मुंबई : बहुचर्चित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरवातीच्या फेर्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या गाडीच्या सुरवातीच्या फेरीची म्हणजे दिनांक 28 जूनची मुंबई ते गोवा या फेरीची सर्व तिकीटे विकली गेली होती. तसाच प्रतिसाद उद्याच्या दुसर्या फेरीला फेरीला मिळाला आहे.
उद्याच्या फेरीचे 94% आरक्षण आतापर्यंत झाले आहे. 530 पैकी 499 सीट्स आरक्षित झाल्या आहेत. या आरक्षणातून 6.75 लाख रुपये जमा झाले आहेत. रात्रीपर्यंत पूर्ण म्हणजे 100% आरक्षण होण्याची अपेक्षा आहे.
परतीच्या प्रवासासाठी पण प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 01 जुलै च्या मडगाव ते मुंबई फेरीची फक्त 58 तिकिटे बूक होण्याची बाकी आहेत. उद्याचा दिवसात ती पण आरक्षित होतील अशी अपेक्षा आहे.
Facebook Comments Box