मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी -२०२४ उजाडणार

मुंबई :मागील सुनावणी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण होणार असे राज्य सरकारद्वारे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. पण आताच झालेल्या सुनावणीत ही तारीख पुढे ढकलली आहे. ह्या महामार्गावरील अखेरचा टप्पा १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे.

मुंबई-गोवा महार्गावरील अरवली – कंटे – वाकड ह्या पट्ट्यातील साडेनऊ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम बाकी असून ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला व न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली आहे.

महामार्गाच्या कामाची सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.टप्पा अंतर पूर्ण झालेले काम
1पनवेल (पळस्पे) ते इंदापूर शुन्य ते ८४ कि.मी.८६.००%
2इंदापूर ते वडपाळे ८४ ते १०८ किमी६६.००%
3वडपाळे ते भोगाव खुर्द १०८ ते १४७ किमी९३.००%
4भोगाव खुर्द ते कशेडी १४७ ते १६१ किमी ८३.८६%
5कशेडी ते परशुराम घाट १६१ ते २०४ किमी९७.५०%
6परशुराम घाट ते आरवली २०४ ते २४१ किमी७४.०२%
7आरवली ते कांटे २४१ ते २८१ किमी२७.०८%
8कांटे ते वाकड २८१ ते ३३२ किमी२९.२५%
9वाकड ते तळगाव ३३२ ते ३६७ किमी१००.००%
10तळगाव ते कळमठ (३६७ ते ४०६ किमी१००.००%
11कळमठ ते झाराप ४०६ ते ४५० किमी१००.००%
एकुण ११ टप्पे ८८.५०%

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search