![]()
![]()
![]()
![]()
Mumbai Local: तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईत तर गरमी वाढल्याने नागरिक तर हैराण झाले आहेत. मात्र उपनगरीय लोकल सेवेत एसी लोकल चा भरणा केल्याने काही जास्त पैसे मोजून गारेगार प्रवासाचा अनुभव घेणे आता शक्य झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकिट अथवा पास नसूनसुद्धा सर्रास या लोकल मध्ये प्रवास करत असल्याचे दिसत आहे. परिणामी एसी लोकल्स मध्ये सामान्य लोकल्स प्रमाणे गर्दी पाहायला मिळत आहे. कित्येकवेळा गर्दीमुळे स्वयंचलित दरवाजे बंद होण्यास अडथळा निर्माण होऊन गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होत आहे.
सोशल मीडियावर ठाणे स्थानकावरील एका एसी लोकलची एक चित्रफित व्हायरल होत आहे. या चित्रफितीत एका डब्यात प्रवाशांची एवढी गर्दी झाली की गाडीचे स्वयंचलित दरवाजे बंद होत नव्हते. एसी लोकल पासधारक आणि तिकीटधारक प्रवाशांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला आहे की गाडीत गर्दी करणाऱ्या बहुतेक जणांकडे एसीचा पास नसतो तरीपण ते एसी लोकल मध्ये प्रवास करत आहेत. सुरवातीला या गाड्यांमध्ये नेहमी दिसणारे टीसी पण आजकाल गायबच असतात त्यामुळे अशा प्रवाशांचे फावतच आहे. मात्र त्यामुळे ज्या प्रवाशांनी एसी वर्गाचा पास किंवा तिकीटे खरेदी केली आहेत त्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन या समस्येवर उपाय काढावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Morning scene at #Thane
AC Locals bursting at the Seams
with doors struggling to close.With TTE's absent during peak hours, its a FREE for all, Wonder how many are genuine passengers? @Central_Railway @drmmumbaicr @RailMinIndia
🎥 @csmohdpic.twitter.com/NZI0mmN1jd
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) May 9, 2024
![]()
Amaravati Express Fire: मुबंईत दोन वेळा लोकल रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना दादर स्टेशनवर आज अजून एक दुघटना घडली आहे. अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोचमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली. आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली
Ad -
![]()
मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास घडली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. तसेच सध्या हार्बर मार्ग ठप्प झाला आहे.
लोकलची चाचणी सुरू होती. मात्र ती अयशस्वी झाली. लोकल घसरली त्याठिकाणी ब्लॉक घेऊन दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्या रुळावरून एक रिकामी लोकल चालवून पाहण्यात आली. मात्र ती घसरली, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
![]()
मुंबई, दि. २९ एप्रिल : हार्बर मार्गावरून पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरला. ही घटना सोमवारी सकाळी ११.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली आहे. तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी १०.०५ वाजता पनवेलवरून लोकल सीएसएमटीच्या दिशेने निघाली होती. ही लोकल सीएसएमटी येथे फलाट क्रमांक दोनवर येत असताना एका डब्याचे चाक रुळावरून घसरले.
या घटनेमुळे अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. या मार्गावरील अनेक लोकल या घटनेमुळे रखडल्या आहेत. तसेच डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. त्यामुळे संपूर्ण हार्बर मार्ग प्रभावित झाला आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मस्जिद स्थानकापर्यंत आणल्या जात आहेत. तसेच अनेक लोकल वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीचा प्रवास करतील. दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. या दुर्घटनेचा कोणताही परिणाम मुख्य मार्गावर झालेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
![]()
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील तीन नियमित गाडया रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत १० जून नंतर रद्द (Train Cancelled )दाखवत होत्या. रेल्वेने या संदर्भात कोणतेही प्रसिद्ध जाहीर केले नसल्याने असल्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. एलटीटी मडगाव एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत रद्द दाखवत गेल्या होत्या. काही दिवसानंतरच गणेश चतुर्थीचे आरक्षण सुरु होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या गाड्या आरक्षण प्रणालीत ऍक्टिव्ह दाखवाव्यात अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे आरक्षण या प्रणालीत दाखवले आहे. मात्र पावसाळी हंगामात या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.
![]()
![]()
मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती वाढली आहे.
आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे. 20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.
कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
![]()
Content Protected! Please Share it instead.