गेल्या वर्षी गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. गेल्या वर्षी कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यावर नारायण राणे यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. या वर्षीही मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे.
हि विशेष गाडी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीसाठी सुटणार आहे. हि गाडी चिपळूण,रत्नागिरी, कणकवली या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचा सर्व संपूर्ण खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे.

मुंबईतील प्रत्येक मंडलमधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात येतील. जिल्हाध्यक्षांची चर्चा करून ही ही नावे नोंदवली जातील. नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

RELATED NEWS
![]()
Facebook Comments Box


