मुंबई | 03-04-23| मुंबईतील पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासन या मार्गावर 11 नव्या 12 डब्यांच्या नॉन एसी गाड्या चालविणार आहे. त्या नवीन गाड्यांमुळे या मार्गावर चालविण्यात येणार्या गाड्यांची संख्या 1383 वरुन 1394 एवढी होणार आहे.
या गाड्या दिनांक 5 एप्रिल पासून चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या नवीन गाड्या चालविताना काही वेगळे प्रयोग पण करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर बोरिवली आणि वांद्रे ही स्थानकांवर गाड्यांना थांबे दिले जाणार नाही. बोरिवली च्या पुढे दहिसर, भायंदर, वसई आणि विरार असे मोजकीच स्थानके घेणार असल्याने विरार – वसई करांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
Facebook Comments Box