Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कठीण कातळभाग लागल्याने या भागातील चौपदरीकरणाच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र आता कठीण कातळाचा बहुतांश भाग फोडण्यात अखेर यश आले आहे.
खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. या कठीण कातळभागामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा कातळभाग फोडण्यासाठी सुरुंग लावण्याची परवानगी कंत्राटदार कंपनीने शासनाकडे मागितली होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणाने त्याला परवानगी नाकारली होती.आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू केली जाणार असे आश्वासन देण्यात आले आहे.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी कशेडी घाटात मजबूत हाईट खांबाची पुन्हा उभारणी
कोकण
Konkan Railway: सावधान! डाउन करणार्या प्रवाशांमुळे ठाणे-दादर स्थानकांवर दुर्घटना होण्याची शक्यता...
कोकण
बंद केलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर चालू करा अन्यथा 'त्या' गाड्या सोडू दिल्या जाणार नाही; रेल कामगार स...
कोकण


