कोकण हळू हळू ‘म्हातारं’ होत चाललय….

हल्लीच माझे गावी जाण झालं, २ दिवस राहून परतीचा प्रवास सुरवात केला, कायमच गावावरून निघताना चाकरमानी माणसाचे डोळे भरतात, पाय जागचे हलत नाहीत पण आज कायतरी वेगळंच वाटत होतं, जाणवत होतं… 

असे का, याचा विचार डोक्यात सतत सूरु होता. मला असे का सतत वाटतंय याच उत्तर थोड्यावेळाने मिळालं ते म्हणजे.. “कोकण वृद्ध झालेय, म्हातारे होतंय…

जन्मवयापासूनच गावची ओढ असल्याने कायमच शाळा संपली की गावी येणे व्हायचं, त्यानंतर चतुर्थी असा योग जमायचा. कालांतराने नोकरीत यात्रा-जत्रांना सुद्धा येणे सुरू झाले, या कालावधीत कोकण बदलत होत तशी कोकणातली माणसे सुद्धा बदलत होती सर्व दिसत होतं पण लक्षात येत न्हवत आज त्याची जाणीव झालीय.

गेली ३०-३५ वर्षे आपल्या आजुबाजुला असणारे चुलते, काका, वाडीतली इतर जुनी माणसे आज वयाच्या ७० मध्ये आहेत, ५०च्या दशकात जन्माला आलेली आणि खडतर जीवन जगून इथपर्यंत आलेली ही पिढी आज थकलीय, जीवनाच्या शेवटच्या टप्यात येताना मागे सोसलेल्या अनेक घटना त्यांना आनंद, दुःख देत असतील पण सांगायाच बोलायचं कोणाला हा प्रश्न त्यांच्या समोर असेल. प्रत्येक गावात अशी जाणकार जुनी मंडळी असतील जी आज म्हातारी झालीत, एकवेळ गावच्या मिटिंग आणि सर्व सोपस्कार पाडण्यास पुढे असणारे असे हे लोक आज डोळ्यावर काळा चष्म्या लावून हातात काठी घेऊन चाचपडत फिरतायत. सकाळी ढोर सोडण्यापासून संध्याकाळी घराकडे परतेपर्यंत सतत पायपीट करणारी, ही पिढी दुकानात जायला बाईक घेउन धावणाऱ्या तरुणाईला समजून घेता येईल का ? अशी अनेक माणसे ज्यांनी मोठी कुटुंब सांभाळली, मुला बाळांची लग्न लावून दिली, आज नातवंडे खेळवतायत त्याच्या परिस्थितीकडे पाहून खूप वाईट वाटते. सतत असे वाटत की एक चालती बोलती पिढी संपून जाईल. 

गावात, वाडीत, घरात लग्न-सराई सन-सुद करताना यांची असणारी धावपळ आज हे थकल्यावर जाणवते, यांनीच घर कुटुंब सांभाळून सर्व परंपरा जपल्या आज ती माणसे गावच्या तरुणाईसमोर कुठंतरी मागे पडलीत, हातात मोबाईल, बाईक आणि आमकां सगळा माहिती हा या नादात आपण आपल्या सोबत असणाऱ्या चालत्या बोलत्या पुस्तकाला अडगळीत टाकतोय हे आपल्याला समजतंय का ? 

त्यांचा अनुभव, ज्ञानसंपदा, याची माहिती आपण करून घ्यायची गरज आहे, त्यांनी जपलेला पूजलेला इतिहास आपल्यासोबत पुढच्या पिढ्याना सांगण्याची गरज आहे. ही अशी माणसे आहेत जी एकदा गेली की त्यांची जागा कधीच कोणी भरून काढू शकणार नाही, म्हणून म्हणतोय “कोकण म्हातार होतंय” त्या प्रत्येक म्हाताऱ्या कोकणाला आपण आधार देऊन सांभाळन्याची सध्या गरज आहे. त्यांची विचारपूस करण्याची गरज आहे.

माझा चुलता, माझा भाऊ, माझा मामा, हा आज जे पण आहे पण त्यांनी माझ्यासोबत घालवलेल्या मागच्या क्षणांच मोल हे अमूल्य आहे, आज आपल्याला गरज आहे त्यांच्यासाठी वेळ काढण्याची त्याना आनंद देण्याची..नक्की विचार करा!!

–एक वाचक 

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search