“सावधान! पुढे … ” काळजीपोटी जनआक्रोश समितीने मुंबई गोवा मार्गावर लावले मार्गदर्शक फलक..

   Follow us on        

मुंबई, दि. २२ मार्च : शिमग्यास कोकणात जाणऱ्या कोकणकरांची अपुऱ्या दिशादर्शक व सुरक्षा सुविधामुळे होणाऱ्या वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर मार्गदर्शक फलक लावण्याची मोहीम मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन काल समितीच्या वतीने महामार्गावर काही ठिकाणी हे फलक लावले गेले आहेत.

महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही आहे. अनेक ठिकाणी काम चालू आहे, अनेक ठिकाणी धोकादायक स्पॉट निर्माण झाले आहेत. अशा ठिकाणी वाहन चालकांना सावध करण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक फलक लावणे अपेक्षीत होते. जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी अपघाताचा धोका ओळखून असे स्पॉट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तरी त्या ठिकाणी फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे समितीने लोकसहभागातून हे फलक लावण्याचे कार्य हाती घेतले आहे. यामध्ये पळस्पे ते वाकेड दरम्यान दिशादर्शक व दिशापरिवर्तन फलक , वाहतुक नियंमांचे नियम व सुचना तसेच रिफलेक्टर ( परावर्तक) , सोलर बिल्कर, रम्बल स्ट्रीप लावण्यात येत आहेत.

मागील आठवड्यात या महामार्गावरील तीन अपघात त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक असले असते तर टळले असते असे समितीचे म्हणने आहे. अनेक ठिकाणी काम चालू आहे, तर काही ठिकाणी अचानक एकेरी वाहतूक चालू होत आहे. मात्र तसे फलक नसल्याने अपघात होत आहेत. शिमग्यामुळे रस्तावर वर्दळ वाढली व लवकर पोहचण्याच्या प्रयत्नात चालक गाड्या बेदारकरपणे वेगात चालवतात व एकेरी मार्ग व दिशा परावर्तनाचे फलक नसल्याने त्याचे पर्यावसन अपघातात होते आहे त्यामुळे समितीने वाहन चालकांना सावकाश व सावधगिरीने वाहने चालवा असे आवाहन केले आहे.

 

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search