लागल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत 

आज सध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळात वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मध्य रेल्वेकडून वाहतुक सूरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर वाहतुक पूर्वपदावर आणली जाईल अशी संबधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चा चेहरा बदलणार.. नवीन आराखडा जाहीर. पूर्ण विडिओ पहा.

नवी दिल्ली :मुंबई छत्रपती टर्मिनस स्टेशन आता नव्या स्वरूपात दिसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्या स्टेशनच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. स्टेशन आणि आजूबाजूचा परिसरात आता पर्यटनाच्या दृष्टीने बांधकाम केले जाईल आणि पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनवण्यात येणार आहे.

एकूण १०,००० करोड मूल्याचे ३ प्रमुख स्टेशनचे पुनर्निर्माण आणि सुशोभीकरणाचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्री मंडळाने स्वीकृत केलेला आहे. त्यामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीतील ३ प्रमुख स्टेशनची नावे आहेत. तसेच हि ३ स्टेशन आणि देशातील इतर १९० रेल्वे स्टेशनच्या पुर्नबांधणीला एकूण ६० हजार करोड  रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

 

BEST ची ‘BEST’ ऑफर १९ रुपयांमध्ये १० फेऱ्यांचा प्रवास..

मुंबई: बेस्टकडून विशेष दसरा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केवळ १९ रुपये भरून ९ दिवसांत १० प्रवास फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे. नव्या आणि जुन्या ‘चलो अँपधारकांना या सुविधेचा केवळ एकदाच लाभ घेता येणार असून अधिकाधिक मुंबईकर प्रवाशांनी सुलभ अशा डिजिटल प्रवासाचा लाभ घ्यावा, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे.

ऑफर कशी मिळवाल
बेस्ट ‘चलो ॲप’ डाऊनलोड करून बस पास सेक्शनमध्ये जाऊन ‘दसरा ऑफर’ निवडून तपशील भरून १९ रुपये ऑनलाईन भरून ही ऑफर खरेदी करू शकता. बसमध्ये चढल्यावर ‘स्टार्ट अ ट्रिप’वर टॅप करून मोबाईल फोन बसवाहकाच्या मशीनसमोर धरून तिकीट वैध करावे. त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी डिजिटल पावती अँपवर मिळेल. संपूर्ण प्रक्रिया रोख रक्कमविरहित आणि कागदविरहित असेल. ही योजना २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये उपलब्ध आहे.

योजनेचे लाभ
या योजनेद्वारे कोणत्याही बस मार्गावर ९ दिवसांच्या कालावधीदरम्यान विमानतळ, हॉप ऑन-टॉप ऑफ अशा विशेष बससेवा वगळता वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बसगाड्यांद्वारे प्रवास करता येऊ शकतो.

 

आता मुंबई उपनगरीय रेल्वेचे फर्स्टक्लास पासधारक करू शकणार एसी लोकलने प्रवास ….पासमध्ये ‘हा’ बदल करणे आवश्यक

मुंबई : आता मुंबई उपनगरीय रेल्वे लोकल्सच्या फर्स्ट क्लास श्रेणीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी फर्स्ट क्लास चा त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक पास काढला आहे ते प्रवासी AC लोकल आणि फर्स्ट क्लास श्रेणीच्या भाड्याचा फरक भरून एसी लोकल ने प्रवास करू शकतात.

दिनांक २४.०९.२०२२ पासून रेल्वेच्या उपनगिरीय टिकेट्स खिडक्यांवर हा फरक भरून प्रवाशांना आपला पास अपग्रेड करता येईल.दिनांक ह्या निर्णयामुळे त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक पासधारक एसी लोकलकडे वळतील असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपये दंड

मुंबई : पालिकेच्या भायखळा ‘ई’ विभागाने लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. मंडळाने गणेशभक्तांसाठी दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे मंडळाने रस्त्यावर १८३ खड्डे खोदल्याने त्याची भरपाई म्हणून हा दंड आकारला गेला आहे.

महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा दंड मंडळाच्या महापालिके कडे जमा असलेल्या निधीतून वसूल केला जातो.

भायखळा ‘ई’ विभागाच्या हद्दीमधील टी. बी. कदम मार्गावर (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बिल्डिंगपर्यंत) पालिकेची परवानगी न घेता दर्शन रांगेसाठी मार्गिका उभारण्यात आली. या मार्गिकेला बॅरिकेड्स लावण्यासाठी खड्डे पाडण्यात आले. पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार रुपये याप्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. ही रक्कम ‘ई’ विभाग कार्यालयात तातडीने भरण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.

 

या पूर्वीपण अशा प्रकारचा दंड महापालिकेकडून
आकारला गेला होता. सन 2012 साली 23.56 लाख, 2013 साली 5.60 लाख, 2014 साली 5.56 लाख तर 2015 ह्या वर्षी 3.36 लाख ह्या कारणास्तव मंडळातून दंड वसूल करण्यात आला होता.

 

 

सकाळी सुटणार्‍या कल्याण ते सिएसमटी महिला विशेष लोकल च्या वेळेत बदल करण्याची मागणी.

कल्याण : कल्याण वरून सिएसमटीला जाणारी सकाळी 08.09 च्या महिला विशेष गाडी मध्ये बदल करण्याची मागणी ह्या लोकलने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांकडून होत आहे. तशा आशयाची लेखी विनंती प्रवाशांच्या सहींसहित मंडल रेल प्रबंधक (DRM), सिएसमटी केली गेली आहे.

ह्या अर्जात खालील मागण्यांचा समावेश आहे.

  1. ह्या गाडीचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करावे. पूर्वी ही गाडी कल्याण स्थानकावरून सकाळी 08.01 वाजता सुटत होती.

  2. ही गाडी वेळेत यावी.

  3. ही गाडी 15 डब्यांची करावी किंवा,

  4. एक महिला विशेष गाडी ऑफिस च्या वेळेत (peak hours) मध्ये वाढवावी. (सकाळ आणि संध्याकाळ)

महिला प्रवाशांची वाढणार्‍या संख्ये प्रमाणात गाड्या वाढवल्या गेल्या नाहीत त्यामुळे महिला प्रवाशांना खास करुन वयस्कर महिलांना प्रवास करणे खूप त्रासाचे होत असल्याने या मागण्या केल्या गेल्या आहेत.  

AC लोकलच्या मोटरमेन कडून हलगर्जीपणा, लोकलचे दरवाजे उपघडलेच नाही, प्रवासी कारशेड ला

ठाणे: AC लोकल चे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होण्याचे प्रकार उपनगरीय मध्यरेल्वे मार्गावर घडत आहेत.

लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना चक्क कारशेडला जावे लागण्याची घटना मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवर काल घडली. हि लोकल कळवा कारशेड ला गेली आणि सर्व प्रवाशांना अंधारात रुळावरून पायपीट करत यावे लागले.

अशा प्रकारच्या घटना मध्य रेल्वेवर २ ते ३ वेळा घडल्या आहेत. मागे कल्याण सीएसमटी AC लोकल चे दरवाजे दादर स्टेशनला न उघडता ती पुढच्या स्टेशन ला गाडी गेली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने हि गोष्ट मान्य केली नाही होती. पण त्या संदर्भातील विडिओ ट्विटर वर एका प्रवाशाने अपलोड केला होता.

काही दिवसांपूर्वी सीएसमटी स्थानकावर पण असाच प्रकार घडला होता.ठाणे सीएएमसटी एसी लोकल सीएसएमटी स्थानकात पोहोचली. थांबली. पण लोकलचे दरवाजे काही उघडलेच नाहीत. आता दरवाजे का बरं उघडत नाहीत? हे कळायला काही मार्ग नव्हता. लोकल स्थानकात आल्यानंतर मोटरमन खाली उतरला आणि चालू लागले. पण थोड्याच वेळात त्याला घडलेला प्रकार लक्षात आला आणि पुन्हा येऊन त्यानं अखेर लोकलचे दरवाजे उघडले.

मोटारमनच्या चुकीमुळे दरवाजे ओपन होत नाही आहेत. गाडी थांबल्यावर गाडीचे दरवाजे उघडणे आणि बंद करणे हे सर्व मोटरमन च्या नियंत्रणामध्ये असते. पण ह्या मध्ये होणाऱ्या हलगर्जीपणामुळे AC लोकल्स मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनां त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search