१८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी – सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी खासदार.

राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आमच्या पक्षाकडून तिथे गेलेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, कारण आमच्या विचाराचे आणि आमच्या बरोबर काम केलेले नेते ह्या मंत्रिमंडळात दिसतात ह्याचे आम्हाला खूप समाधान वाटते आणि सर्वाना माझ्या मनपुरवर्क शुभेच्छा असे त्या म्हणाल्या.
महिलांना मंत्रीमंडळात स्थान नाही.
१८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. ५०% लोकसंख्या ह्या देशात महिलांची आहे. विध्यमान सरकार च्या ह्या कृतीतून ते महिलावर्गाचा आणि त्यांच्या अधिकारांचा मन करत नाही हे दिसत आहे. 
गंभीर आरोप असलेल्यांना मंत्रीपदे.
ह्यासंबंधी प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या कि संजय राठोड आणि विजयकुमार गावित ह्यांच्यावर आरोप हे भाजपने केले होते. अनेक मंत्र्यावर आरोप होते त्यांना क्लीन चिट देऊन मंत्रीपदे देण्यात आली आहेत. आर्थर रोड मधील सर्व कैदयांना क्लीन चिट द्या आणि भाजपमध्ये प्रवेश द्या त्यामुळे प्रशासनाचा ह्या कैद्यांवर होणारा खर्च वाचेल असा खोचक टोला त्यांनी ह्यावेळी मारला.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search