



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आगाराला जो सावळा गोंधळ चालू आहे तो त्वरीत थांबवावा आणि कायम स्वरुपी नवीन चालू दूरध्वनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. प्रासीद्धिस दिलेल्या पत्रकात बापर्डेकर म्हणाले की कुडाळ डेपोचा कोरोना काळापासून दूरध्वनी नव्हता तो आजमितीस सुस्थितीत नाही. अधून मधुन तिघांचे मोबाईल नंबर बाहेर पेपर फलकावर लावलेले परंतु तो ज्या आधीकारि वर्ग अगर विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रकजवळ असतो ते कधीच फोन उचलत नाही . रिंग वाजून जाते . मुंबई हून कुडाळ रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी अगर स्टेशनला आल्यावर अगर मालवाहून कुडाळला जायचं असेल मग स्वतःचा फोन असुदे की इतरांच्या फोन वरून केव्हाही मालवण एस टी बस संबंधी विचारपूस करिता फोन केला तर त्याठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्याजवळ आहे ते रिंग वाजली तरी फोन उचलत नाही अशावेळी दमून भागून आलेल्या प्रवाशांनी करावं तरी काय .खाजगी वाहन की रिक्षेला भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा की कमी पैशात एस टी महामंडळाने प्रवास करण्यास ताटकळत रेल्वे स्टेशनला किंवा मालवण राहावे? असा प्रश्न या पत्रकात विचारला आहे.
मालवण आगार व्यवस्थापनाला मानाव लागतं ते मालवण आगाराच्या सर्व अधिकारी ,कर्मचारी यांना कारण त्यांचा कोरोना काळापासून दूरध्वनी आणि वाहतूक काही अपवाद वगळता आजपर्यंत बंद नाही.वाहतूकही कुडाळ ची बंद नाही.कुडाळला विचारले तर त्याचं एकच उत्तर मालवणवाल्याच आम्हाला काही विचारू नका ती आली तर सोडू परंतु कित्येकवेळा रेल्वे स्टेशनला न जाता कुडाळ आगारातूंनच बस वळविली जाते.याला जबाबदार कोण? याचे मूळ कारण कुडाळ आगाराला वाली नाही त्याचे बाप हे वर्क शॉप ठिकाणी बसतात तक्रार घेऊन दूरवर त्यांच्या पर्यंत जाणे कोणत्याही प्रवाशांना शक्य नाही.कुडाळ मालवण कुडाळ एस टी फेऱ्याना प्रवाशांन बरोबर शाळा ,कॉलेज विद्यार्थी तर कित्येक वेळा सरकारी कर्मचारी असतात मग अचानक एखादी गाडी रद्द करणे कारण नसताना उशिरा एस टी सोडणे प्रवाशांसोबत पर्यटक इतरांना कितपत परवडणार याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी .प्रवाशांनी लेखी तक्रार पुस्तकात तक्रार केली तर त्याच निरसन होत नाही.याला जबाबदार कोण आहेत. तरी येत्या पंधरा दिवसांत आगार व्यवस्थापक आणि आगार प्रमुख तसेच दूरध्वनी यांची व्यवस्था कायमस्वरूपी डेपोला ज्याठिकांनाहून जिल्ह्यातील बस सोडल्या जातात त्याठिकाणी करावी.अन्यथा आंदोलन करावे लागेल याची सूचना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सुरेश बापर्डेकर यांनी दिली आहे
👆🏻आपला स्पॉट आजच बुक करा आणि उत्तम प्रतिसाद मिळवा