मराठी अभिनेता अभिजीत केळकरची मुंबई-गोवा महामार्गाविषयी संतप्त पोस्ट! तो म्हणाला आमचं कोकण….

   Follow us on        
Mumbai -Goa Highway News: एकीकडे समृद्धी महामार्ग अवघ्या ५/६ वर्षात पूर्ण करून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी हा महामार्ग पूर्ण करून दाखवल्याच्या आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे “खड्ड्यात” गेलेला  मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले तर सोडा तर ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणे पण टाळत आहेत. त्यामुळे शांत असणारा कोकणी माणूस आता आपला राग  विविध माध्यमातून व्यक्त करू लागला आहे. ह्यात आता मराठी कलाकार पण सामील झाल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने इन्स्ट्राग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
एका युझर च्या पोस्ट ला त्याने रिप्लाय देताना नक्की काय म्हणाला अभिजीत?
 
 मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची 12 वर्ष कोणत्या हिशोबाने मोजली ते कळेल का ? नाही म्हणजे तसा भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली , आपल्याला संताप व्यक्त करायला आपलं हक्काच स्थान मिळालय मग 12 वर्षच का ? आधीची 60-65 वर्ष काय कोकणात सोन्याचा धुर निघत होता का ? ह्यासाठी नुसत्या संतापी पोस्ट टाकून आणि वर्षातून एकदा सुट्टीला कोकणात जाऊन कस भागेल ? त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी जबाबदार आहेत ना ? त्यांना निवडून द्यायला पुण्या मुंबईची किंवा उर्वरित महाराष्ट्रातील लोक येत नाहीत. आधी कोकणकरांनी सुधारावे मग कोकण सुधारेल ! समृद्धी म्हणजे काय बँकेत ठेवलेली ठेव नाही की काढली आणि दिली कुणालाही ! मोठ्या महामार्गांवर अपेक्षित असलेली जड वाहतूक किती प्रमाणात आहे हो कोकणात ? त्यामुळे उगाच तुमच्या वैयक्तिक संतापाला सामाजिक करून इतरांचे सामाजिक जीवन आनंदमय करू नका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial)

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search