१९८० पासूनचे एकूण ६४ प्रकारचे जुनेअभिलेख उतारे मिळणार आता एका क्लिकवर; कोकणातील ‘या’ जिल्ह्यांत सेवेचा विस्तार…

मुंबई |जमीनविषयक दस्तऐवज नागरिकांना सहजासहजी उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा या आधी फक्त राज्यात फक्त ७ जिल्ह्यापुरती मर्यादित होती ती आता २४ जिल्ह्यात विस्तारित केली आहे.
यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सातारा, सोलापूर,सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम,वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे.
जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयात फेरे मारण्याची गरज नाही. 
ही माहिती मिळवण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन रजिस्टर करणे गरजेचे आहे. एकदा रजिस्टर केल्यानांतर तुम्हाला ज्या जमिनीची माहिती पाहिजे त्या जमीनीचा  सर्वे/हिस्सा नंबर टाकून काही चार्जेस भरून जतन केलेले दस्तऐवज मिळवता येतील.  
एकूण ६४ प्रकारचे अभिलेख तुम्हाला या संकेतस्थळावरून मिळवता येतील
Click pdf to expand…
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/04/OFFICEWISE_DOCUMENTS.pdf”]






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search