मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी बसविण्यात येत आहेत ‘स्पीड गन कॅमेरे’


संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाने गाडी ड्राईव्ह करताना महामार्गाच्या बाजूला असलेल्या फलकांवर दिलेल्या वेगमर्यादेचे पालन न केल्यास तुम्ही आता तुम्ही सहज पकडले जाणार आहात. कारण या महामार्गावर आता स्पीड गन बसवण्यात येत आहेत.

सध्या खानु मठ दरम्यान येथे स्पीड गन कॅमेरा लावला आहे. या भागात 75 किलोमीटर पेक्षा अधिक वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहन चालकांकडून 2 हजार रुपये दंड आरटीओ कडून वसूल केले जात आहे. महामार्ग जसा जसा पूर्ण होईल तसे अपघातप्रवण क्षेत्रात असे अजुन स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

वेगाने गाड्या चालवून होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येतात. या गन वाहनाची दिशा, वेग, कोणत्या लेनने वाहन मार्गस्थ झाले, कॅमेरा कुठे लावला आहे, तारीख, वेळ आदी सर्व माहिती देतात. त्यामुळे आरटीओ कर्मचार्‍यांना कारवाई करणे सोपे जाते. दंडाची पध्दतही ऑनलाईन असल्याने तो भरण्याशिवाय गत्यंतर नाही. दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करतात आणि अपघात कमी होतात.

 

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search